शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

बोल बजरंग भली की जय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:42 IST

श्रावण महिन्यात दहीहंडीचा सोहळा साजरा करण्यात येतो. पण, दोन वर्षात कोरोना विषाणूच्या संकटामुळे या दहीहंडीवर निर्बंध आले आहेत. तरीही ...

श्रावण महिन्यात दहीहंडीचा सोहळा साजरा करण्यात येतो. पण, दोन वर्षात कोरोना विषाणूच्या संकटामुळे या दहीहंडीवर निर्बंध आले आहेत. तरीही दहीहंडीचा उत्साह गोविंदा पथकात कायम असतो. सातारा जिल्ह्याचा विचार करता सातारा शहराबरोबरच ग्रामीण भागातही काही गोविंदा पथके आहेत. ही पथके दहीहंडी फोडून बक्षीस मिळवण्याच्या उद्देशानेच कार्यरत असतात. काही पथके तर जिल्ह्याबरोबरच बाहेरील ठिकाणीही जाऊन दहीहंडी फोडून बक्षिसे पटकवतात. पण, दहीहंडी फोडणे व बक्षीस मिळविणे सोपे काम नाही. यासाठी गोविंदाच्या अंगी धाडस लागते. त्याचबरोबर सराव आणि कौशल्यही महत्त्वाचे ठरते.

दहीहंडीच्या पूर्वी काही दिवस गोविंदा पथक तयारीला लागते. खाली कोण उभे राह्याचे. मध्यावर कोण, किती थरापर्यंत तयारी करायची, कोणाला सामील करून घ्यायचे व सर्वात वर कोण जाऊन हंडी फोडणार याचा विचार करून तयारी करण्यात येते. या पथकांमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच नोकरी, व्यवसाय करणारे तरुणही असतात. यामुळे रात्रीच्यावेळीही सराव केला जातो. उंच थर रचले जातात. त्यानंतर काही दिवसांच्या सरावानंतर गोविंदा पथके सज्ज होतात.

जेवढी दहीहंडी उंच, तेवढाच थरार अधिक असतो. उंच दहीहंडी पाहण्यासाठी शौकिनांचा वेढाही तेवढाच असतो. गोविंदांचे धाडस, कौशल्य यावेळी अनुभवास मिळते. कारण, दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गोविंदाच्या अंगावर पाण्याचे फवारे उडविले जातात. त्यातच खालील माती निसरडी होते. कपडे ओलेचिंब होतात. अशावेळी सर्वात खाली उभे राहणाऱ्यांचा खरा कस लागतो. त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा अशा थरापर्यंत मनोरा चढवला जातो. हे थर लावताना वर जाणाऱ्यांना पाय कोठे ठेवायचा, कोठे धरायचे याचे प्रशिक्षण मिळालेले असते. यामधील कोणी गोविंदा डगमगलाच तर गोविंदाचे सर्व थर खाली कोसळतात. त्यामुळे पाय घट्ट ठेवूनच थर रचावे लागतात. तेव्हा कोठे दहीहंडी फुटली जाते. पण, यासाठी कौशल्य, सराव, धाडस महत्त्वाचे ठरते हे नक्की.

चौकट :

जवळवाडीचे गोविंदा पथक...

आभाळाशी स्पर्धा करण्याचे साहस जिद्द, चिकाटी आणि एकजुटीने सात थर रचणारा सातारा जिल्ह्यातील अनेक बक्षिसांचा मानकरी ठरलेला अजिंक्य संघ म्हणजेच जावळी तालुक्यातील जवळवाडीचे भैरवनाथ गोविंदा पथक. जवळवाडीतील या गोविंदा पथकाने इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर या शहरांमध्ये जाऊन अनेक दहीहंड्या फोडण्याचा मान मिळवला आहे.

कोट :

भैरवनाथ गोविंदा पथकाने एक आव्हान म्हणून सातत्याने पाच वर्षे आपला गोविंदा पथकाचा विजयाचा सिलसिला सुरू ठेवला. उत्तरोत्तर आयोजक कमी होत गेले. त्यानंतर आलेला कोरोनाचा काळ पाहता हा साहसी खेळ थांबला. खरेतर शासनाने अशा या गोविंदा पथकांना, मराठमोळ्या सण-उत्सवांना मोठ्या प्रमाणात मदत करायला हवी. तरच हे साहसी खेळ टिकतील.

- रामदास सुरेश जवळ

भैरवनाथ गोविंदा पथक, जवळवाडी.

फोटो दि.२७ सातारा दहीहंडी गोविंदा फोटो (मेल)

......................................................................