शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

सोशल मीडियावरील अफवेनंतर दुकाने शटरडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:39 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील अत्यावश्यक सेवेतील बहुतांशी दुकाने सोशल मीडियावरील अफवेमुळे अकरा वाजताच बंद करण्यात आली हाेती. ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील अत्यावश्यक सेवेतील बहुतांशी दुकाने सोशल मीडियावरील अफवेमुळे अकरा वाजताच बंद करण्यात आली हाेती. याबाबत सकाळपासूनच व्यापाऱ्यांच्यात याबाबतच्या चर्चेने गोंधळ सुरू होता.

याबाबत माहिती अशी की, सोशल मीडियावर सोमवारी मध्यरात्रीपासून नवीन नियमावली शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वेळेच्या निर्बंधासह सुरू असलेली अत्यावश्यक दुकाने आता सकाळी सात ते अकरा या वेळेतच चार तास सुरू ठेवायची आहेत. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अशा आशयाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट विविध पोस्ट अनेकांनी स्टेटसला ठेवलेल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचा गोंधळ उडाला होता. सकाळपासूनच अनेक व्यापारी एकमेकांना दूरध्वनीवरून चर्चा करून वेळेच्या बंधनाबाबतची खातरजमा करून घेत होते. मात्र सोशल मीडियाचा एवढा चुकीचा परिणाम झाला की, नव्व्याण्णव टक्के व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे शटर अकरा वाजताच डाऊन केले होते. त्यामुळे रहिमतपुरातील रस्ते पूर्णतः ओस पडले होते.

नगरपालिकेने गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई केली होती, तर काही दुकानांना सील ठोकले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पालिकेच्या कारवाईचा ससेमिरा टाळण्यासाठी कुठलीही खातरजमा न करता थेट दुकानांचे शटर बंद केल्याची चर्चा आहे. तर काही व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यात व नगरपालिकेमध्ये दूरध्वनीवरून विचारणा करून सोशल मीडियावरील अफवा असल्याचे जाणले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सायंकाळी सहापर्यंत सुरू ठेवली होती.

फोटो मेलवर आहे.

रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील व्यापाऱ्यांनी किराणा दुकाने बंद ठेवल्याने रस्ते ओस पडले होते. (छाया : जयदीप जाधव)