शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

कृषी विभागाकडून बीज साक्षरता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:38 IST

औंध : दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी मंडल कृषी विभागाने बियाणे उगवण क्षमता चाचणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बीज साक्षर करण्याची मोहीम ...

औंध : दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी मंडल कृषी विभागाने बियाणे उगवण क्षमता चाचणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बीज साक्षर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अनेकदा शेतकरी घरातील बियाणे पेरत असतात; मात्र ते बियाणे व्यवस्थित उगवले नाही तर शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे राहून आर्थिक नुकसान होते. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागू नये यासाठी खटाव कृषी विभागाच्या वतीने सध्या बियाणे उगवण क्षमता चाचणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. औंध मंडल विभागातील कार्यक्षेत्रात मंडल कृषी अधिकारी अक्षय सावंत, पर्यवेक्षक मोहन मदने यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक उत्तमराव तिकुटे, आर. एस. ठोंबरे यांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. यामध्ये शेतकऱ्यांनी जर बियाणे जास्त उन्हात वाळवले तसेच बियाणाची साठवण करताना थप्पी लावली तर दाब पडल्याने तळाच्या पोत्यातील बियांचा डोळा खराब होतो. याशिवाय जास्त क्षमतेच्या मशीनने गाळप केले तरी बियाणाची उगवण क्षमता कमी होते. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दाखविलेल्या चाचणीचे प्रात्यक्षिक करून आपल्या घरातील बियाणाची चाचणी करावी, असे आवाहन कृषी साहाय्यक उत्तमराव तिकुटे यांनी केले आहे.

या वेळी बापूसाहेब वाघ, विष्णू वाघ, गणेश बोटे, शशिकांत जाधव, सचिन जाधव, अधिक जाधव, तुळसीदास जाधव, अतुल जाधव, महेश जाधव, तात्यासाहेब जाधव, दिलीप जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.

(कोट)

बियाणे व्यवस्थित उगवले नाही तर दुबार पेरणीमुळे पेरणी मशागतीचा खर्च नाहक सोसावा लागतो. परंतु शेतकऱ्यांना बीज उगवण क्षमता चाचणी समजल्यामुळे बियाणाची खात्री करून घेता येईल. यामुळे दुबार पेरणी करावी लागणार नाही. शेतकऱ्यांना ही पद्धत फायदेशीर ठरेल.

- अक्षय सावंत, मंडल कृषी अधिकारी

फोटो : १२ औंध

औंध येथे शेतकऱ्यांना बीज उगवण प्रात्यक्षिक दाखविताना कृषी साहाय्यक उत्तमराव तिकुटे, आर. एस. ठोंबरे उपस्थित होते. (छाया : रशिद शेख)