शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पाणीटंचाईला प्राधान्य देऊन समस्या सोडवा

By admin | Updated: May 26, 2015 00:58 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : कोरेगावातील टंचाई आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

कोरेगाव : ‘पावसाला नेमकी कधी सुरुवात होईल, याची श्वाश्वती नाही, त्यामुळे पाण्याची उपलब्धता व उद्भव याचे नियोजन जाणीवपूर्वक केले पाहिजे. प्रशासनातील सर्वच घटकांनी पाणीटंचाई या विषयाला सर्वोच्च प्राधान्य देऊन, जनतेच्या समस्या तातडीने सोडवाव्यात,’ अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्या. कोरेगाव तालुका टंचाई आढावा बैठक रामराजे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी पंचायत समिती सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, पंचायत समिती सभापती रूपाली जाधव, उपसभापती अर्जुन वीर, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, तहसीलदार अर्चना तांबे, प्रभारी गटविकास अधिकारी क्रांती बोराटे आदींसह अधिकारी उपस्थित होते. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शासनाच्या सध्याच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच योजना राज्यपालांच्या अधिकाराबाहेर काढण्याची गरज व्यक्त केली. राज्य पातळीवर आम्ही याबाबत स्वतंत्र भूमिका घेणारच आहोत; मात्र जिल्हास्तरावर तातडीने आढावा घेऊन प्रशासनाने निर्णय घेतले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आ. शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत दफ्तर दिरंगाईबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना फटकारले. विहीर अधिग्रहण केल्याने प्रश्न सुटतो का? जेथे आवश्यकता आहे तेथे टँकर सुरू का केले जात नाहीत? ग्रामपंचायत अथवा ग्रामसेवक टंचाईबाबतचे प्रस्ताव सादर करतात, ते नेमके कोठे जातात?, तहसीलदारांना टँकर सुरू करण्याबाबतचे अधिकार देणे आवश्यक आहे, आदी विषयांवर त्यांनी अधिकाऱ्यांना टंचाईच्या कामाबाबत जागरुक राहण्याचे आवाहन केले. अधिकाऱ्यांच्या टंचाईतील कामाबाबत आ. चव्हाण यांनी आक्षेप घेत बैठकीस गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी सोमण यांनी तालुक्यात ३९ गावे टंचाईग्रस्त असल्याचे सांगत १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नव्याने पाच गावांनी टँकरची मागणी केली आहे. जेथे जनावरांना पाणी देणे आवश्यक आहे, तेथे टँकरची जादा खेप दिली जाईल, असे सोमण यांनी स्पष्ट केले. तालुक्यातील दक्षिण भागाला आजवर नेहमीच सापत्न वागणूक दिली जात आहे. ‘जलयुक्त शिवार’ असो, अथवा गतिमान पाणलोट योजनेमध्ये जाणीवपूर्वक या भागातील गावांना वगळण्यात आले आहे. केवळ वगळून अधिकारी थांबले नाहीत, तर त्यांनी योजनेची माहिती देखील दिली नाही, असा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भोसले यांनी दक्षिण भागाला मदत करता येत नाही, म्हणून त्याचा इतर तालुक्यात समावेश करावा, अशी जोरदार मागणी केली. (प्रतिनिधी)टंचाईची दाहकता वाढतेयतालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी अधिकारी नसल्याने प्रभारी अधिकाऱ्यांकडे कार्यभार सोपविण्यात आला आहे. पाणी टंचाईच्या काळात प्रांताधिकारीपदाचा कार्यभार साताऱ्याचे मल्लिकार्जुन माने यांच्याकडे, गटविकास अधिकारीपदाचा कार्यभार सहायक गटविकास अधिकारी क्रांती बोराटे यांच्याकडे तर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंतापदाचा कार्यभार साताऱ्याचे उपअभियंता अष्टेकर यांच्याकडे असल्याने अनेक कामांना गरज असून देखील गती मिळत नसल्याची तक्रार अनेक गावांच्या ग्रामस्थांनी यावेळी केली.