शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

पुलावरील खड्ड्यात घोटाळतोय मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 14:33 IST

अपघाताची भिती : कालगाव येथे रस्त्याची चाळण

आॅनलाईन लोकममसूर (जि. सातारा), दि. २२ :कालगांव ते कवठे रस्त्यावर कालगाव गावानजीक फरशी पुलावर खड्डे पडले आहेत. या पुलावरून दुचाकीस्वारांची मोठी रहदारी असते. सध्या या खड्ड्यात पाणी साचल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने पुलावरील खड्डे मुजविणे गरजेचे बनले आहे.कालगाव येथील फरशी पुलावर बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच पुलाच्या दोन्ही बाजूला नाल्यामध्ये घाण साचून राहीली आहे. परिसरात झाडे-झुडूपे वाढली असल्याने याठिकाणचे पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची वेळीच डागडुजी केली असती तर रस्त्याची एवढी दुर्दशा झाली नसती. वेणेगांव, कोपर्डे, तुकाईवाडी, कालगाव, खराडे, कवठे, वडोली भिकेश्वर या गावांसाठी हा रस्ता महत्वपुर्ण आहे. या गावांच्या रहदारीचा विचार करूनच संबंधित रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, रस्ता तयार केल्यापासून बांधकाम विभागाने एकदाही त्याची डागडूजी केलेली नाही. काही वषार्पुर्वी या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले होते. त्याचवेळी ते भरून घेतले असते तर पुढे रस्त्याची चाळण झाली नसती.सध्या कालगाव येथे फरशी पुलावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने या खड्ड्यात पाणी साचत असून गढूळ पाण्यामुळे या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी, येथे दुचाकीस्वाराचा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालगाव-पेरले पुल झाल्यामुळे या मार्गावरून राष्ट्रीय महामार्गावरही जाता येते. परिणामी, या रस्त्यावरून वाहतूकीची वर्दळ दिवसेंदिवस वाढतच आहे. बांधकाम विभागाने रस्त्याची पाहणी करून दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.