शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

शेट्टी, खोतांची मंित्रपदासाठी नौटंकी!

By admin | Updated: December 8, 2015 00:31 IST

पंजाबराव पाटील : ‘स्वाभिमानी’ला आंदोलनासाठी कार्यकर्तेच मिळणार नसल्याचा दावा

सातारा : ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा गळा कापणाऱ्या मोदी सरकारशी खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी दोस्ती केली आहे. मंत्रिपद मिळण्याच्या आशेने या दोघांनीही भाजपचा हात धरला होता. आता मंत्रिपद मिळत नसल्याचे दिसल्यानंतर त्यांना ऊस उत्पादकांचा पुळका आला असून, आता ते आंदोलनाची भाषा वापरून नौटंकी करत आहेत,’ असा घणाघात बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उसाला एक रकमी मिळाली पाहिजे, येत्या आठ दिवसांत शासनाने याबाबत निर्णय घ्यावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांसमोर पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. पाटील म्हणाले, ‘स्वामिनाथन कमिटीच्या निर्णयाला केंद्रातील मोदी सरकारने विरोध केला होता. मंत्रिपद मिळेल, या आशेने शेट्टी यांनी त्यांचा हात धरला. आमच्या जीवावर त्यांनी आंदोलने उभी केली, मात्र त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आता मंत्रिपद मिळेना असे वाटू लागल्याने ते आंदोलनाची भाषा वापरू लागले आहेत. शेट्टी यांच्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला असल्याने आता लढणारी फौज त्यांच्यासोबत राहिलेली नाही,’ असा टोलाही पाटील यांनी लगावला.दरम्यान, सध्या रयत सहकारी साखर कारखाना शासनाचा गळीत परवाना नसताना व पाठीमागील गळीत हंगामातील गेलेल्या उसाचे बिल अद्याप दिले नसताना तसेच तोडणी व वाहतूकदारांचे बिल अद्याप दिले नसताना कारखाना सुरू झाला आहे. ‘एफआरपी’प्रमाणे दर देण्यासाठी ६ कोटी ११ लाख ९0 हजार इतके सॉफ्ट लोन शासनाने मंजूर करूनही नव्याने प्रशासक आलेल्या अथणी शुगर प्रा. लि. ने हे कर्ज नाकारले आहे. यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू शकतो. येत्या आठवडाभरात यावर निर्णय घ्यावा. तसेच ‘एफआरपी’प्रमाणे एकरकमी दर न देणाऱ्या कारखान्यांच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी इस्लापूरचे डी. जी. पाटील, चंद्रकांत यादव, दीपक पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी) तर अधिकाऱ्यांचे अपहरणऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी रक्तरंजित क्रांती केली जाईल. एसी मध्ये बसून शेतीचे धोरण ठरविणाऱ्या अधिकाऱ्यांचे अपहरण करुन त्यांना डोंगरात नेऊन ठेवू, असा इशारा डी. जी. पाटील यांनी यावेळी दिला.