भुर्इंज : प्रतापगड सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना येत्या सप्टेंबरपासून वेतन आयोग लागू करण्यात येत असल्याचे किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी साखर आयुक्तालयात शुक्रवारी झालेल्या बैठकीत आयुक्त विजय सिंघल यांना सांगितले. शनिवार, दि. १९ रोजी कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर, संचालक नारायणराव पवार, संदीप पोळ, कार्यकारी संचालक विजय वाबळे, प्रतापगडचे संचालक सौरभ शिंंदे यांनी प्रतापगडच्या कामगारांना भेटून ही माहिती दिली. प्रतापगडच्या कामगारांनी आंदोलन माग घेत पेढे वाटून आनंद व्यक्त केला.वेतन आयोग लागू करण्यासाठी किसन वीर व्यवस्थापनाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात हालचाली सुरू केलेल्या होत्या. मात्र ‘प्रथम वेतन आयोगनंतर काम’ अशी भूमिका घेत संयम न बाळगता प्रतापगडच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान किसन वीर व्यवस्थापनाने वेळोवेळी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना भेटून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही कामगारांना सबुरीची भूमिका घेण्यास सूचित करून यासंदर्भात त्यांनी मदन भोसले यांनाही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यानंतर साखर आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत येत्या सप्टेंबरपासून वेतन आयोग लागू करीत असल्याचे मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी सांगितले. ‘किसन वीर’ च्या प्रस्तावास ‘प्रतापगड’च्या चेअरमन सुनेत्रा शिंदे, सौरभ शिंदे, यांनी संमती दिल्यानंतर आज कामगारांना हा निर्णय कळविण्यात आला.गजानन बाबर, ‘म्हणाले, कारखान्याच्या हितासाठी हातात हात घालून काम करा.’ यावेळी प्रतापगड कारखान्याचे संचालक दादा फरांदे, बाळासाहेब निकम, सुरेश गोळे, विश्वास बोराटे, विजय शेवते, पांडुरंगन नावरे, एच. आर. मॅनेजर ए. टी. शिंगटे, चिफ इंजिनिअर आर. बी. जगदाळे, चिफ केमिस्ट विकास गाढवे, सुनील शिवथरे उपस्थित होते. (वार्ताहर)
सप्टेंबरपासून वेतन आयोग
By admin | Updated: July 19, 2014 23:25 IST