शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

संगममाहुलीत अंत्यसंस्कारासाठी नव्या सहा शवदाहिन्या : चोरगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:39 IST

सातारा : कोणत्याही शासकीय निधीशिवाय साताऱ्यात बालाजी ट्रस्टमार्फत स्मशानभूमी चालविली जात आहे. सध्या कोरोना बळींची संख्या धोकादायक पातळीवर पोहोचली ...

सातारा : कोणत्याही शासकीय निधीशिवाय साताऱ्यात बालाजी ट्रस्टमार्फत स्मशानभूमी चालविली जात आहे. सध्या कोरोना बळींची संख्या धोकादायक पातळीवर पोहोचली असून, नव्याने सहा दाहिन्या वाढविण्यात आल्या आहेत. कोणत्याही मृतदेहाची विटंबना होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, अशी माहिती बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी शनिवारी दिली.

सातारा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. त्यामुळे जिल्ह्यातून अनेकजण उपचारासाठी येत असतात. उपचारादरम्यान कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले गेले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये दररोज सरासरी २० बाधितांचा मृत्यू होत आहे. कैलास स्मशानभूमीत दररोज मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गेल्या महिन्याभरापासून बळींची संख्या भयावह होत असताना काही वाहिन्या मोडल्या होत्या. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना कल्पना देण्यात आली. यानंतर जिल्हाधिकारी सिंह यांनी उपजिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकाऱ्यांना संयुक्त पाहणीचे आदेश दिले.

अत्यंत विदारक स्थितीची पाहणी केल्यावर तातडीने सहा शवदाहिन्या, तर नंतर चार अशा एकूण दहा दाहिन्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या बळी गेल्यावर नियमानुसार नातेवाइकांना शेवटचे मुखदर्शन दिले जाते. त्यानंतर विधीवत पद्धतीने कैलास स्मशानभूमीतील पथक अंत्यसंस्कार करते. एका अंत्यसंस्कारासाठी आठ तासांचा वेळ लागतो. तीन तास वेळ भडाग्नीसाठी लागतो. त्यानंतर पाच तास ती दाहिनी मोकळी ठेवून तेथील रक्षा नातेवाइकांच्या ताब्यात विसर्जनासाठी देण्यात येते. एका दिवसात दोन पाळ्यांमध्ये अंत्यसंस्कार केले जातात, अशी माहिती चोरगे यांनी दिली.