शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाकडून बीज साक्षरता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:38 IST

औंध : दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी मंडल कृषी विभागाने बियाणे उगवण क्षमता चाचणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बीज साक्षर करण्याची मोहीम ...

औंध : दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी मंडल कृषी विभागाने बियाणे उगवण क्षमता चाचणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बीज साक्षर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अनेकदा शेतकरी घरातील बियाणे पेरत असतात; मात्र ते बियाणे व्यवस्थित उगवले नाही तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहून आर्थिक नुकसान होते. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागू नये यासाठी खटाव कृषी विभागाच्या वतीने सध्या बियाणे उगवण क्षमता चाचणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. औंध मंडल विभागातील कार्यक्षेत्रात मंडल कृषी अधिकारी अक्षय सावंत, पर्यवेक्षक मोहन मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक उत्तमराव तिकुटे, आर. एस. ठोंबरे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. यामध्ये शेतकऱ्यांनी जर बियाणे जास्त उन्हात वाळवले तसेच बियाणाची साठवण करताना थप्पी लावली तर दाब पडल्याने तळाच्या पोत्यातील बियांचा डोळा खराब होतो. याशिवाय जास्त क्षमतेच्या मशीनने गाळप केले तरी बियाणाची उगवण क्षमता कमी होते. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दाखविलेल्या चाचणीचे प्रात्यक्षिक करून आपल्या घरातील बियाणाची चाचणी करावी, असे आवाहन कृषी साहाय्यक उत्तमराव तिकुटे यांनी केले आहे.

या वेळी बापूसाहेब वाघ, विष्णू वाघ, गणेश बोटे, शशिकांत जाधव, सचिन जाधव, अधिक जाधव, तुळसीदास जाधव, अतुल जाधव, महेश जाधव, तात्यासाहेब जाधव, दिलीप जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

(कोट)

बियाणे व्यवस्थित उगवले नाही तर दुबार पेरणीमुळे पेरणी मशागतीचा खर्च नाहक सोसावा लागतो. परंतु शेतकऱ्यांना बीज उगवण क्षमता चाचणी समजल्यामुळे बियाणाची खात्री करून घेता येईल. यामुळे दुबार पेरणी करावी लागणार नाही. शेतकऱ्यांना ही पद्धत फायदेशीर ठरेल.

- अक्षय सावंत, मंडल कृषी अधिकारी

फोटो : १२ औंध

औंध येथे शेतकऱ्यांना बीज उगवण प्रात्यक्षिक दाखविताना कृषी साहाय्यक उत्तमराव तिकुटे, आर. एस. ठोंबरे उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)