शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

साहेब लय वर्षांनं लग्नासाठी स्थळ आलंय...नाहीतर अवघड होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साहेब लय वर्षांनंतर लग्नासाठी पोरीचे स्थळ आलंय, बघायला निघालो आहे. पोरगी पसंत पडली की लगीनच करून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

साहेब लय वर्षांनंतर लग्नासाठी पोरीचे स्थळ आलंय, बघायला निघालो आहे. पोरगी पसंत पडली की लगीनच करून परतणार आहे. तरी कृपया मला सांगलीकरिता ई-पास द्या नाहीतर माझे लय अवघड होईल, हे वाक्य ऐकून कोणालाही वाटेल एखादा तरुण लग्नाकरिता वेडा तर झाला नाही ना, पण अशी मनोरंजनात्मक अनेक कारणे देत सातारा जिल्ह्यात तब्बल ५१ हजार ८९४ ई-पासकरिता आलेले अर्ज नामंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हाबंदीचा २३ एप्रिल २०२१ रोजी आदेश लागू झाल्यानंतर अत्यावश्यक कारणांसाठीच प्रवास करणे बंधनकारक असल्याने सातारा जिल्ह्यात ८ जून २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये सातारकरांनी विविध कारणांसाठी तब्बल १ लाख ६ हजार ८०५ ई-पासकरिता अर्ज दाखल केले.

कोरोनाची लढाई युध्दपातळीवर लढत नागरिकांना अहोरात्र अत्यावश्यक सेवा मिळणेसाठी पोलिसांनी योगदान दिले. यामध्ये सातारकरांनी विविध कारणांसाठी तब्बल १ लाख ६ हजार ८०५ ई-पासकरिता अर्ज दाखल केलेल्यांपैकी ५४ हजार ९११ वैध अर्ज मंजूर करण्यात आले आहे. याकरिता सर्व अधिकृत अत्यावश्यक कारणांकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे आॅनलाइनद्वारे दाखल केल्यानंतरच त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयामध्ये जाणेसाठी, अंत्यविधीला जाणेसाठी, शासनाने दिलेल्या नियमानुसार आयोजित लग्नसमारंभ अशा असलेल्या कारणांकरिता जाणाऱ्या संबंधितांना सातारा जिल्ह्याबाहेर अत्यावश्यक कारणांकरिता जाता आले. त्याचप्रमाणे प्रामुख्याने इतर जिल्ह्यामध्ये रहिवाशी आहे, परंतु तेथील जिल्ह्यातून ई-पास मिळत नाही तर सातारा जिल्ह्यातून ई-पास मिळतोय, असे ऑनलाईन केलेले अर्ज, अवैध कागदपत्रे, अपूर्ण कागदपत्रे, अत्यावश्यक कारण नसलेले तब्बल ५१ हजार ८९४ अर्ज नामंजूर करण्यात आले.यामध्ये एका शेतकऱ्यांच्या मुलाने ई-पासकरिता दिलेले कारण अतिशय रंजक असून साहेब,शेताला पाणी पाजायला जायचे आहे माझे वावर सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे,आपल्याला खोटे वाटत असल्यास तुमचा माणूस पाठवून खात्री करा नाहीतर माझे वावराचे वाटोळे होईल. कृपया मला शेतीला पाणी पाजायला ई-पास द्या असा मजकूर असलेला अर्ज मंजूर करावा की नामंजूर करावा, अशी द्विधा मनस्थिती निर्माण झाली होती. परंतू शासनाने दिलेल्या नियमानुसार सदरच्या अर्जावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे केवळ अत्यावश्यक कारण असलेल्यांनाच सातारा जिल्ह्याची सीमा ओलांडता आली.

------------

चौकट -

सातारा जिल्हा ई-पासबाबतची माहिती

दि. २३ एप्रिल ते ८ जून २०२१

एकूण दाखल अर्ज = १ लाख ६ हजार ८०५

मंजूर अर्ज = ५४,९११

नामंजूर अर्ज = ५१८९४

एकूण प्रलंबित = 0

-------------

चौकट-

जिल्ह्याबाहेर जाणेकरिता काहीही

सातारा जिल्ह्यातून बाहेर जाणेकरिता सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी अनेक कारणांचा जावईशोध केला.

अगदी मला कामावर जायचे आहे

मित्राला दवाखान्यात बघण्याकरिता जायचे आहे

नातेवाईक आजारी आहे

शासनाच्या नियमानुसार आसन व्यवस्था असे अनेक कारणांसह दाखल केलेले आॅनलाईन अर्ज नामंजूर करण्यात आले.

----

कोट-

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाबंदीच्या निर्णयामुळे अत्यावश्यक कारणांसाठी इतर जिल्ह्यात जाण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या आॅनलाईन ई-पास कक्षाच्या माध्यमातून २४ तास यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली होती. यामध्ये अत्यावश्यक कारणांकरिता जाणाऱ्या नागरिकांना शासनाने दिलेल्या नियमानुसार पोलीस दलाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्यात आल्याचे समाधान आहे.

अजयकुमार बन्सल - पोलीस अधीक्षक, सातारा

------

कोट -

सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सतत २४ तास कार्यान्वित ठेवत ई-पास कक्षाच्या माध्यमातून कोरोनाकाळात सातारा जिल्ह्यातील नागरिकांना वैद्यकीय कारण तसेच अत्यावश्यक कारणांव्यतिरिक्त आलेले अर्ज नामंजूर करण्यात आले. त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये याचा चांगला परिणाम दिसून आला.

नवनाथ घोगरे - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, सातारा जिल्हा