शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

दुकानदार, हातगाडीधारकांवर अन्याय करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:49 IST

सातारा : मंडई, बॅँका, शासकीय कार्यालय चालू आहेत. तेथे कोरोना होत नाही का? केवळ दुकानदार, हातगाडीधारकांवर अन्याय करू नका, ...

सातारा : मंडई, बॅँका, शासकीय कार्यालय चालू आहेत. तेथे कोरोना होत नाही का? केवळ दुकानदार, हातगाडीधारकांवर अन्याय करू नका, असा इशारा देत प्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध तातडीने शिथिल करावे, अशी मागणी कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले यांनी केली.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा संचारबंदीचे निर्बंध कठोर केले आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. प्रशासनाच्या या निर्णयास जिल्ह्यासह साताऱ्यातील व्यापाऱ्यांकडून विरोध दर्शविण्यात आला. तसेच मंगळवारी सकाळी साताऱ्यात व्यापाऱ्यांकडून मूक आंदोलनही करण्यात आले. राजवाडा, पोवई नाका येथे आंदोलक आपापल्या दुकानांच्या बाहेर कुटुंबासह हातात मागण्यांचे फलक घेऊन उभे होते. या आंदोलनाला वेदांतिकाराजे भोसले यांनी पाठिंबा दर्शविला.

वेदांतिकाराजे म्हणाल्या, कोरोनामुळे संचारबंदीचे केव्हाही लागू केली जात आहे व केव्हाही शिथिल केली जात आहे. कोरोना हा केवळ साताऱ्यातच आहे का, उत्तर प्रदेश, गुजरात येथे लोकसंख्या मोठी आहे. तेथे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला; परंतु टाळेबंदी अल्प प्रमाणात होती. आपल्याकडे दोन ते तीन महिने टाळेबंदी केली जात आहे. यामुळे लोकांनी जगायचे कसे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पैसे नसल्याने लोक हतबल होऊ लागले आहेत. आत्महत्या वाढू लागल्या आहेत.

कृष्णा कारखान्याची निवडणूक झाली. त्या वेळेस सभा झाल्या. तेव्हा कोरोना नव्हता का. कोरोनाच्या दुसरा टप्प्यात निवडणूक झाली तेव्हा प्रशासन का करीत होते. सरसकट बंद ठेवणे योग्य नाही. मंडई, बॅँका, शासकीय कार्यालय चालू आहेत. तेथे कोविड होत नाही का? केवळ दुकानदार, हातगाडीधारकांवर अन्याय करु नका. प्रशासनाने तातडीने संचारबंदीचे निर्बंध शिथिल करून व्यापारीवर्गास दिलासा द्यावा.

फोटो : ०६ सातारा आंदोलन

संचारबंदीचे निर्बंध शिथिल करावे या मागणीसाठी मंगळवारी साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी हातात फलक घेऊन मूक आंदोलन केले. (छाया : जावेद खान)