शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

आंब्रुळकरवाडीत पाण्याची तीव्र टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:36 IST

ढेबेवाडी विभागात तीन धरणे आहेत. मात्र, पठारी भाग मोठा आहे. त्यामुळे डोंगर माथ्यावर असलेल्या गावांना कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा ...

ढेबेवाडी विभागात तीन धरणे आहेत. मात्र, पठारी भाग मोठा आहे. त्यामुळे डोंगर माथ्यावर असलेल्या गावांना कमी-अधिक प्रमाणात पाणीटंचाईच्या झळा बसतात. डोंगर माथ्यावर झालेली प्रचंड वृक्षतोड, घटलेले पर्जन्यमान व पठारावर जलसंधारणाचा अभाव यामुळे भूगर्भातील घटलेली पाण्याची पातळी हे आजचे चित्र आहे. डोंगरातले नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र नष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

आंब्रुळकरवाडी ही भोसगाव ग्रामपंचायीतअंतर्गत येत असून भोसगावच्या पश्चिमेला डोंगर माथ्यावर पाचशे लोकसंख्या असलेल्या या वाडीत उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच दरवर्षी भीषण पाणी टंचाई निर्माण होते. भोसगावला मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र, डोंगर माथ्यावर टंचाई आहे. सध्या शंभर कुटुंबांची दोन-तीन घागरी पाण्यासाठी विहिरीवर झुंबड उडत आहे, तर पशुधन वाचविण्यासाठी पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते.

- चौकट

कायमस्वरूपी उपाययोजना करा!

आंब्रुळकरवाडीला प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. टंचाई निर्माण झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करण्यात येते. उन्हाळा संपल्यानंतर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती असते. तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा पाण्याच्या उपलब्धतेसाठी येथे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

- कोट

भोसगाव ग्रामपंचायती अंतर्गत आंब्रुळकरवाडी डोंगर माथ्यावर आहे. येथील दळणवळणाचा प्रश्न सोडविला आहे. पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत विचार सुरू आहे.

- प्रतापराव देसाई

उपसभापती, पाटण पंचायत समिती