शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे शिवार हिरवेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:44 IST

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यापर्यंत वाहिल्याने सिमेंट बंधारे, पाझर तलावात पाणी टिकून ...

आदर्की : फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडीचे पाणी मे महिन्याचे शेवटच्या आठवड्यापर्यंत वाहिल्याने सिमेंट बंधारे, पाझर तलावात पाणी टिकून शेती हिरवीगार झाली आहे. यंदा पाण्याची टंचाई कमी प्रमाणात जाणविल्याने शेतकरीही चिंतामुक्त दिसत आहेत.

फलटण तालुका म्हटला की, दुष्काळी भाग. या दुष्काळामुळे तरुणांची लग्न जमविण्यात अडचणी, अर्ध गाव माथाडी कामगार अन् रोजगार हमीवर असायचे, पाण्यासाठी माणसांबरोबरच जनावरांचे स्थलांतर ठरलेलं, नळपाणीपुरवठा योजनेवर प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करूनही पाणीटंचाई कायम यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून माजी आमदार दिवंगत शिवाजीराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार दिवंगत डॉ.कृष्णचंद्र भोईटे यांनी जललक्ष्मी, पाणी अडवा पाणी जिरवा या योजनांतून तालुक्यात पाणी अडविण्याचा प्रयत्न केला.

धोम धरणाच्या कालव्यातून शिवथर खिंडीतून कालव्याद्वारे कोरेगाव, फलटण तालुक्याला पाणी आणण्यासाठी सर्वेक्षण झाले. माजी खासदार दिवगंत हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पाणीप्रश्नावर सातत्याने आवाज उठविला होता.

त्यानंतर, भाजप-शिवसेना युतीचे शासन आले. त्यांना अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला. त्यामध्ये फलटणचे आमदार रामराजे नाईक-निंबाळकर होते. त्यांनी धोम-बलकवडी धरणासाठी प्रयत्न करून युती शासनाच्या माध्यमातून धोम-बलकवडी धरणाचे काम सुरू केले, पण कालव्याची कामे संथ गतीने झाली. अखेर दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर धोम बलकवडी उजव्या कालव्याची कामे मार्गी लागली व आदर्की ते आंदरूडपर्यंत धोक-बलकवडीचे पाणी पोहोचले. गत सहा वर्षांपासून पाणी टप्प्याटप्प्याने फलटण तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले. यंदा मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धोक-बलकवडी कालव्यात पाणीसाठी टिकून असल्याने याचा शेतीला मोठा फायदा झाला. पिके चांगली आल्याने बळीराजाही सुखावला आहे.