शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात सरपंचांचा कंदील मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST

सातारा : वीजबिल थकल्याने ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरची वीज तोडण्यात आली आहे. ही वीज पुन्हा जोडावी, या मागणीसाठी सरपंच परिषद ...

सातारा : वीजबिल थकल्याने ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरची वीज तोडण्यात आली आहे. ही वीज पुन्हा जोडावी, या मागणीसाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेतर्फे शुक्रवारी साताऱ्यामध्ये कंदील मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायतीची तोडलेली वीज पुन्हा जोडली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींच्या हद्दीमधील रस्त्यावर सार्वजनिक वीज पुरवठा केला जातो. हे बिल पूर्वी शासनाकडून भरले जायचे. २०१२पासून शासनाने हे वीजबिल भरणे बंद केले आणि त्याची थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढली. ही थकीत बिले लाखोंच्या घरात आहेत. ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून ही बिले भरणे शक्य नसल्याने ग्रामपंचायती हतबल आहेत.

राज्य शासनाने १५ व्या वित्त आयोगातून वीजबिल भरण्यास परवानगी दिली असली तरीदेखील या वित्त आयोगातून मिळणारे सर्व पैसे वीजबिलांची थकबाकी भरण्यास वापरले तरीदेखील ग्रामपंचायतींवर वीजबिलाचा बोजा कायम राहणार आहे. तसेच विकासकामांसाठी जो निधी आला आहे, तो निधी अशा पद्धतीने वीजबिले भरण्यासाठी वापरला गेला तर प्रत्येक गावामध्ये विकासकामे कशी करायची, हा प्रश्न निर्माण होणार आहे.

थकित वीजबिलापोटी वीज कंपनीने प्रत्येक गावातील सार्वजनिक वीज पुरवठा पूर्णपणे बंद केल्याने गावागावांमध्ये अंधार पसरलेला आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच परिषदेतर्फे आंदोलनाचा इशारा दिला होता, शुक्रवारी साताऱ्यातील पोवई नाक्यावर जिल्ह्यातील सरपंच जमले होते. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा जात असतानाच पोलिसांनी कोविडचे कारण पुढे करून मोर्चा अडवला. मोर्चात केवळ पंचवीस लोकांनाच परवानगी आहे, एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा काढता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तोडलेली वीज पुन्हा जोडावी, अशी मागणी केली. वीज जोडणी पुन्हा केली नाही तर सरपंच आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनामध्ये सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष आनंद जाधव, उपाध्यक्ष अरुण कापसे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोकळे, समन्वयक महेश गाडे, महिला समन्वयक अरुणा जाधव, सचिव शत्रुघ्न धनावडे यांच्यासह तालुका पदाधिकारी व सरपंच सहभागी झाले होते.

फोटो ओळ : सातारा येथील पोवई नाका येथे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष आनंद जाधव यांच्यासह सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कंदील आंदोलन केले.