शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

शाॅर्टकट चुकीचाच; ही वेळबचत जीवघेणी ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:26 IST

सातारा : अनेक वाहनचालक शाॅर्टकट जाण्यासाठी राँगसाईडने प्रवास करत आहेत. हे स्वत:च्या आणि इतरांच्या जीवितास धोका असतानाही अनेक ...

सातारा : अनेक वाहनचालक शाॅर्टकट जाण्यासाठी राँगसाईडने प्रवास करत आहेत. हे स्वत:च्या आणि इतरांच्या जीवितास धोका असतानाही अनेक जण वाहतूक नियमांचे उल्लंघन करत आहेत.

शहरात सध्या वन वे नसला तरी काही ठिकाणी नो-एंट्री झोन आहेत. या ठिकाणी अनेक वाहनचालक नियम तोडून राँगसाईडने शाॅर्टकट मारत आहेत. जर त्या ठिकाणी पोलीस असले तर नक्कीच वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, पोलीस नसले की वाहनचालकांचे चांगलेच फावते.

मोती चौक

तांदूळ आळीतून अनेक जण राँगसाईडने मोती चाैकात येतात. अशा वेळी पोवई नाक्यावरून एखादे वाहन वेगात आले तर अपघात होऊ शकतो.

पोवई नाका

पोवई नाक्यावरून विरुद्ध दिशेने अनेक जण येतात. या वेळी अनेकदा या ठिकाणी अपघात झाले आहेत. मात्र, तरीसुद्धा वाहनचालक सुधारत नाही.

बसस्थानक

बसस्थानकासमोर नेहमीच वर्दळ असते. इथेही मंडईतून येणारे विरुद्ध दिशेने येतात. त्यामुळे या ठिकाणीही अनेक अपघात झाले आहेत.

गोडोली चाैक

गोडोली चाैकामध्येही राँगसाईडने येणारी वाहने अनेक आहेत. इथे पोलीस नसल्यामुळे वाहनचालक बिनधास्त आहेत.

विसावा नाका

बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैकातून साताऱ्यात वाहनचालक येत असतात. परंतु काही वाहन चालक विरुद्ध दिशने बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैकात जातात.

झेडपी चाैक

झेडपी चाैकामध्येही अनेकदा अपघात झाले आहेत. कोण कुठल्या दिशेने येते, हे समजत नाही. परंतु इथे पोलीस असतात. इतकीच जमेची बाजू

भूविकास बँक चाैक

या चाैकामध्ये रात्रीच्या सुमारास अपघातात होतात. अनेक दुचाकीस्वार शाॅर्टकट मारतात. त्यामुळे इथे सातत्याने अपघात होत आहेत.

करंजे नाका

करंजे नाक्यावरही अपघात होतात. इथे तिन्ही बाजूने रस्ते असल्यामुळे वाहनचालक राँगसाईडने येतात. त्यामुळे मग अपघात होतात.

पाचशे एक पाटी

शहरातील पाचशे एक पाटीजवळ नो-एंट्री असतानाही वाहनचालक शाॅर्टकट मारतात. इथं अपघात होत नाहीत; पण कारवाई होते.

राँग साईड : वर्षभरात जमा

झाला ८० हजारांचा दंड

nशहरात राँगसाईडने येणारे वाहन सर्वाधिक आहेत. या वाहनचालकांकडून वर्षभरात सुमारे ८० हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

nसर्वाधिक दंड हा मोती चाैक, पाचशे एक पाटी, पोवई नाका या ठिकाणी आकारण्यात आला आहे.

nकोरोनामुळे अनेकदा लाॅकडाऊन होते. त्यामुळे यंदा फारसा दंड आकारण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात अनेक वाहनचालक नो-एंट्रीतून येतात. अशा वेळी वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. अनेकदा वाहनचालकांना तोंडी सूचनाही दिल्या जातात. त्या वेळी काही वाहनचालक पोलिसांचे ऐकतात; पण जे एेकत नाहीत, नियम तोडतात, त्यांच्यावर दोनशे रुपये दंड आकारण्यात येतो.

- -विठ्ठल शेलार, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा