शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

श्रीराम मंदिर सांस्कृतिक राजधानी बनेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:42 IST

सातारा : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने अयोध्या येथील मंदिर निर्माणासाठी निधी संकलन अभियान सुरू होणार आहे. हे मंदिर जगातील ...

सातारा : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने अयोध्या येथील मंदिर निर्माणासाठी निधी संकलन अभियान सुरू होणार आहे. हे मंदिर जगातील सांस्कृतिक राजधानी बनेल, असा विश्वास विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी व्यक्त केला.

सातारा येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परांडे म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र शासनाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली. न्यासाच्या विनंतीवरून पंतप्रधानांनी दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी श्री राम जन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन केले. प्रस्तावित मंदिर तीन मजल्यांचे असेल. प्रत्येक मजल्याची उंची २० फुटांची असेल. मंदिराची एकूण उंची १६१ फूट असेल, लांबी ३६० फूट आणि रूंदी २३५ फूट असेल. त्यावर पाच शिखरे असतील. हे मंदिर २.७ एकर जागेवर होईल. त्याचे संपूर्ण बांधकाम केवळ दगडांचे असेल. सिमेंट व लोखंडाचा वापर यात होणार नाही.

मंदिर उभारणीसाठी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीवरून १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत निधी समर्पण अभियान देशभर राबविले जात आहे. या माध्यमातून देशातील चार लाख गावे तसेच ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले आहे. आर्थिक पारदर्शिता राहावी म्हणून राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्यावतीने पावती पुस्तके व कूपन्सची रचना करून त्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्यात हे अभियान दिनांक १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत होणार आहे, अशी माहितीही परांडे यांनी दिली.