शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

साताऱ्यात सरपंचांचा कंदील मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST

सातारा : वीजबिल थकल्याने ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरची वीज तोडण्यात आली आहे. ही वीज पुन्हा जोडावी, या मागणीसाठी सरपंच परिषद ...

सातारा : वीजबिल थकल्याने ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यावरची वीज तोडण्यात आली आहे. ही वीज पुन्हा जोडावी, या मागणीसाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेतर्फे शुक्रवारी साताऱ्यामध्ये कंदील मोर्चा काढण्यात आला. ग्रामपंचायतीची तोडलेली वीज पुन्हा जोडली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.

ग्रामपंचायतींच्या हद्दीमधील रस्त्यावर सार्वजनिक वीज पुरवठा केला जातो. हे बिल पूर्वी शासनाकडून भरले जायचे. २०१२पासून शासनाने हे वीजबिल भरणे बंद केले आणि त्याची थकबाकी प्रचंड प्रमाणात वाढली. ही थकीत बिले लाखोंच्या घरात आहेत. ग्रामपंचायतींच्या उत्पन्नातून ही बिले भरणे शक्य नसल्याने ग्रामपंचायती हतबल आहेत.

राज्य शासनाने १५ व्या वित्त आयोगातून वीजबिल भरण्यास परवानगी दिली असली तरीदेखील या वित्त आयोगातून मिळणारे सर्व पैसे वीजबिलांची थकबाकी भरण्यास वापरले तरीदेखील ग्रामपंचायतींवर वीजबिलाचा बोजा कायम राहणार आहे. तसेच विकासकामांसाठी जो निधी आला आहे, तो निधी अशा पद्धतीने वीजबिले भरण्यासाठी वापरला गेला तर प्रत्येक गावामध्ये विकासकामे कशी करायची, हा प्रश्न निर्माण होणार आहे.

थकित वीजबिलापोटी वीज कंपनीने प्रत्येक गावातील सार्वजनिक वीज पुरवठा पूर्णपणे बंद केल्याने गावागावांमध्ये अंधार पसरलेला आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच परिषदेतर्फे आंदोलनाचा इशारा दिला होता, शुक्रवारी साताऱ्यातील पोवई नाक्यावर जिल्ह्यातील सरपंच जमले होते. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाक्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा जात असतानाच पोलिसांनी कोविडचे कारण पुढे करून मोर्चा अडवला. मोर्चात केवळ पंचवीस लोकांनाच परवानगी आहे, एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चा काढता येणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तोडलेली वीज पुन्हा जोडावी, अशी मागणी केली. वीज जोडणी पुन्हा केली नाही तर सरपंच आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या आंदोलनामध्ये सरपंच परिषदेचे कार्याध्यक्ष आनंद जाधव, उपाध्यक्ष अरुण कापसे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोकळे, समन्वयक महेश गाडे, महिला समन्वयक अरुणा जाधव, सचिव शत्रुघ्न धनावडे यांच्यासह तालुका पदाधिकारी व सरपंच सहभागी झाले होते.

फोटो ओळ : सातारा येथील पोवई नाका येथे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, कार्याध्यक्ष आनंद जाधव यांच्यासह सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी कंदील आंदोलन केले.