शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

कुत्र्यांच्या टोळीकडून सांबराचा पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:39 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील पाझर तलावावर पाणी पिण्यासाठी आलेल्या मादी सांबराचा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग केला. जीव ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील पाझर तलावावर पाणी पिण्यासाठी आलेल्या मादी सांबराचा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी सांबर तलावात शिरले. वनरक्षकाने कुत्र्यांची टोळी हाकलून सांबराला जंगलात जाण्याचा मार्ग मोकळा करून देत जीवदान दिले.

याबाबत माहिती अशी की, नागझरी येथील वनहद्दीतील जंगल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सांबरांचा वावर आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पूर्ण वाढ झालेले मादी सांबर पाणी पिण्यासाठी जवळील पाझर तलावावर आले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या मोकाट दहा-पंधरा कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी सांबर तलावातील पाण्यात शिरले. तरीही कुत्र्यांची टोळी सांबराची वाट पाहत तलावाच्या काठावर दबा धरून बसली होती. हे दृश्य पाहून शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने याबाबतची माहिती दूरध्वनीवरून वनरक्षक नवनाथ कोळेकर यांना दिली.

कोळेकर यांनी याबाबतची माहिती वनपाल अनिल देशमुख यांना देऊन, त्यांच्या सूचनेनुसार तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. कुत्र्यांच्या भीतीने तलावात घुसलेले सांबर पाण्याबाहेर येण्यास धजावत नव्हते. नवनाथ कोळेकर यांनी वन विभागाचे सुरक्षा कर्मचारी अविनाश माळवे व अमोल कुंभार यांना बरोबर घेऊन तलावाच्या काठावर दबा धरून बसलेल्या कुत्र्यांच्या टोळीला पिटाळून लावले. तसेच पाण्यातून सांबराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र काही केल्या सांबर पाण्यातून बाहेर येत नव्हते. दुसरा पर्याय नसल्यामुळे नवनाथ कोळेकर यांनी पोहत सांबराजवळ जाऊन त्याला जंगलाच्या दिशेने हाकलून लावले. सुमारे पाच तासानंतर पाण्यातून बाहेर पडताच सांबराने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. काही क्षणातच झाडा-झुडपात ते दिसेनासे झाले आणि सांबराचा जीव वाचल्याने उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

चाैकट :

कुत्र्यांच्या टोळीचा बंदोबस्त करा

नागझरी येथील पाझर तलाव परिसरात वावरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा धुडगूस सुरू आहे. तहान भागवण्यासाठी तलावावर येणाऱ्या वन्यप्राण्यांचा पाठलाग ही कुत्र्यांची टोळी वारंवार करते. यापूर्वीही अनेक वन्यप्राणी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या कुत्र्यांच्या टोळीने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, पिले व गाईंची कालवडे यांच्यावर हल्ले केले आहेत. या परिसरात एकट्या दुकट्या शेतकऱ्यालाही फिरताना कुत्र्यांची भीती वाटते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

फोटो :

०९रहिमतपूर

नागझरी, ता. कोरेगाव येथील कुत्र्यांच्या टोळीपासून जीव वाचविण्यासाठी सांबर पाच तास तलावातील पाण्यातच होते. (छाया : जयदीप जाधव)