शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

वीज वितरणची सहा कोटींचे बिले थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:27 IST

वाई : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची बिले न भरल्यामुळे जोडणी तोडण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतला आहे. यामुळे गावोगावच्या रस्त्यांवर ...

वाई : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची बिले न भरल्यामुळे जोडणी तोडण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतला आहे. यामुळे गावोगावच्या रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरणार आहे. शासनाने याबाबत पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीची थकीत वीज बिले भरावीत, असे परिपत्रक काढले असले तरी याबाबत ग्रामपंचायती अनभिज्ञ आहेत.

कोरोनामुळे वीज कंपनीच्या थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. यातच तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या ३९७ पथदिव्यांचे ५ कोटी ७९ लाख ५१ हजार रुपयांची वीज बिले थकीत आहेत, तर १४७ पाणीपुरवठा ग्राहकांची ४९ लाख ८७ हजार थकबाकी आहे. यापूर्वी पथदिव्यांची वीज बिले पंचायत समितीकडून भरण्यात येत होती. याबाबत वीज कंपनीने पंधरा दिवसांपूर्वी ग्रामपंचायतींना तशा नोटिसा काढल्या होत्या. ग्रामपंचायतींनी नोटिसा पंचायत समितीकडे वर्ग केल्या होत्या; परंतु नुकताच शासनाने पंधराव्या वित्त आयोगातून थेट ग्रामपंचायतींनी पथदिव्यांची व पाणीपुरवठा स्कीमची बिले भरावीत, असे परिपत्रक काढले आहे; परंतु ते अनेक ग्रामपंचायतींना मिळाले नाही. याबाबत अनेक ग्रामपंचायती अनभिज्ञ असून, त्या पंचायत समितीवर विसंबून राहिल्या आहेत.

अनेक ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनेची बिलेही भरली नसल्याने त्यांनी ती मुदतीत त्वरित न भरल्यास ग्रामस्थांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.

याबाबत वीज कंपनीने पंधरा दिवसांपूर्वीच नोटिसा दिलेल्या असल्याने संबंधित ग्रामपंचायतींनी त्वरित बिले अदा करण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता महेंद्र गोंजारी यांनी केले आहे. वीज कंपनीने नोटीसची मुदत संपत आल्याने कंपनीने गावातील पथदिव्यांची जोडणी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गावोगावांतील रस्ते अंधारात राहणार आहेत. वीज वितरण कंपनीचे सुमारे सहा कोटी रुपये थकीत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असला तरी शासनाने जीआर नुकताच काढला असल्याने वीज कंपनीने ग्रामपंचायतींना बिल भरण्यास मुदत द्यावी. मुदतीत वीज बिल न भरल्यास पुढील कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

चौकट

पंधराव्या वित्त आयोगातून येणारा निधी ग्रामपंचायत गटरे, पाणीपुरवठा दुरुस्ती, आरोग्यविषयक सुविधा व अनेक महत्त्वाच्या कामांसाठी खर्च करते. त्यातूनच शासनाने आता वीज बिल भरण्याची तरतूद करण्यास सांगितल्याने स्थानिक विकासासाठी ग्रामपंचायतींना निधी कमी पडणार आहे. अगोदरच तुटपुंजा निधीवर ग्रामपंचायती चालत असताना हा बोजा शासनाने ग्रामपंचायतींवर ढकलला आहे. शासनाने किमान निधी तरी वाढवून द्यावा, अशी मागणी अनेक ग्रामपंचायतींमधून करण्यात येत आहे.