शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

धरणग्रस्तांच्या अडचणी सोडवा.. मगच गेट बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

ढेबेवाडी : ‘आधी पुनर्वसन, मगच धरण’ या पुनर्वसन कायद्याचे उल्लंघन प्रशासनाने केले आहे. मात्र, हे चालणार नाही. परिपूर्ण पुनर्वसनासह ...

ढेबेवाडी : ‘आधी पुनर्वसन, मगच धरण’ या पुनर्वसन कायद्याचे उल्लंघन प्रशासनाने केले आहे. मात्र, हे चालणार नाही. परिपूर्ण पुनर्वसनासह व प्रत्येक गावठाणाची स्वतंत्र ग्रामपंचायत आणि लाभक्षेत्रातील ४६ गावांसह पुनर्वसित धरणग्रस्तांच्या जमिनीला पाणी या बाबींची पूर्तता झाल्याशिवाय वांग मराठवाडीचे गेट बसवू दिले जाणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाने दिला आहे.

सातारा जिल्ह्यातील पुनर्वसित धरणग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात कऱ्हाडमधील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक समाधान चव्हाण, कोयनाचे सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल (वन्यजीव) संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल (वन्यजीव) बामणोली बाळकृष्ण हसबनिस, कृष्णा खोऱ्याचे अधीक्षक अभियंता मिसाळ, उरमोडीचे कार्यकारी अभियंते धुळे, धरणग्रस्तांचे प्रतिनिधी वांगचे दिलीप पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते.

वांग मराठवाडीच्या लाभक्षेत्रातल्या ४६ गावांतील शेतकरी व पुनर्वसित धरणग्रस्तांच्या जमिनीला पाणी कसे देणार, या प्रश्नावर अधीक्षक अभियंता मुसळे यांनी वांग नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे दहा बंधारे बांधलेले आहेत. त्यातून शेतकऱ्यांनी पाणी उचलणे अपेक्षित आहे, असे सांगितले. तेव्हा दिलीप पाटील यांनी लाभक्षेत्राला शासन पाणी उचलून देईल असे तत्कालीन जलसंपदामंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केले. तत्कालीन महसूल आयुक्त अरुण भाटिया यांनी तसे लेखी पत्र धरणग्रस्तांना दिल्याचे निदर्शनास आणून दिले.

गावठाण हस्तांतरण प्रश्नावर काही अटींवर

धरणग्रस्तांनी सह्या केल्या आहेत म्हणजे ते कायदेशीर हस्तांतरण होत नाही. पुनर्वसित गावठाणात कायद्याप्रमाणे सर्व नागरी सुविधा निर्माण करून प्रत्येक गावठाणाची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. तोपर्यंत गावठाणाला पाणी, वीज बिल व अन्य बाबींची व्यवस्था कृष्णा खोरे वा शासनाने केली पाहिजे. यासह विविध समस्या सोडविल्याशिवाय येत्या डिसेंबरमध्ये बसविले जाणारे धरणाचे गेट बसवू दिले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. आहे

लाभक्षेत्राला पाणी म्हणजे कोल्हापूर पद्धतीच्या पाणी शेतकऱ्यांनी उचलणे असा अर्थ होतानाही लाभक्षेत्र म्हणजे काय? हे समजून घ्या, असा सल्ला बाळासाहेब पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यांना देत मूळचे शेतकरी आणि पुनर्वसित धरणग्रस्त यांना बांधापर्यंत पाणी पुरवठा करणे असा अर्थही समजून सांगितला.