शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

धरणग्रस्तांच्या अडचणी सोडवा.. मगच गेट बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

ढेबेवाडी : ‘आधी पुनर्वसन, मगच धरण’ या पुनर्वसन कायद्याचे उल्लंघन प्रशासनाने केले आहे. मात्र, हे चालणार नाही. परिपूर्ण पुनर्वसनासह ...

ढेबेवाडी : ‘आधी पुनर्वसन, मगच धरण’ या पुनर्वसन कायद्याचे उल्लंघन प्रशासनाने केले आहे. मात्र, हे चालणार नाही. परिपूर्ण पुनर्वसनासह व प्रत्येक गावठाणाची स्वतंत्र ग्रामपंचायत आणि लाभक्षेत्रातील ४६ गावांसह पुनर्वसित धरणग्रस्तांच्या जमिनीला पाणी या बाबींची पूर्तता झाल्याशिवाय वांग मराठवाडीचे गेट बसवू दिले जाणार नाही, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाने दिला आहे.

सातारा जिल्ह्यातील पुनर्वसित धरणग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात कऱ्हाडमधील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. बैठकीस पालकमंत्री बाळासाहेब पाटील, श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक समाधान चव्हाण, कोयनाचे सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल (वन्यजीव) संदीप कुंभार, वनक्षेत्रपाल (वन्यजीव) बामणोली बाळकृष्ण हसबनिस, कृष्णा खोऱ्याचे अधीक्षक अभियंता मिसाळ, उरमोडीचे कार्यकारी अभियंते धुळे, धरणग्रस्तांचे प्रतिनिधी वांगचे दिलीप पाटील, सुरेश पाटील उपस्थित होते.

वांग मराठवाडीच्या लाभक्षेत्रातल्या ४६ गावांतील शेतकरी व पुनर्वसित धरणग्रस्तांच्या जमिनीला पाणी कसे देणार, या प्रश्नावर अधीक्षक अभियंता मुसळे यांनी वांग नदीवर कोल्हापुरी पद्धतीचे दहा बंधारे बांधलेले आहेत. त्यातून शेतकऱ्यांनी पाणी उचलणे अपेक्षित आहे, असे सांगितले. तेव्हा दिलीप पाटील यांनी लाभक्षेत्राला शासन पाणी उचलून देईल असे तत्कालीन जलसंपदामंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी जाहीर केले. तत्कालीन महसूल आयुक्त अरुण भाटिया यांनी तसे लेखी पत्र धरणग्रस्तांना दिल्याचे निदर्शनास आणून दिले.

गावठाण हस्तांतरण प्रश्नावर काही अटींवर

धरणग्रस्तांनी सह्या केल्या आहेत म्हणजे ते कायदेशीर हस्तांतरण होत नाही. पुनर्वसित गावठाणात कायद्याप्रमाणे सर्व नागरी सुविधा निर्माण करून प्रत्येक गावठाणाची स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण करून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. तोपर्यंत गावठाणाला पाणी, वीज बिल व अन्य बाबींची व्यवस्था कृष्णा खोरे वा शासनाने केली पाहिजे. यासह विविध समस्या सोडविल्याशिवाय येत्या डिसेंबरमध्ये बसविले जाणारे धरणाचे गेट बसवू दिले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. आहे

लाभक्षेत्राला पाणी म्हणजे कोल्हापूर पद्धतीच्या पाणी शेतकऱ्यांनी उचलणे असा अर्थ होतानाही लाभक्षेत्र म्हणजे काय? हे समजून घ्या, असा सल्ला बाळासाहेब पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यांना देत मूळचे शेतकरी आणि पुनर्वसित धरणग्रस्त यांना बांधापर्यंत पाणी पुरवठा करणे असा अर्थही समजून सांगितला.