शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

स्मार्ट सिटीच्या शर्यतीत सातारा

By admin | Updated: July 7, 2015 22:19 IST

पन्नास कोटींच्या निधीसाठी प्रयत्न : ऐतिहासिक शाहूनगरीच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवण्याची संधी

दत्ता यादव - सातारा -पश्चिम महाराष्ट्रात ‘एलईडी’ सिटी बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सातारा पालिकेला शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवण्याची संधी मिळाली आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट होण्यासाठी पालिकेने जोरदार हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी लागणारा ५० कोटीचा निधी उभारण्यात येणार आहे.केंद्र शासनाने जाहीर केलेल्या शंभर सीटीज योजनेमध्ये महाराष्ट्रातून १० शहरांची स्मार्ट सिटींसाठी निवड केली जाणार आहे. या निवड केलेल्या शहरांना पाच वर्षात एक हजार कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी संबंधित पालिकांना दरवर्षी ५० कोटी रुपये उभे करावे लागणार आहेत. या स्मार्ट सिटी योजनेमध्ये समावेश व्हावा, यासाठी सातारा पालिकेने कंबर कसली आहे.केंद्र शासनाकडून देण्यात आलेल्या सर्व नियमावलीमध्ये सातारा पालिका पात्र ठरत आहे. मात्र पन्नास कोटींचा निधी आणायचा कोठून हा प्रश्न पालिकेला पडला आहे. पालिकेचे बजेट १०४ कोटीचे आहे. जर ५० कोटी शिल्लक ठेवले तर दैनंदिन कामे कशी करणार. असाही प्रश्न पालिकेला पडला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यासाठी पालिकेचे आणखी उत्पन्न कसे वाढेल, यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.वसुलीतून जमा झालेले पालिकेचे निव्वळ उत्पन्न १४ कोटीच्या घरात आहे. रोजगार हमी आणि शिक्षण कर जमा होतो, तो शासनाला जमा करावा लागतो. पाणी पट्टी आणि मालमत्ता कर यातून मिळालेल्या उत्पन्नातून रस्ते, लाईट, पाणी यासारख्या नागरिकांना सुविधा पुरविल्या जात आहेत. त्यामुळे पालिकेला आणखीशिलकी ५० कोटीचा निधी उभारताना बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत. ज्या महापालिकेंची बजेट १०० कोटींच्या वर आहेत. त्यांना ५० कोटी बाजूला काढून ठेवणे शक्य आहे. परंतु पालिकांना ५० कोटी उभे करणे शक्य होईल का, अशी चिंताही व्यक्त केली जात आहे.बौद्धिक संकल्पनेचा लागणार कस!पालिकेला दूरदृष्टी आणि कल्पकतेनं काम करावे लागणार आहे. शहराची पूर्वीची रचना, त्यातील जुना बाज कायम ठेवून नवीन साज चढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. नगरविकासासंदर्भात आतापर्यंत केलेलं काम आणि भावी काळात करावयाचं काम याला गुण मिळणार आहेत. स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, गुड गव्हर्नन्स आणि ई-गव्हर्नन्स या चार मुद्यांवर पालिकेला काम कराव लागणार आहे. यांदर्भात पालिकेच्या काय योजना आहेत, याचा आढावा घेऊन त्या आधारावर गुण मिळणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या बौद्धिक संकल्पनांचा कस लागणार आहे. पन्नास कोटींचा निधी उभारण्यासंदर्भात ज्या आमच्या शंका आहेत. त्या प्रधान सचिवांपुढे मांडणार आहोत. शासनाच्या इतर नियमांमध्ये सातारा पालिका पात्र आहे. परंतु निधीची तरतूद करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.- अभिजित बापट, मुख्याधिकारी सातारा पालिका