शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
3
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
4
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
5
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
6
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
7
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
8
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
9
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
10
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
11
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
12
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
13
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
14
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
15
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
16
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
17
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
18
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
19
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
20
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’चे नियम झाले बिनकामाचे !

By admin | Updated: May 13, 2016 00:16 IST

कऱ्हाड आगाराची स्थिती : नियम राहिले केवळ नावापुरते; आरक्षित आसन व्यवस्थेकडे महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष

कऱ्हाड : सध्या राज्यपरिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सेवेसाठी निर्माण करण्यात आलेल्या अनेक योजना, नियमांचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य प्रवाशांव्यतिरिक्त इतर असलेल्या शासकीय, विशेष व्यक्ती व स्वातंत्र्य सैनिक, अपंग व्यक्तीसाठी एसटीत ठराविक आसने आरक्षित करण्यात आली. मात्र, त्याचा योग्य तो वापर सध्या होताना दिसून येत नाही. प्रवाशांच्या सेवेसाठी करण्यात आलेल्या नियमांचे खुद्द प्रवाशांकडूनच उल्लंघन होत आहे.याबाबत राज्य परिवहन महामंडळाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. सध्या कऱ्हाड आगारातील प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असून, त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी या-ना त्या कारणाने वारंवार चर्चेत असते. सध्या एका सामान्य पण हिताच्या कारणाने एसटी चांगलीच चर्चेत आहे. ते म्हणजे प्रवाशांसाठी बसण्यासाठी एसटी गाडीत करण्यात आलेली आरक्षित जागा. एसटी बसेसमध्ये सर्वसामान्य प्रवासी सोडले तर इतर विशेष अशा दहा प्रवाशांसाठी राखीव जागा आरक्षित केलेल्या असतात.एसटी गाड्यांमध्ये विधानमंडळ सदस्य, अपंगासाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी, स्वातंत्र्य सैनिक, संकटकालीन मार्ग, महिलांसाठी, पत्रकारांसाठी, राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी, वाहकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारच्या प्रमुख जागा आरक्षित केलेल्या आहेत. मात्र, प्रवाशांकडून सध्या त्या आरक्षित केलेल्या जागांचे नियम पाळले जात नाही. तसेच त्यांना याबाबत योग्य त्या सूचनाही वाहकांकडून केल्या जात नसल्याचे दिसून येते. आरक्षित जागेवर बसण्यावरून महिला व पुरुषांमध्ये अनेकवेळा वादावादीचे प्रसंग घडतात. मात्र, त्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात वाहकाकडून पुढाकार घेतला जातो. मात्र, याबाबत कायमस्वरूपी नियमांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.अनेकवेळा प्रवाशांकडून एसटीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामध्ये वाहक व चालकांचाही समावेश असतोच. धुम्रपान करू नये, मोबाईल वापरू नये, स्वच्छता राखावी, खिडकीतून हात बाहेर काढू नये, अशा अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या नियमांचे उल्लंघन हे केले जाते. याबाबत वाहकांकडून तसेच चालकांकडून काहीच उपाय केले जात नाही. सध्या बसगाडीमध्ये महिलांना बसण्यासाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या बैठकीच्या जागेवर पुरुष तसेच विद्यार्थी बसतात. तर अपंगाच्या, संकटकालीन मार्गाच्या जागी कोणीही बसलेले दिसून येते. त्यामुळे गाडीत प्रवास करण्यासाठी आलेल्या अपंग प्रवाशाला त्याची हक्काची जागा असून, देखील बसता येत नाही. किंवा त्यांनी वाहकाला विनंती केत्यास त्यांच्याकडूनही लक्ष दिले जात नाही, अशा अनेक नियमांकडे राज्य परिवहन महामंडळाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे विद्यार्थी व प्रवासी सांगत आहेत. सध्या कऱ्हाड बसस्थानकातील प्रशासनाकडून अशा नियमांची कडक स्वरूपात अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. नियमांची अंमलबजावणी न केल्यास एसटीचा मुख्य उद्देश साध्य होणार नाही. (प्रतिनिधी)