शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे शिवार हिरवेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यापर्यंत वाहिल्याने सिमेंट बंधारे, पाझर तलावात पाणी टिकून ...

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यापर्यंत वाहिल्याने सिमेंट बंधारे, पाझर तलावात पाणी टिकून शेती हिरवीगार झाली आहे. यंदा पाण्याची टंचाई कमी प्रमाणात जाणविल्याने शेतकरीही चिंतामुक्त दिसत आहेत.

फलटण तालुका म्हटला की, दुष्काळी भाग. या दुष्काळामुळे तरुणांची लग्न जमविण्यात अडचणी, अर्ध गाव माथाडी कामगार अन् रोजगार हमीवर असायचे, पाण्यासाठी माणसांबरोबरच जनावरांचे स्थलांतर ठरलेलं, नळपाणीपुरवठा योजनेवर प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करूनही पाणीटंचाई कायम यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून माजी आमदार दिवंगत शिवाजीराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दिवंगत डॉ.कृष्णचंद्र भोईटे यांनी जललक्ष्मी, पाणी अडवा पाणी जिरवा या योजनांतून तालुक्यात पाणी अडविण्याचा प्रयत्न केला.

धोम धरणाच्या कालव्यातून शिवथर खिंडीतून कालव्याद्वारे कोरेगाव, फलटण तालुक्याला पाणी आणण्यासाठी सर्वेक्षण झाले. माजी खासदार दिवगंत हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पाणीप्रश्नावर सातत्याने आवाज उठविला होता.

त्यानंतर, भाजप-शिवसेना युतीचे शासन आले. त्यांना अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामध्ये फलटणचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर होते. त्यांनी धोम-बलकवडी धरणासाठी प्रयत्न करून युती शासनाच्या माध्यमातून धोम-बलकवडी धरणाचे काम सुरू केले, पण कालव्याची कामे संथ गतीने झाली. अखेर दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धोम बलकवडी उजव्या कालव्याची कामे मार्गी लागली व आदर्की ते आंदरूडपर्यंत धोक-बलकवडीचे पाणी पोहोचले. गत सहा वर्षांपासून पाणी टप्प्याटप्प्याने फलटण तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले. यंदा मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धोक-बलकवडी कालव्यात पाणीसाठी टिकून असल्याने याचा शेतीला मोठा फायदा झाला. पिके चांगली आल्याने बळीराजाही सुखावला आहे.