शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सातारकरांचीही आता ‘घुमान’ वारी...

By admin | Updated: March 30, 2015 00:10 IST

साहित्यनगरी सजणार सातारी झेंड्याने : कुलकर्णी दाम्पत्याने बनविले उपरणे, बॅचेस, आबदागिरी

नितीन काळेल -सातारा -एप्रिल महिन्याच्या प्रारंभी पंजाब राज्यातील घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संत नामदेव महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या नगरीतील साहित्य संमेलनात सातारकरांचाही मोठा सहभाग राहणार आहे. कारण, संपूर्ण साहित्य संमेलन सजणार आहे, ते सातारी झेंडे, उपरणे, आबदागिरी, बॅचेसनी. हे सर्व साहित्य साताऱ्यातील मंदार आणि नूतन कुलकर्णी या दाम्पत्याने बनविले आहे. नुकतेच झेंडे, टोप्या, बॅचेस, उपरणे हे घुमान येथे पोहोचही झाले आहेत.संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी म्हणून पंजाबमधील घुमानकडे पाहिले जाते. अनेक वर्षे संत नामेदव महाराजांनी पंजाबमध्ये भागवत धर्माची पताका फडकविली. त्यांच्या कर्मभूमीतच म्हणजे घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनस्थळ व संपूर्ण घुमाननगरी सजणार आहे, ते सातारी झेंडे, पताक्यांनी.सातारा शहरातील मंदार आणि नूतन कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनात लागणारे झेंडे, पताका, आबदागिरी, टोप्या, बॅचेस बनविले आहेत. यामध्ये प्रथमच पंचकोनी, तोरण झेंड्यांचाही समावेश झालेला आहे. साहित्यिकांच्या स्वागतासाठी विविध रंगी पट्टे तयार करण्यात आले आहेत. अशा विविध वस्त्रांनी घुमान नगरी सजणार आहे. ग्रंथपालखीच्या वेळीही साहित्यिकांच्या हातात देण्यासाठी छोटे झेंडे बनविण्यात आले आहेत. साहित्य संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम आणि समारोपासाठीही महावस्त्रे बनविण्यात आली आहेत. संमेलनातील परिसंवादात सहभागी होणाऱ्या मान्यवरांसाठी आठवण राहावी म्हणून आकर्षक असे वस्त्रही तयार करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे सातारकरांचा झेंडा पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात फडकणार आहे. सातारकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ज्ञानदीप लावू जगी--साताऱ्यात तयार करण्यात आलेल्या या वस्त्रांवर साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रिंट केले आहे. त्यामध्ये संत नामदेव महाराज यांचे चित्र आहे. त्याखाली नामदेव महाराजांचा ‘नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी,’ ही अभंगातील ओळ आहे. तसेच पुस्तक, दौत, आणि मोरपीस यांची चिन्हेही समाविष्ट केलेली आहेत. साहित्य संमेलन म्हणजे भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा महोत्सव आहे. आमच्या घराण्यात संत आणि वारकरी पंरपरा आहे. त्यामुळेच साहित्य संमेलनासाठी लागणारे झेंडे, उपरणे, आबदागिरी बनविण्याचे काम आम्हाला मिळाले असावे. सातारच्या झेंडे, पताकांनी घुमाननगरी सजणार असल्याने तो सर्व सातारकरांचा सन्मान असणार आहे.- नूतन कुलकर्णी