शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

सातारकरांचीही आता ‘घुमान’ वारी...

By admin | Updated: March 30, 2015 00:10 IST

साहित्यनगरी सजणार सातारी झेंड्याने : कुलकर्णी दाम्पत्याने बनविले उपरणे, बॅचेस, आबदागिरी

नितीन काळेल -सातारा -एप्रिल महिन्याच्या प्रारंभी पंजाब राज्यातील घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संत नामदेव महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या नगरीतील साहित्य संमेलनात सातारकरांचाही मोठा सहभाग राहणार आहे. कारण, संपूर्ण साहित्य संमेलन सजणार आहे, ते सातारी झेंडे, उपरणे, आबदागिरी, बॅचेसनी. हे सर्व साहित्य साताऱ्यातील मंदार आणि नूतन कुलकर्णी या दाम्पत्याने बनविले आहे. नुकतेच झेंडे, टोप्या, बॅचेस, उपरणे हे घुमान येथे पोहोचही झाले आहेत.संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी म्हणून पंजाबमधील घुमानकडे पाहिले जाते. अनेक वर्षे संत नामेदव महाराजांनी पंजाबमध्ये भागवत धर्माची पताका फडकविली. त्यांच्या कर्मभूमीतच म्हणजे घुमान येथे ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनस्थळ व संपूर्ण घुमाननगरी सजणार आहे, ते सातारी झेंडे, पताक्यांनी.सातारा शहरातील मंदार आणि नूतन कुलकर्णी यांनी साहित्य संमेलनात लागणारे झेंडे, पताका, आबदागिरी, टोप्या, बॅचेस बनविले आहेत. यामध्ये प्रथमच पंचकोनी, तोरण झेंड्यांचाही समावेश झालेला आहे. साहित्यिकांच्या स्वागतासाठी विविध रंगी पट्टे तयार करण्यात आले आहेत. अशा विविध वस्त्रांनी घुमान नगरी सजणार आहे. ग्रंथपालखीच्या वेळीही साहित्यिकांच्या हातात देण्यासाठी छोटे झेंडे बनविण्यात आले आहेत. साहित्य संमेलनाचा उद्घाटन कार्यक्रम आणि समारोपासाठीही महावस्त्रे बनविण्यात आली आहेत. संमेलनातील परिसंवादात सहभागी होणाऱ्या मान्यवरांसाठी आठवण राहावी म्हणून आकर्षक असे वस्त्रही तयार करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे सातारकरांचा झेंडा पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात फडकणार आहे. सातारकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. ज्ञानदीप लावू जगी--साताऱ्यात तयार करण्यात आलेल्या या वस्त्रांवर साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रिंट केले आहे. त्यामध्ये संत नामदेव महाराज यांचे चित्र आहे. त्याखाली नामदेव महाराजांचा ‘नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी,’ ही अभंगातील ओळ आहे. तसेच पुस्तक, दौत, आणि मोरपीस यांची चिन्हेही समाविष्ट केलेली आहेत. साहित्य संमेलन म्हणजे भाषा, साहित्य आणि संस्कृती यांचा महोत्सव आहे. आमच्या घराण्यात संत आणि वारकरी पंरपरा आहे. त्यामुळेच साहित्य संमेलनासाठी लागणारे झेंडे, उपरणे, आबदागिरी बनविण्याचे काम आम्हाला मिळाले असावे. सातारच्या झेंडे, पताकांनी घुमाननगरी सजणार असल्याने तो सर्व सातारकरांचा सन्मान असणार आहे.- नूतन कुलकर्णी