शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
2
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
3
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
4
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
5
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
6
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
7
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
9
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
10
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
11
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
12
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
13
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
14
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
15
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
17
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
19
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
20
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

कोरड्या कोयनेत भरला ‘आठवणीतला बाजार’

By admin | Updated: July 3, 2014 00:49 IST

गावांचे अवशेष उघडे : बामणोली, शेंबडी परिसरात धरणापूर्वीच्या दिवसांना उजाळा

बामणोली : जून महिनाही कोरडा गेल्यामुळं ‘महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी’ मानल्या जाणाऱ्या कोयनेच्या शिवसागर जलाशयाची पातळी खूपच खालावली आहे. बामणोली परिसरातील जुन्या, पाण्याखाली गेलेल्या गावठाणांचे अवशेष उघडे पडले असून, पूर्वी कधीतरी ज्या ठिकाणी बाजार भरत होता, तिथेच मासेविक्रीसाठी विक्रेते बसत असल्यामुळे ‘आठवणीतला बाजार’ भरल्याचे दृश्य दिसत आहे.कोयनेच्या धरणामुळं निर्माण झालेल्या विस्तीर्ण अशा शिवसागर जलाशयात आणखी दोन नद्यांची खोरी समाविष्ट आहेत. तापोळ्याजवळ सोळशी नदी कोयनेला मिळते, तर शेंबडी गावाजवळ कांदाटी आणि कोयनेचा संगम आहे. कोयनेत थोड्या प्रमाणात पाणी असले, तरी सोळशी आणि कांदाटी नद्या पूर्ण कोरड्या पडल्या आहेत. सोळशी नदीच्या पात्रातून तापोळ्याला लोक चालत जाऊ शकत आहेत, इतकी पाण्याची पातळी खालावली आहे. लांबलेल्या पावसामुळं प्रत्येकजण निसर्गाच्या कृपेची वाट पाहत आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, बामणोली-शेंबडी भागात भात पिकाला जीवदान मिळण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेबरोबरच जुन्या आठवणीही जागविल्या जात आहेत.शिवसागर जलाशयाचं पाणी कमी झाल्यामुळं वीजनिर्मिती ठप्प झाली आणि नदीकाठच्या गावांत भाताची पिकंही पिवळी पडू लागली. शेतकरी हवालदिल होऊन पावसाची वाट पाहत आहेत. हा डोंगराळ टापू मुसळधार पावसासाठी प्रसिद्ध आहे. यंदा जुलै उजाडूनही पावसाची चिन्हे नाहीत. मात्र, या परिस्थितीचा जलाशयाच्या जवळ वसलेल्या गावांना थोडा फायदाही झाला आहे. पाणी कमी झाल्यामुळं मासे मोठ्या प्रमाणावर मिळत असून, मुंबई-पुण्याकडे रोज मासे पाठविले जात आहेत. माशांच्या राशी रचून जिथं विक्रेते बसत आहेत, त्याच ठिकाणी जुन्या बामणोली गावचा बाजार बसत असे. धरणाच्या निर्मितीनंतर प्रथमच त्या ठिकाणी आता ‘आठवणीतला बाजार’ भरत आहे.बामणोली गावात देशपांडे आडनावाच्या कुटुंबांची घरे जास्त होती. ब्राह्मण समाजातील इतरांचीही बरीच घरे होती. त्यामुळेच गावाला ‘बामणोली’ नाव पडल्याचं सांगितलं जातं. महात्मा गांधींच्या हत्येनंतर उद््भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर १९४८ मध्ये देशपांडे व अन्य ब्राह्मण कुटुंबांनी सांगली, मिरज, कुपवाडकडे स्थलांतर केलं. कालांतरानं कूळ कायद्यान्वये जमिनी वहिवाटदारांना मिळाल्या. आजही म्हावशी, बामणोली, सावरी गावांत काही जमिनींच्या सातबारावर देशपांडे आणि अन्य कुटुंबीयांची नावे आहेत, असं ग्रामस्थ सांगतात. कोयना धरण झाल्यावर बामणोली गावठाण पाण्यात गेलं आणि जलाशयाच्या कडेला नवीन बामणोली गाव वसलं. आता पाणी आटल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. (वार्ताहर)