शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सातारा बनणार ‘एलईडी सिटी’

By admin | Updated: March 16, 2015 00:07 IST

पुणे विभागात पहिलाच उपक्रम : पालिकेची वर्षाला होणार सत्तर लाखांची बचत---लोकमत विशेष...

दत्ता यादव - सातारा   -बल्ब, ट्यूब ते ‘एलईडी’ व्हाया सोडीयम व्हेपर असा साताऱ्यातील पथदिव्यांचा प्रवास आत्तापर्यंत राहिला आहे. सध्या संपूर्ण शहरामध्ये ‘एलईडी’ दिवे बसविण्यात येणार असून, यामुळे आता सातारची ‘एलईडी सिटी’ म्हणून ओळख निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, सातारा पालिकेचा हा पुणे विभागातील पहिलाच उपक्रम असून, वर्षाला तब्बल पालिकेची सत्तर लाखांची बचत होणार आहे.पालिकेच्या वतीने तिजोरीमध्ये बचत होण्यासाठी अनेक चांगले उपक्रम राबविले जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सातारा ‘एलईडी सिटी’ करण्याचा. पूर्वी शहरामध्ये काही ठिकाणी सहा फुटांचे लोखंडी पथदिवे होते. या पथदिव्यावर एक छोटासा मिणमिणता बल्ब लावला जात होता. मात्र काळाच्या ओघात हे लोखंडी दिवे नामशेष झाले. उरल्या केवळ फक्त आठवणी. आजही काही लोक या लोखंडी खांबाकडे कुतूहलाने पाहतात. सध्या शहरामध्ये सुमारे पाच हजार पथदिवे आहेत. काही ठिकाणी १५० वॉटचे अडीच हजार बल्ब आहेत. तर अडीचशे वॉटचे एक हजार दिवे आहेत. या एका बल्बची तब्बल साडेसहा हजार रुपये किंमत आहे. त्यामुळे हा बल्ब गेला तर त्याचा देखभाल खर्च जास्त होतो. साधारण सहा महिन्यांपर्यंत हा बल्ब टिकतो. तसेच महत्त्वाचे म्हणजे वीजबिलापोटी पालिकेला महिन्याला तब्बल बारा लाख रुपये भरावे लागत आहेत. म्हणजे, वर्षाला तब्बल एक कोटी ४४ लाख रुपये केवळ वीजबिलासाठीच खर्च होतायत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर मोठा ताण येत आहे. सध्या वीजबचतीसाठी एलईडी दिव्यांचा वापर सर्रास ठिकाणी केला जातो. मात्र ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च लागणार असला तरी यातून पालिकेची आर्थिक बचत होणार आहे. शहरामध्ये एलईडी दिवे बसविल्यास वर्षाला तब्बल सत्तर लाखांची बचत होणार आहे. एलईडी दिवे हे कमी वॉटचे असतात. साठ ते ऐंशी वॉटचा दिवा जरी लावला तरी त्याचा प्रकाश चांगला पडतो. या दिव्यांचे वीजबिलही जास्त येत नाही. चाळीस ते साठ टक्के वीजबिल बचत होणार आहे. त्याचा देखभालीचा खर्चही कमी असतो. त्यामुळे सध्या एलईडी दिवे बसविण्याचा पालिकेने निर्णय घेतला आहे. काही जिल्ह्यांत व ग्रामीण भागामध्ये सध्या एलईडी दिवे दिसून येत असले तरी संपूर्ण शहर एलईडीने युक्त होणारे पुणे विभागातील सातारा हे पहिलेच शहर ठरणार आहे. ‘बीओटी’चा प्रस्ताव !सातारा सिटी एलईडी करण्यासाठी सुरुवातीला पालिकेला खर्च झेपणार नाही. त्यामुळे बीओटी तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संबंधित कंपनीला मिळणाऱ्या उत्पनातील काही वाटा पालिकेलाही मिळणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबविताना पालिकेला फारशा अडचणी येणार नाहीत. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.शहरामध्ये ४८ मीटर बॉक्स आहेत. त्याच्यावर दिव्यांचे जादा कनेक्शन लावण्यात आले आहेत. त्यामुळे ओव्हरलोड होऊन वरचेवर लाईट बंद पडत आहेत. एलईडी दिव्यांमुळे त्या आता पडणार नाहीत. -अभिजित बापट, मुख्याधिकारी, सातारा‘एलईडी’चे काय फायदे१) वीजबिल आता येतय त्यापेक्षा निम्म्याहून कमी येईल२) देखभालीचा खर्च वाचणार३) व्होल्टेज वाढले तरी बल्ब जाणार नाहीत४) शॉर्टसर्किट होणार नाही५) मीटरवर लोड कमी येणार