शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मातीचे आरोग्य राखणे गरजेचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:34 IST

पार्ले, ता. कऱ्हाड येथे कृषी मंडलाच्या वतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच अश्विनी ...

पार्ले, ता. कऱ्हाड येथे कृषी मंडलाच्या वतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत जमीन आरोग्यपत्रिका कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच अश्विनी मदने, उपसरपंच मोहनराव पवार, सचिन नलवडे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, सैदापूर मंडल अधिकारी विनय कदम, कृषी सहायक मनीषा कुंभार, प्रा. विजय पाटील, आनंदराव नलवडे, रघुनाथ नलवडे, अप्पासाहेब पाटील, सुभाष नलवडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

प्रा. अमृत पाटील म्हणाले, शेतीतील मृदा आरोग्य टिकवण्यासाठी ठरावीक काळानंतर तीचे परीक्षण करणे गरजेचे आहे. मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक असे तीन गुणधर्म असतात. त्यामध्ये पन्नास टक्के भौतिक गुणधर्म असतात, तर रासायनिक पंचेचाळीस टक्के असतात. जैविक गुणधर्म केवळ पाच टक्के असतात. मातीमध्ये केवळ पाच सेंद्रिय घटक असतात. अलीकडच्या काळात रासायनिक खतांच्या मात्रा वाढत चालल्यामुळे मातीतील सेंद्रिय गुणधर्म कमी होत आहेत. मातीचा पोत बिघडत आहे. त्यामुळे सेंद्रिय खतांचा आणि मर्यादित पाण्याचा वापर करणे आवश्यक आहे.

यावेळी माती परीक्षणाबाबत माहिती देण्यात आली. तसेच माती तपासणी करण्यासाठी नमुना घ्यावयाच्या पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले. प्रा. विजय पाटील यांनी शेतीची मशागत आणि पिकांची लागवड त्यासाठी करावी लागणारी बीजप्रक्रिया याबाबत माहिती दिली. सैदापूर मंडल अधिकारी विनय पाटील यांनी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली. प्रा. विनय पाटील यांनी प्रास्ताविक केले. अविनाश नलवडे यांनी आभार मानले.

फोटो : १४केआरडी०१

कॅप्शन : पार्ले, ता. कऱ्हाड येथे शेती आणि माती याविषयी प्रा. अमृत पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.