शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘आॅनर किलिंग’चा साताऱ्यात निषेध

By admin | Updated: December 19, 2015 01:08 IST

सहआरोपींचा शोध घ्या : महिला लोक आयोग संघटनेची मागणी

सातारा : कोल्हापूर येथे घडलेल्या ‘आॅनर किलिंग’च्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी ‘राज्य महिला लोक आयोग’ या संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या भावांनी आणि त्याच्या मित्राने हा खून केला, त्यांना पाच तासांत पोलिसांनी अटक केली ही चांगली गोष्ट आहे. परंतु, या दोघांना सख्ख्या बहिणीचा खून करायला लावणारे आणि जातीसाठी भयंकर कृत्य करायला उद्युक्त केले. त्या सर्वांचा पोलिसांनी शोध घेऊन भारतीय दंड संहितेनुसार कट करून खून केल्याप्रकरणी सहआरोपी करून ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. राज्य शासनाने ‘आॅनर किलिंग’संदर्भातील विधेयकाचे कायद्यात रूपांतर करावे. तरुण मुला-मुलींना बदललेल्या मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये जाती-धर्मापलीकडे जाऊन आपला जोडीदार निवडण्याचा, त्याच्याशी लग्न करून सुखी होण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला आहे. तरीही पुरुषसत्ताक व्यवस्थेची तरुण पिढी बळी जात आहे. हे आपण शांतपणे बघू शकत नाही. काही स्त्रियांदेखील संघर्ष नको म्हणून कुटुंबाअंतर्गत शांत राहून त्या जीवघेणी तडजोड करतात. त्याही या जात व्यवस्थेचा बळी जात आहेत. निवेदनावर अध्यक्षा अ‍ॅड. वर्षा देशपांडे, राज्य सचिव अ‍ॅड. शैला जाधव, जिल्हाध्यक्षा माया पवार, बसंती दायमा, वनिता शेळके, कविता बनसोडे, प्रेरणा भिलारे यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)