शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

शिवसेनेचा इशारा : गरिबांचे संसार उद्ध्वस्त करून धनिकांना सूट का?

By admin | Updated: February 2, 2015 00:04 IST

गोरगरिबांचे संसार निर्दयीपणे उद््ध्वस्त करणारी शासनयंत्रणा धनदांडग्यांच्या पुढे हतबल होणार असेल, तर शिवसेनेच्या पद्धतीने धडा शिकविला जाईल,

सातारा : रस्ता रुंदीकरणात आड येणारी अतिक्रमणे काढताना दुजाभाव सहन केला जाणार नाही. तसेच रस्त्यात येणाऱ्या सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांचा अपवाद केला जाऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे सातारा विभाग संपर्कप्रमुख नरेंद्र पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे. गोरगरिबांचे संसार निर्दयीपणे उद््ध्वस्त करणारी शासनयंत्रणा धनदांडग्यांच्या पुढे हतबल होणार असेल, तर शिवसेनेच्या पद्धतीने धडा शिकविला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.पत्रकात म्हटले आहे की, रस्ता रुंदीकरणाचे काम होणे समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक असून, अतिक्रमण काढताना किंवा आवश्यक असणारी जागा ताब्यात घेताना कोणत्याही परिस्थितीत दुजाभाव केला जाऊ नये. सध्या सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत सर्वसामान्यांच्या मनात शंका आहे. पोवई नाक्यावरील अनेक दुकाने अतिक्रमणात असून, तेथे पथकाची कारवाई का केली जात नाही? विशिष्ट व्यक्तींचे व्यापारी प्रकल्प पूर्णत्वाकडे आल्यावरच अतिक्रमण हटाव मोहीम राबवून टपरीधारकांना उद््ध्वस्त का केले जात आहे, असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. प्रार्थनास्थळे हटविण्याबरोबरच नाल्यांचे बांधकाम सरळ रेषेत व रस्त्याच्या कडेनेच करण्यात यावे, अशी मागणी करून पत्रकात म्हटले आहे की, शासनाच्या, महामंडळांच्या तसेच पालिकेच्या सर्व खुल्या जागांमध्ये शक्य होईल तितक्या फेरीवाल्यांना, फळविक्रेत्यांना सामावून घ्यावे. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास प्रशासनाला तीव्र जनक्षोभास सामोरे जावे लागेल आणि अतिक्रमण हटाव मोहिमेचे काम करू दिले जाणार नाही, असा इशाराही शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)