शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

कुत्र्यांच्या टोळीकडून सांबराचा पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:39 IST

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील पाझर तलावावर पाणी पिण्यासाठी आलेल्या मादी सांबराचा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग केला. जीव ...

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील पाझर तलावावर पाणी पिण्यासाठी आलेल्या मादी सांबराचा भटक्या कुत्र्यांच्या टोळीने पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी सांबर तलावात शिरले. वनरक्षकाने कुत्र्यांची टोळी हाकलून सांबराला जंगलात जाण्याचा मार्ग मोकळा करून देत जीवदान दिले.

याबाबत माहिती अशी की, नागझरी येथील वनहद्दीतील जंगल क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सांबरांचा वावर आहे. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पूर्ण वाढ झालेले मादी सांबर पाणी पिण्यासाठी जवळील पाझर तलावावर आले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या मोकाट दहा-पंधरा कुत्र्यांच्या टोळीने त्याच्यावर अचानक हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी सांबर तलावातील पाण्यात शिरले. तरीही कुत्र्यांची टोळी सांबराची वाट पाहत तलावाच्या काठावर दबा धरून बसली होती. हे दृश्य पाहून शेजारील शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याने याबाबतची माहिती दूरध्वनीवरून वनरक्षक नवनाथ कोळेकर यांना दिली.

कोळेकर यांनी याबाबतची माहिती वनपाल अनिल देशमुख यांना देऊन, त्यांच्या सूचनेनुसार तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. कुत्र्यांच्या भीतीने तलावात घुसलेले सांबर पाण्याबाहेर येण्यास धजावत नव्हते. नवनाथ कोळेकर यांनी वन विभागाचे सुरक्षा कर्मचारी अविनाश माळवे व अमोल कुंभार यांना बरोबर घेऊन तलावाच्या काठावर दबा धरून बसलेल्या कुत्र्यांच्या टोळीला पिटाळून लावले. तसेच पाण्यातून सांबराला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मात्र काही केल्या सांबर पाण्यातून बाहेर येत नव्हते. दुसरा पर्याय नसल्यामुळे नवनाथ कोळेकर यांनी पोहत सांबराजवळ जाऊन त्याला जंगलाच्या दिशेने हाकलून लावले. सुमारे पाच तासानंतर पाण्यातून बाहेर पडताच सांबराने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. काही क्षणातच झाडा-झुडपात ते दिसेनासे झाले आणि सांबराचा जीव वाचल्याने उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

चाैकट :

कुत्र्यांच्या टोळीचा बंदोबस्त करा

नागझरी येथील पाझर तलाव परिसरात वावरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा धुडगूस सुरू आहे. तहान भागवण्यासाठी तलावावर येणाऱ्या वन्यप्राण्यांचा पाठलाग ही कुत्र्यांची टोळी वारंवार करते. यापूर्वीही अनेक वन्यप्राणी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या कुत्र्यांच्या टोळीने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, पिले व गाईंची कालवडे यांच्यावर हल्ले केले आहेत. या परिसरात एकट्या दुकट्या शेतकऱ्यालाही फिरताना कुत्र्यांची भीती वाटते. त्यामुळे मोकाट कुत्र्यांच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

फोटो :

०९रहिमतपूर

नागझरी, ता. कोरेगाव येथील कुत्र्यांच्या टोळीपासून जीव वाचविण्यासाठी सांबर पाच तास तलावातील पाण्यातच होते. (छाया : जयदीप जाधव)