शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

फलटण अन् कोरेगावच्या नेत्यांना गडचिरोलीला पाठवू

By admin | Updated: June 13, 2016 00:19 IST

जयकुमार गोरे : रामराजेंवर टीकास्त्र; शशिकांत शिंदेंना कुणी विचारत नसल्याचा टोला

खटाव : ‘प्राध्यापक फलटणकरांना सैराट या शब्दाचा अर्थ तरी कळतो का? सैराट म्हणजे बेभान आणि मी जनतेच्या कामांसाठी सुरुवातीपासूनच बेभान आहे. मात्र, बारामतीला मुजरा घालणाऱ्या, स्वत:चा स्वाभिमान गहाण टाकणाऱ्यांना जनतेचे देणे-घेणे नाही. कोरेगावकरांना तर आता कुणी विचारत नाही. त्यामुळे त्यांचे तोंड चालायला लागले आहे. माण-खटावच्या नादाला लागल्यावर थेट गडचिरोलीला जावे लागते,’ असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार शशिकांत शिंदे यांना नाव घेता लगावला. निमसोड, ता. खटाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन व जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी अजित देशमुख, माजी सभापती अशोक गोडसे, ज्येष्ठ नेते धोंडिबापू मोरे, प्रदीप जाधव, काकासाहेब मोरे, डॉ. महेश गुरव, सोमनाथ भोसले, पंचायत समिती सदस्य डॉ. विवेक देशमुख, भरतशेठ जाधव, अ‍ॅड. सूरज पाटील, तुकाराम देवकर, शंकर माळी, सोमनाथ बुधे, मोहन देशमुख, सचिन फडतरे, चंद्रकांत देशमुख, सुखदेव फडतरे, नीलेश करपे, विजय मोरे, राजेश निकम, तानाजी देशमुख आदी उपस्थित होते. रामराजे आणि शशिकांत शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेताना आमदार गोरे म्हणाले, ‘फलटणकर राजे पृथ्वीच्या अंतापर्यंत माण-खटावमध्ये पाणी येणार नाही, असे सांगायचे. त्यांनी कधी त्यासाठी प्रयत्न केलेच नाहीत. त्या माणसांनी नेहमी खोडा घालायचे काम केले. त्यांनी प्रयत्न केले असते तर २० वर्षांपूर्वीच आपल्याकडे पाणी आले असते. आपल्या भागाचा कायापालट झाला असता. या भागाला पाण्यापासून वंचित ठेवणारे फलटकर मला बघून घेण्याची भाषा करीत आहेत. माझ्याकडे खरे तर त्यांनी एकदा बघावेच. कोरेगावकरांना कोणी विचारत नाही म्हणून परवा त्यांनी तोंड उघडले. मी आमदार झाल्यापासून माण-खटावकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होत नाही. बारामती, फलटणला मुजरे घालणाऱ्यांनी जरा जपून बोलावे असे सांगून आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘निमसोडच्या विकासात कधीच कमी पडलो नाही. इथले दोन्ही नेते निक्रिय आहेत. त्यांना ज्या जनतेने मोठे केले. त्या जनतेचाच त्यांनी विश्वासघात केला. काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या गाडीत बसून त्यांची पायताणे उचलून गावाचा विकास होत नाही.’ असा टोलाही त्यांनी लगावला. (वार्ताहर)विरोधकांची बिनचाकाची गाडी...या कार्यक्रमात दिलीप देशमुख आणि महेंद्र देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांचा सत्कार केला. आता विरोधकांच्या गाडीची चाकेच आपल्याकडे आली आहेत. त्यांच्या बिनचाकाच्या गाडीत कुणी बसणार नाही, असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला. यावर मात्र टाळ्यांचा पाऊस पडला. विरोधकांची बिनचाकाची गाडी...या कार्यक्रमात दिलीप देशमुख आणि महेंद्र देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांचा सत्कार केला. आता विरोधकांच्या गाडीची चाकेच आपल्याकडे आली आहेत. त्यांच्या बिनचाकाच्या गाडीत कुणी बसणार नाही, असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला. यावर मात्र टाळ्यांचा पाऊस पडला.