शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

संगममाहुलीत अंत्यसंस्कारासाठी नव्या सहा शवदाहिन्या : चोरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:39 IST

सातारा : कोणत्याही शासकीय निधीशिवाय साताऱ्यात बालाजी ट्रस्टमार्फत स्मशानभूमी चालविली जात आहे. सध्या कोरोना बळींची संख्या धोकादायक पातळीवर पोहोचली ...

सातारा : कोणत्याही शासकीय निधीशिवाय साताऱ्यात बालाजी ट्रस्टमार्फत स्मशानभूमी चालविली जात आहे. सध्या कोरोना बळींची संख्या धोकादायक पातळीवर पोहोचली असून, नव्याने सहा दाहिन्या वाढविण्यात आल्या आहेत. कोणत्याही मृतदेहाची विटंबना होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, अशी माहिती बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी शनिवारी दिली.

सातारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे जिल्ह्यातून अनेकजण उपचारासाठी येत असतात. उपचारादरम्यान कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले गेले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये दररोज सरासरी २० बाधितांचा मृत्यू होत आहे. कैलास स्मशानभूमीत दररोज मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गेल्या महिन्याभरापासून बळींची संख्या भयावह होत असताना काही वाहिन्या मोडल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना कल्पना देण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी सिंह यांनी उपजिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकाऱ्यांना संयुक्त पाहणीचे आदेश दिले.

अत्यंत विदारक स्थितीची पाहणी केल्यावर तातडीने सहा शवदाहिन्या, तर नंतर चार अशा एकूण दहा दाहिन्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या बळी गेल्यावर नियमानुसार नातेवाइकांना शेवटचे मुखदर्शन दिले जाते. त्यानंतर विधीवत पद्धतीने कैलास स्मशानभूमीतील पथक अंत्यसंस्कार करते. एका अंत्यसंस्कारासाठी आठ तासांचा वेळ लागतो. तीन तास वेळ भडाग्नीसाठी लागतो. त्यानंतर पाच तास ती दाहिनी मोकळी ठेवून तेथील रक्षा नातेवाइकांच्या ताब्यात विसर्जनासाठी देण्यात येते. एका दिवसात दोन पाळ्यांमध्ये अंत्यसंस्कार केले जातात, अशी माहिती चोरगे यांनी दिली.