शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळमध्ये गुंड पोसण्याचे कारखाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2015 21:34 IST

औद्योगिकीकरणास डोकेदुखी : असंख्य प्रकरणे मिटविण्यासाठी तरुणांकडून साम, दाम, दंड, भेदचा वापर

मुराद पटेल - शिरवळ    परिसरातील वाढते औद्योगिकीकरण विकासाला पुरक ठरत असले तरी त्याचप्रमाणे डोकेदुखी ठरू लागली आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून स्थानिक तरुणांमध्ये ‘सेटलमेंट गुरु’चा फंडा वाढीस लागला आहे. यामध्ये आम, दाम, साम, दंड यांचा वापर केला जात आहे.केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयामुळे खंडाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व लघु उद्योगांचे जाळे निर्माण झाले आहे. याठिकाणी उद्योगांचे जाळे निर्माण झाल्याने तरुणांना रोजगार निर्मिती होऊन तालुक्याचा कायापालट होऊन विकासाची दारे खुली होतील, अशी स्वप्ने येथील जनतेला पडली होती. मात्र, या विकासाबरोबर पुण्याच्या धर्तीवर अपप्रवृत्तीही फोफावली आहे. तालुक्यातील तरुणांमध्ये कमी वेळ, कमी श्रमात जास्त पैसा हा कानमंत्र मोठ्या प्रमाणात घुमू लागला आहे. यामधून तरुण पिढी एकत्र येत उद्योगांना येणाऱ्या समस्या किंवा इतर बाबींमध्ये येणाऱ्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तरुणांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडीतून चांगला पैसा मिळू लागला आहे. त्यामुळे सध्या खंडाळा तालुक्यातील तरुणांमध्ये ही प्रवृत्ती वाढीस लागली आहे. यामध्ये संबंधितांना राजकीय आश्रयही मिळत असल्याने संबंधित तरूणांचे दिवस जोमात आहेत. याच प्रकारातून शिरवळ येथे भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर सोमवारी प्राणघातक हल्ला झाल्याची चर्चा आहे.औद्योगिक कंपन्यांना लागणारा कामगार, पाणी यासारख्या मुलभूत गरजा पुणे येथील एजन्सीकडून पूर्ण केल्या जातात. तर काही प्रमाणात स्थानिकांकडून पुरविल्या जातात. मात्र, याठिकाणीही भूमिपुत्रांचा स्वाभीमान जागा झाल्याने येथील कंपन्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या गाड्या अडविल्या होत्या. यामध्ये संबंधित पाणीपुरवठादार व स्थानिकांमध्ये किरकोळ वादावादी झाली होती.यावेळी संबंधित पुरवठादाराने येथील कुख्यात गुन्हेगारी असणाऱ्या वैभव शिवतरे यांच्याबरोबर संपर्क साधत हा प्रश्न सोडविण्यासाठी आर्थिक तडजोडी केल्याचे येथील स्थानिकांचा दावा असून याबाबत परिसरात चर्चाही रंगू लागली आहे. यामधूनच स्थानिकांमध्ये व वैभव शिवतरे याच्या काही साथीदारांसमवेत पंढरपूर फाटा येथे चार ते पाच दिवसांपूर्वी मारामारीही झालेली होती. यावेळी काहींनी पुढाकार घेत हा वाद मिटविला होता. यामध्ये सोमवार प्राणघातक हल्ला झालेला तौसिक काझी हा भांडणे सोडविण्याच्या कारणावरुन वैभव शिवतरे व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला, असल्याची फिर्याद शिरवळ पोलीस ठाण्यात तौसिक काझी याने दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे खंडाळा तालुक्यातील विशेषत: शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलीस प्रशासन काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. खंडाळा तालुक्यामध्ये वाढते ओद्योगिकीकरण होत असताना विकासाबरोबरच तरुण पिढीला योग्य रोजगार मिळणे गरजेचे बनले आहे. आजच्या परिस्थितीत सोमवारी झालेल्या घटनेवरुन एकच निदर्शनास येते की तालुक्यातील तरुण पिढी ही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे तर चालली नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्याच्या भविष्यासाठी व तरुण पिढीच्या उत्कर्षासाठी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपाआपले मतभेद विसरुन एकत्र येत तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.- नितीन भरगुडे-पाटील, सदस्य, पंचायत समिती खंडाळा राजकीय हस्तक्षेप बंद होणार का?शिरवळ हे तालुक्यातील एक प्रमुख शहर म्हणून गणले जात आहे. येथील औद्योगिकीकरणामुळे स्थलांतरीत झालेला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याठिकाणी कंपन्यांमधून आपले वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी येथे संघंटीत टोळ्याही मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या आहेत. या टोळ्यांवर नियंत्रण कोण आणणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्येच संबंधितांना राजकीय आश्रय मिळत असल्याने या टोळ्या मोठ्या प्रमाणावर वाढीस लागल्या आहेत.