शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

संगममाहुलीत अंत्यसंस्कारासाठी नव्या सहा शवदाहिन्या : चोरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:39 IST

सातारा : कोणत्याही शासकीय निधीशिवाय साताऱ्यात बालाजी ट्रस्टमार्फत स्मशानभूमी चालविली जात आहे. सध्या कोरोना बळींची संख्या धोकादायक पातळीवर पोहोचली ...

सातारा : कोणत्याही शासकीय निधीशिवाय साताऱ्यात बालाजी ट्रस्टमार्फत स्मशानभूमी चालविली जात आहे. सध्या कोरोना बळींची संख्या धोकादायक पातळीवर पोहोचली असून, नव्याने सहा दाहिन्या वाढविण्यात आल्या आहेत. कोणत्याही मृतदेहाची विटंबना होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, अशी माहिती बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी शनिवारी दिली.

सातारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे जिल्ह्यातून अनेकजण उपचारासाठी येत असतात. उपचारादरम्यान कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले गेले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये दररोज सरासरी २० बाधितांचा मृत्यू होत आहे. कैलास स्मशानभूमीत दररोज मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गेल्या महिन्याभरापासून बळींची संख्या भयावह होत असताना काही वाहिन्या मोडल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना कल्पना देण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी सिंह यांनी उपजिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकाऱ्यांना संयुक्त पाहणीचे आदेश दिले.

अत्यंत विदारक स्थितीची पाहणी केल्यावर तातडीने सहा शवदाहिन्या, तर नंतर चार अशा एकूण दहा दाहिन्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या बळी गेल्यावर नियमानुसार नातेवाइकांना शेवटचे मुखदर्शन दिले जाते. त्यानंतर विधीवत पद्धतीने कैलास स्मशानभूमीतील पथक अंत्यसंस्कार करते. एका अंत्यसंस्कारासाठी आठ तासांचा वेळ लागतो. तीन तास वेळ भडाग्नीसाठी लागतो. त्यानंतर पाच तास ती दाहिनी मोकळी ठेवून तेथील रक्षा नातेवाइकांच्या ताब्यात विसर्जनासाठी देण्यात येते. एका दिवसात दोन पाळ्यांमध्ये अंत्यसंस्कार केले जातात, अशी माहिती चोरगे यांनी दिली.