शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांच्या अडचणी सोडवा.. मगच गेट बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

ढेबेवाडी : ‘आधी पुनर्वसन, मगच धरण’ या पुनर्वसन कायद्याचे उल्लंघन प्रशासनाने केले आहे. मात्र, हे चालणार नाही. परिपूर्ण पुनर्वसनासह ...

ढेबेवाडी : ‘आधी पुनर्वसन, मगच धरण’ या पुनर्वसन कायद्याचे उल्लंघन प्रशासनाने केले आहे. मात्र, हे चालणार नाही. परिपूर्ण पुनर्वसनासह व प्रत्येक गावठाणाची स्वतंत्र ग्रामपंचायत आणि लाभक्षेत्रातील ४६ गावांसह पुनर्वसित धरणग्रस्तांच्या जमिनीला पाणी या बाबींची पूर्तता झाल्याशिवाय वांग मराठवाडीचे गेट बसवू दिले जाणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाने दिला आहे.

सातारा जिल्ह्यातील पुनर्वसित धरणग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात कऱ्हाडमधील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक समाधान चव्हाण, कोयनाचे सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल (वन्यजीव) संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल (वन्यजीव) बामणोली बाळकृष्ण हसबनिस, कृष्णा खोऱ्याचे अधीक्षक अभियंता मिसाळ, उरमोडीचे कार्यकारी अभियंते धुळे, धरणग्रस्तांचे प्रतिनिधी वांगचे दिलीप पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते.

वांग मराठवाडीच्या लाभक्षेत्रातल्या ४६ गावांतील शेतकरी व पुनर्वसित धरणग्रस्तांच्या जमिनीला पाणी कसे देणार, या प्रश्नावर अधीक्षक अभियंता मुसळे यांनी वांग नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे दहा बंधारे बांधलेले आहेत. त्यातून शेतकऱ्यांनी पाणी उचलणे अपेक्षित आहे, असे सांगितले. तेव्हा दिलीप पाटील यांनी लाभक्षेत्राला शासन पाणी उचलून देईल असे तत्कालीन जलसंपदामंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केले. तत्कालीन महसूल आयुक्त अरुण भाटिया यांनी तसे लेखी पत्र धरणग्रस्तांना दिल्याचे निदर्शनास आणून दिले.

गावठाण हस्तांतरण प्रश्नावर काही अटींवर

धरणग्रस्तांनी सह्या केल्या आहेत म्हणजे ते कायदेशीर हस्तांतरण होत नाही. पुनर्वसित गावठाणात कायद्याप्रमाणे सर्व नागरी सुविधा निर्माण करून प्रत्येक गावठाणाची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. तोपर्यंत गावठाणाला पाणी, वीज बिल व अन्य बाबींची व्यवस्था कृष्णा खोरे वा शासनाने केली पाहिजे. यासह विविध समस्या सोडविल्याशिवाय येत्या डिसेंबरमध्ये बसविले जाणारे धरणाचे गेट बसवू दिले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. आहे

लाभक्षेत्राला पाणी म्हणजे कोल्हापूर पद्धतीच्या पाणी शेतकऱ्यांनी उचलणे असा अर्थ होतानाही लाभक्षेत्र म्हणजे काय? हे समजून घ्या, असा सल्ला बाळासाहेब पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यांना देत मूळचे शेतकरी आणि पुनर्वसित धरणग्रस्त यांना बांधापर्यंत पाणी पुरवठा करणे असा अर्थही समजून सांगितला.