शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणची सहा कोटींचे बिले थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:27 IST

वाई : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची बिले न भरल्यामुळे जोडणी तोडण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतला आहे. यामुळे गावोगावच्या रस्त्यांवर ...

वाई : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची बिले न भरल्यामुळे जोडणी तोडण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतला आहे. यामुळे गावोगावच्या रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरणार आहे. शासनाने याबाबत पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीची थकीत वीज बिले भरावीत, असे परिपत्रक काढले असले तरी याबाबत ग्रामपंचायती अनभिज्ञ आहेत.

कोरोनामुळे वीज कंपनीच्या थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. यातच तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ३९७ पथदिव्यांचे ५ कोटी ७९ लाख ५१ हजार रुपयांची वीज बिले थकीत आहेत, तर १४७ पाणीपुरवठा ग्राहकांची ४९ लाख ८७ हजार थकबाकी आहे. यापूर्वी पथदिव्यांची वीज बिले पंचायत समितीकडून भरण्यात येत होती. याबाबत वीज कंपनीने पंधरा दिवसांपूर्वी ग्रामपंचायतींना तशा नोटिसा काढल्या होत्या. ग्रामपंचायतींनी नोटिसा पंचायत समितीकडे वर्ग केल्या होत्या; परंतु नुकताच शासनाने पंधराव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतींनी पथदिव्यांची व पाणीपुरवठा स्कीमची बिले भरावीत, असे परिपत्रक काढले आहे; परंतु ते अनेक ग्रामपंचायतींना मिळाले नाही. याबाबत अनेक ग्रामपंचायती अनभिज्ञ असून, त्या पंचायत समितीवर विसंबून राहिल्या आहेत.

अनेक ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेची बिलेही भरली नसल्याने त्यांनी ती मुदतीत त्वरित न भरल्यास ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.

याबाबत वीज कंपनीने पंधरा दिवसांपूर्वीच नोटिसा दिलेल्या असल्याने संबंधित ग्रामपंचायतींनी त्वरित बिले अदा करण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता महेंद्र गोंजारी यांनी केले आहे. वीज कंपनीने नोटीसची मुदत संपत आल्याने कंपनीने गावातील पथदिव्यांची जोडणी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावोगावांतील रस्ते अंधारात राहणार आहेत. वीज वितरण कंपनीचे सुमारे सहा कोटी रुपये थकीत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी शासनाने जीआर नुकताच काढला असल्याने वीज कंपनीने ग्रामपंचायतींना बिल भरण्यास मुदत द्यावी. मुदतीत वीज बिल न भरल्यास पुढील कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

चौकट

पंधराव्या वित्त आयोगातून येणारा निधी ग्रामपंचायत गटरे, पाणीपुरवठा दुरुस्ती, आरोग्यविषयक सुविधा व अनेक महत्त्वाच्या कामांसाठी खर्च करते. त्यातूनच शासनाने आता वीज बिल भरण्याची तरतूद करण्यास सांगितल्याने स्थानिक विकासासाठी ग्रामपंचायतींना निधी कमी पडणार आहे. अगोदरच तुटपुंजा निधीवर ग्रामपंचायती चालत असताना हा बोजा शासनाने ग्रामपंचायतींवर ढकलला आहे. शासनाने किमान निधी तरी वाढवून द्यावा, अशी मागणी अनेक ग्रामपंचायतींमधून करण्यात येत आहे.