शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आपसातील वाद गावातच मिटवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:46 IST

मल्हारपेठ : ‘सार्वजनिक जीवनात ग्रामीण भागातील खेडोपाडी निर्माण होणारे छोटे मोठे वाद हे गावातच मिटवावेत. पोलीस स्टेशनला यायची वेळ ...

मल्हारपेठ : ‘सार्वजनिक जीवनात ग्रामीण भागातील खेडोपाडी निर्माण होणारे छोटे मोठे वाद हे गावातच मिटवावेत. पोलीस स्टेशनला यायची वेळ येऊच नये, यासाठी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष व पोलीस पाटील यांनी समन्वय साधून गावातील तंंटे गावातच मिटवावेत,’ असे मत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यानी व्यक्त केले.

मल्हारपेठ, ता. पाटण येथे शासन आदेशानुसार सुरू होत असलेल्या मल्हार पेठ पोलीस स्टेशनचा प्रारंभ गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी रणजित पाटील, मल्हारपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर, उपनिरीक्षक अजित पाटील, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, जिल्हा परिषद सदस्य सुग्रा खोंदु आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून तालुक्यात कुठेही मोठा प्रसंग घडलेला नाही. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस हा जनतेचा मित्र असला पाहिजे. गावातील तंटे गावातच मिटवण्यासाठी दिवंगत आर. आर. पाटील यांनी निर्णय घेऊन तंटामुक्त समित्या स्थापन केल्या. त्यामुळे पोलिसांचा ताण कमी झाला आहे. मी गृहराज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलिसाच्या निवासाचा प्रश्न मिटवण्यासाठी ७५० कोटीची तरतूद केली आहे. तर नव्याने काही पोलीस स्टेशनच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले. त्यापैकी मल्हारपेठ पोलीस स्टेशनचा प्रश्न मार्गी लावला आहे. लवकरच नवीन इमारतीत सर्व कामे सुरु होतील.

फोटो : ०९केआरडी०१

कॅप्शन : मल्हारपेठ, ता. पाटण येथे पोलीस स्टेशनच्या प्रारंभप्रसंगी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे भाषण झाले.