शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
4
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
5
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
6
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
7
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
8
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
9
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
10
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
11
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
12
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
13
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
14
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
15
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
16
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
17
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
18
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
19
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
20
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती

औंधसह सोळा गावे आक्रमक

By admin | Updated: July 28, 2014 22:59 IST

पाणीप्रश्न : गोरे यांच्या निवासस्थानी करणार उपोषण

सातारा : औंधसह सोळा गावांचा पाणीप्रश्न सुटावा म्हणून स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून, त्यांनी दि. ५ आॅगस्टपासून माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय राजवैभव प्रतिष्ठानने घेतला आहे. औंधसह सोळा गावांची कोअर कमिटीची बैठक औंध येथील दत्त मंदिरात झाली. त्यावेळी हा इशारा देण्यात आला.मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री सातारा जिल्ह्यातील असतानाही औंधसह सोळा गावांचा पाणीप्रश्न सुटत नाही. मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन देऊनही जर शासकीय बैठक होत नसेल तर ते गंभीर आहे. सांगली, पुणे, सोलापूर जिल्ह्यांच्या लोकप्रतिनिधींनी शेतीचे पाणी पळविले. तरीही दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांकडे पाहण्यासाठी राजकीय मंडळींना वेळ नाही. त्यामुळे जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. काही. लोकप्रतिनिधी औंधसह सोळा गावांना ब्रह्मपुरी योजनेचे पाणी देणार असल्याची घोषणा करून जनतेची दिशाभूल करत आहेत. ही योजना फक्त चारमाही आहे. त्यामुळे उर्वरित आठ महिन्यांचे काय, असा प्रश्न निर्माण होत असल्याचा आक्षेपही यावेळी घेण्यात आला. सोळशी धरणात खटाव तालुक्याचा समावेश होत नाही. त्यामुळे औंधसह सोळा गावांना उरमोडी योजनेतून १.०९ टीएमसी पाणी ठिबक सिंचनद्वारे देता येणे शक्य होणार आहे. त्यासाठी माण आणि खटाव तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ही बैठक दि. ४ आॅगस्टपूर्वी नाही झाली तर सोळा गावांतील प्रमुख १६० प्रतिनिधी या आमदार जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.’यावेळी दत्तात्रय जगदाळे, रामभाऊ घार्गे, प्रा. रामचंद्र साळुंखे, जयवंत खराडे, नवल थोरात, शशिकांत जाधव, प्रभाकर देशमुख, जितेंद्र फडतरे, सुनील सूर्यवंशी, पृथ्वीराज भोकरे, जालिंदर राऊत, श्रीमंत देशमुख, जयसिंग घार्गे, महादेव देशमुख, हंबीरराव देशमुख, अर्जून देशमुख, भानुदास माळी, भिकू पवार, शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)मीही उपोषणात सहभागी : गोरेऔंधसह सोळा गावे माझ्या निवासस्थानी उपोषणास बसणार आहेत, ही माझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्यासमवेत मी स्वत: या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली. माझ्या निवासस्थानी उपोषण करण्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगून आ. गोरे म्हणाले, ‘औंधसह सोळा गावांच्या पाणी प्रश्नासाठी मी भांडतोय की नाही, हे त्यांनीच ठरवावे. त्यांच्या पाणीप्रश्नांच्या अनुषंगाने त्यांना राज्यपालांची भेट कोणी घडवून आणली, याचा इतिहास त्यांनी तपासून पाहावा. कोणतीही गोष्ट तत्काळ होत नसते. काही गोष्टींना विचाराअंतीच सामोरे जायचे असते. ही बाब त्यांना समजत नसेल तर त्याला मी तरी काय करणार. ज्यांच्या दारात त्यांना उपोषण करावयाचे आहे, तेथे ते उपोषण करत नाहीत. ते माझ्याच निवासस्थानी बसत असतील तर मीही त्यांच्यासोबत आनंदाने उपोषण करण्यास तयार आहे.’