शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा : पाच दिवसांत उसाचा दर कारखान्यांच्या नोटीस बोर्डांवर लावा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:16 IST

शेतकऱ्यांकडून घेणार असलेल्या उसाला किती दर देणार आहे, याबाबतची माहिती साखर कारखान्यांच्या प्रशासनांनी आपल्या नोटीस बोर्डांवर लावावी. याबाबत पाच दिवसांत कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या.

ठळक मुद्देपाच दिवसांत उसाचा दर कारखान्यांच्या नोटीस बोर्डांवर लावा सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यवाहीच्या सूचना; दराबाबत निर्णयच नाही

सातारा : शेतकऱ्यांकडून घेणार असलेल्या उसाला किती दर देणार आहे, याबाबतची माहिती साखर कारखान्यांच्या प्रशासनांनी आपल्या नोटीस बोर्डांवर लावावी. याबाबत पाच दिवसांत कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारीश्वेता सिंघल यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या शेतकरी संघटना व कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्या समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासीउपजिल्हाधिकारी सचिन बारावकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, सागर कारंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीच्या सुरुवातीला विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मुद्दे मांडले. बैठकीच्या सुरुवातीलाच मागील वर्षी झालेल्या चर्चेचा इतिवृत्तांत प्रतिनिधींनी मांडला.

त्या बैठकीमध्ये कारखानदारांच्या प्रतिनिधींनी जाहीर केल्यानुसार उसाला दर दिले नाहीत. त्याबाबत काय कारवाई केली? अशी विचारणा प्रतिनिधींकडून करण्यात आली. त्यावर ही बैठक समन्वयासाठी घेतली आहे. दराबाबत निर्णय घेण्याचा किंवा कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयाला नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सुरुवातीलाच केले.दरम्यान, ज्या कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे जाहीर केलेला दर दिला नाही, त्या कारखान्यांना पुढील हंगामासाठी गाळप परवाने दिले जाऊ नयेत, दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू केले जाऊ नयेत, कारखाने कुठलाही परवाना न घेता अथवा दर जाहीर न करता कायद्याचा भंग करून साखर गाळप करतात, त्यांना पोलिसांकडून अभय दिले जाते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणाऱ्या शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जातात, आदी मुद्दे प्रतिनिधींनी मांडले.जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने हे सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत. कारखाने बंद ठेवून शेतकऱ्यांचेच नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कारखाने सुरू राहिले पाहिजेत. शेतकरी संघटनांनी कारखान्यांच्या वार्षिकसभेत दराचा निर्णय घेण्याबाबत आग्रह धरला पाहिजे, अशी भूमिका जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मांडली. त्यावर सभांमध्ये शेतकरी सभासदांना आपली बाजूच मांडायला दिली जात नसल्याची व्यथा अनेकांनी मांडली.या बैठकीला स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कदम, सागर कुंभार, अर्जुन साळुंखे, अनिल बाबर आदींसह संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय

  1.  कारखाना व्यवस्थापनांनी तत्काळ दरासंदर्भात बैठक घ्यावी
  2.  नोटीस बोर्डावर दर जाहीर करावा
  3.  कारखाने हे शेतकऱ्यांच्या मालकीचे असल्याने त्यांना विश्वासात घ्यावे
  4. सर्व ऊस उत्पादकांना सारखा दर द्यायला पाहिजे
  5. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कारखान्यांचीही
  6. कारखान्यात शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कक्ष निर्माण करावा

सगळ्या बाजूने शेतकरी अडचणीत आहे. कारखान्याची बिले वेळेत मिळाली नाहीत तर बँका, सोसायट्या शेतकऱ्यांना सोडतात का? पैसे नसले तरी कर्जाची प्रकरणे नवी-जुनी करावी लागतात. रतन खत्रीने आकडे जाहीर करावेत, तसे कारखानदार आकडे जाहीर करतात. कारखान्यांनी उसाच्या देण्यापोटी १८ टक्के व्याज दिले पाहिजे.- शंकर गोडसे, शेतकरी संघटना 

साखर कारखाने मागील वर्षीच्या रिकव्हरीवर दर जाहीर करतात. एफआरपी अधिक २०० रुपयांची मागणी आम्ही करतोय. कायद्यानुसार उसाला दर देणे हे कारखानदारांवर बंधनकारक असताना मागील देणी थकविली जातात. दर जाहीर करण्याआधीच कारखाने सुरू करून कारखानदार पहिल्यांदा कायदे मोडतात. मात्र, शेतकरी सभासदांचे पैसे मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होतात. वाळू माफियांपेक्षा डेंजर  हा प्रकार आहे.- संजय भगत, रयत क्रांती संघटना

केंद्र शासनाने एफआरपीचा बेस ९.५ वरून १०.५ करून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत असून, ९.५ रिकव्हरी बेस पकडून दर दिला पाहिजे, यासाठी आम्हाला शासनाविरोधात लढा द्यायला पाहिजे. शेतकऱ्यांनी थोडी कळ सोसल्यास कारखानदार आणि संघटनांची ताकद मिळून शेतकऱ्यांना गुडघ्याला टेकणे भाग पडू शकते.- सचिन नलवडे, स्वाभिमानी

 

जोपर्यंत उसाचा दर जाहीर केला जात नाही, तोपर्यंत एकही कारखाना चालू करू देऊ नका, मागील वेळी आमिष दाखवून ऊस नेला. खताचा, विजेचा, औषधांचा खर्च वाढलेला असताना शेतकऱ्याला तसा मोबदला मिळालेला नाही. जोपर्यंत दराबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू नका.- राजू शेळके, स्वाभिमानी

 

जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीला महत्त्व आहे. या बैठकीत ऊस दरासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र कारखान्यांचे चेअरमन तसेच जबाबदार अधिकारी बैठकीला आले नाहीत. आम्हाला मोठेपणाची हौस नाही. शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांसाठी आम्हाला कारखान्यांच्या पायऱ्यांवर बसावे लागते. शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांचे करोडो रुपये मिळाले आहेत.- पंजाबराव पाटील, बळीराजा संघटना

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSatara areaसातारा परिसर