शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कारखानदारांची ऊस दराबाबत चुप्पी!

By admin | Updated: November 4, 2016 00:29 IST

म्हणे आम्हीच संभ्रमात : सातारा जिल्ह्यातील कारखानदारांच्या बैठकीत निर्णय घेण्यावर ठाम

 वाठार स्टेशन : राज्यभर ५ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामात कोल्हापूर जिल्ह्याने ऊसदराची कोंडी फोडत शासनाच्या जाहीर ‘एफआरपी’पेक्षा १७५ रुपये अधिक दर देण्याबाबत नुकतीच घोषणा केली. सातारा जिल्ह्यातील कारखानदारांनी मात्र अद्यापही चुप्पी साधली आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत कोल्हापूरप्रमाणेच दर देण्याची भूमिका जिल्ह्यातील कारखानदारांनी जाहीर करावी, अशी मागणी ऊस उत्पादकांकडून होत आहे. असे असले तरी जिल्ह्यातील कारखानदार मात्र कोल्हापूरच्या निर्णयाबाबत संभ्रमात आहेत. कोल्हापूरमधील बैठकीला केवळ कोल्हापुरातीलच कारखानदारच उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीतील निर्णय त्या जिल्ह्यापुरताच आहे. ज्यावेळी सातारा जिल्ह्यातील कारखानदारांची बैठक होईल. त्यावेळी याबाबत निर्णय घेऊ, असा सूर जिल्ह्यातील कारखानदारांकडून काढला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दराबाबत शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनांचा दरारा कायम आहे. यामुळे प्रत्येक वर्षी कोल्हापूरमधील ऊस दराच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष असते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील साखर कारखानदार, शासन आणि शेतकरी संघटना यांनी एकत्र येऊन ऊसदराचा महत्त्वाचा निर्णय तीन दिवसांत मिटवला. यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री व राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली. या उलट परिस्थिती सातारा जिल्ह्याची आहे. सातारा जिल्ह्यातील कोणत्याच संघटनेने केवळ प्रसिद्धी पत्रकाशिवाय कोणतीच ठोस भूमिका जाहीर केलेली नाही. यामुळे जिल्ह्यातील कारखान्यांनी कोणताही दर जाहीर न करताच उसाची तोडणीही सुरू केली आहे. यावरूनच जिल्ह्यात शेतकरी संघटना किती आक्रमक आहेत ते स्पष्ट होत आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी केवळ कोल्हापूर पुरतेच लक्ष न देता सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ऊस उत्पादकांतून होत आहे. कोल्हापूरमधील कारखान्यांनी सध्याच्या परिस्थितीनुसार दर जाहीर केला असला तरी सातारा जिल्ह्यात एफआरपीपेक्षा जादा रक्कम देणे शक्य आहे का? हा प्रश्न आहे. एकवेळ शासनाची जाहीर एफआरपी देता येईल; परंतु एफआरपीपेक्षा वाढीव रक्कम देणे कारखानादारापुढे आव्हान ठरणार आहे. गतवर्षी ८०-२० असा फॉर्म्युला कारखानदारांनी मंजूर केला. मात्र, या हंगामात पहिल्या हप्त्याबाबत काय तडजोड होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्वच कारखानदार, जिल्हाधिकारी, शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन ऊस दराचा हा प्रश्न सोडवणे गरजेच आहे. (वार्ताहर)