शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

कुत्र्यांच्या टोळीकडून सांबराचा पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:39 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील पाझर तलावावर पाणी पिण्यासाठी आलेल्या मादी सांबराचा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग केला. जीव ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील पाझर तलावावर पाणी पिण्यासाठी आलेल्या मादी सांबराचा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी सांबर तलावात शिरले. वनरक्षकाने कुत्र्यांची टोळी हाकलून सांबराला जंगलात जाण्याचा मार्ग मोकळा करून देत जीवदान दिले.

याबाबत माहिती अशी की, नागझरी येथील वनहद्दीतील जंगल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सांबरांचा वावर आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पूर्ण वाढ झालेले मादी सांबर पाणी पिण्यासाठी जवळील पाझर तलावावर आले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या मोकाट दहा-पंधरा कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी सांबर तलावातील पाण्यात शिरले. तरीही कुत्र्यांची टोळी सांबराची वाट पाहत तलावाच्या काठावर दबा धरून बसली होती. हे दृश्य पाहून शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने याबाबतची माहिती दूरध्वनीवरून वनरक्षक नवनाथ कोळेकर यांना दिली.

कोळेकर यांनी याबाबतची माहिती वनपाल अनिल देशमुख यांना देऊन, त्यांच्या सूचनेनुसार तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. कुत्र्यांच्या भीतीने तलावात घुसलेले सांबर पाण्याबाहेर येण्यास धजावत नव्हते. नवनाथ कोळेकर यांनी वन विभागाचे सुरक्षा कर्मचारी अविनाश माळवे व अमोल कुंभार यांना बरोबर घेऊन तलावाच्या काठावर दबा धरून बसलेल्या कुत्र्यांच्या टोळीला पिटाळून लावले. तसेच पाण्यातून सांबराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र काही केल्या सांबर पाण्यातून बाहेर येत नव्हते. दुसरा पर्याय नसल्यामुळे नवनाथ कोळेकर यांनी पोहत सांबराजवळ जाऊन त्याला जंगलाच्या दिशेने हाकलून लावले. सुमारे पाच तासानंतर पाण्यातून बाहेर पडताच सांबराने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. काही क्षणातच झाडा-झुडपात ते दिसेनासे झाले आणि सांबराचा जीव वाचल्याने उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

चाैकट :

कुत्र्यांच्या टोळीचा बंदोबस्त करा

नागझरी येथील पाझर तलाव परिसरात वावरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा धुडगूस सुरू आहे. तहान भागवण्यासाठी तलावावर येणाऱ्या वन्यप्राण्यांचा पाठलाग ही कुत्र्यांची टोळी वारंवार करते. यापूर्वीही अनेक वन्यप्राणी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या कुत्र्यांच्या टोळीने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, पिले व गाईंची कालवडे यांच्यावर हल्ले केले आहेत. या परिसरात एकट्या दुकट्या शेतकऱ्यालाही फिरताना कुत्र्यांची भीती वाटते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

फोटो :

०९रहिमतपूर

नागझरी, ता. कोरेगाव येथील कुत्र्यांच्या टोळीपासून जीव वाचविण्यासाठी सांबर पाच तास तलावातील पाण्यातच होते. (छाया : जयदीप जाधव)