शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पक्षांना मोठ्या भूमिकेची संधी

By admin | Updated: September 28, 2014 00:34 IST

वजन वाढणार की घटणार? : भविष्यातील राजकीय स्थान ठरविणारी निवडणूक पाहणार सत्त्वपरीक्षा

जगदीश कोष्टी ल्ल सातारा ऊस दरवाढ, दूध दरवाढीचा प्रश्न हाताळत रस्त्यावरील आंदोलने करणारी, गनिमी कावा करत पोलिसांना सळो की पळो करून सोडण्यात प्रसिद्ध असलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय आखाडा गाजविण्याच्या तयारीत आहे. स्वाभिमानीने जिल्ह्यातील तीन मतदारसघांत उमेदवार देण्याची तयारी केली आहे.शरद जोशी यांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेतून बळीराजाचे प्रश्न हाताळण्यासाठी तरुण एकत्र आले. त्यातील शंकर गोडसे यांनी जिल्ह्यात संघटना वाढविण्याचे काम केले. शरद जोशी राज्यसभेवर गेल्यानंतर संघटनेत फूट पडली. राजू शेट्टींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना काढली. रघुनाथदादा पाटील यांचा महाराष्ट्र प्रदेश शेतकरी संघ आणि शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना वेगवेगळ्या मार्गाने काम करत होते. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २००९ मध्ये ऊसदरवाढीसाठी मोठे आंदोलन झाले. दूध दरवाढीसाठी गनिमी काव्याने आंदोलने केली. ‘स्वाभिमानी’च्या आक्रमकपणामुळे शेतकरी संघटनेकडे आकर्षिले गेले आणि २००९ मध्ये राजू शेट्टी हातकणंगलेतून खासदार झाले. यशवंत सेना ते रासप... एक खडतर प्रवासनितीन काळेल ल्ल सातारा सुमारे २५ वर्षांपूर्वी अभियंत्याची पदवी हातात असतानाही समाजजागृतीसाठी फाटक्या खिशाने बाहेर पडलेल्या माणदेशी माणसाने आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून लक्षवेधी झेप घेतली आहे. यशवंत सेना ते रासप असा प्रवास करणाऱ्या महादेव जानकर यांच्या पक्षावर सुरुवातीला विशिष्ट जातीचा पक्ष म्हणून शिक्का मारण्यात येत होता. तोच ‘रासप’ आज सर्वजनवादी ठरला आहे. १९८८ ला धुळदेव (ता. फलटण) येथे पुणे जिल्ह्यातील बी. के. कोकरे यांनी धनगर समाजाच्या जागृतीसाठी यशवंत सेनेची स्थापना करून दोन वर्षे संपूर्ण राज्यात रान उठविले. त्यामुळेच शरद पवार यांना धनगर समाजाचा ओबीसीतून एनटीत (भटकी जमात) समावेश करावा लागला. त्यानंतर राजकीय खेळी व दबावातून १९९१ ला यशवंत सेना काँग्रेसमध्ये विलीन झाली. यशवंत सेना संपली असे सर्वांनाच वाटले. पण, १९९२ ला माण तालुक्यातील पळसावडे येथील महादेव जानकर यांनी यशवंत सेना पुनरुज्जीवित करण्याचा विडा उचलला. लोकवर्गणीतून संघटना चालवीत असतानाच १९९३ ला म्हसवड येथे मेळावा घेऊन धनगर समाजाचा विकास होत नाही तोपर्यंत लग्न न करण्याची व घरी न जाण्याची शपथ घेतली. ती आजही पाळली आहे. त्यानंतर जानकर यांनी बसापचे तत्कालीन अध्यक्ष कांशीराम, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, इतिहास संशोधक मा. म. देशमुख यांच्याबरोबर महाराष्ट्र तसेच राज्यांतील धनगर व बहुजन समाजाचा अभ्यास, प्रबोधन व संघटन केले. १९९५ च्या सुमारास मराठवाडा हा यशवंत सेनेचा केंद्रबिंदू होता. ‘एक लेकरू, एक कोकरू’ अशी घोषणा देऊन मराठवाडा पिंजून काढला. त्याच वेळी यशवंत सेना बसपाशी संलग्न होती. १९९८ ला बसपाच्या तिकिटावर जानकर यांनी नांदेडमधून भास्करराव पाटील-खतगावकर यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवून दखल घेण्याइतपत मते मिळविली. दि. ३१ मे २००३ ला नगर जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथे राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना झाली. २९ सप्टेंबर २००३ ला निवडणूक आयोगाकडे नोंदणी झाली. त्यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यात अनेक जागा लढविल्या. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा मतदारसंघात ‘रासप’चा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता. माणमधील उमेदवाराने २५ हजार मते घेतली होती. २००७ च्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातून पक्षाचा पहिला पंचायत समिती सदस्य निवडून आला. २००९ मध्ये राज्यात ‘रिडालोस’च्या स्थापनेत जानकर यांचा मोठा वाटा होता. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर मतदारसंघातून बाबासाहेब पाटील यांच्या रूपाने पक्षाचा पहिला आमदार निवडून आला. २०१२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत परभणी व बीड जिल्ह्यातून ‘रासप’चा प्रत्येकी एक सदस्य निवडून आला. त्यावेळी भाजप नेते गोपीनाथ मुंडे व जानकर यांची युती झाली होती. तेव्हा जानकर ‘एनडीए’त जाणार याची नांदी सुरु झाली होती. २०१४ च्या निवडणुकीत ‘रासप’ महायुतीत समाविष्ट झाला. त्यानंतर जानकर यांनी बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून ४ लाख ५१ हजार मते घेतली. पण, अवघ्या ६९ हजार मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला. या लढतीची दखल राष्ट्रीय पातळीपर्यंत घेतली गेली.