शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

गोल बाग बनलीय बांबूचं बेट!

By admin | Updated: April 7, 2016 00:03 IST

तयारी पाडव्याची : सातारकर उभारणार आठ फुटांपासून पस्तीस फुटांपर्यंतच्या गुढ्या

सातारा : चैत्रापूर्वीच वैशाखवणवा पेटला असला, तरी चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच येत्या शुक्रवारी नववर्षाचे परंपरेप्रमाणे स्वागत करण्यास सातारकर सज्ज झाले आहेत. गुढ्या उभारण्याची जोरदार तयारी सुरू असून, राजवाड्याजवळील गोल बागेला बांबूच्या बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहेत. आठ फुटांपासून पस्तीस फुटांपर्यंत विविध उंचीचे बांबू उपलब्ध आहेत.उंचच उंच बांबूंचा वेढा पडल्याने गोल बागेचे रूपडे बदलून गेले आहे. ओले आणि वाळके अशा दोन्ही प्रकारांत बांबू उपलब्ध असल्याने बांबूच्या या बेटाला सुरेख रंगसंगतीही प्राप्त झाली आहे. प्रामुख्याने साताऱ्यातील स्थानिक मांडववाले या ठिकाणी बांबूचा व्यवसाय करीत आहेत. जिल्ह्याच्या अनेक भागांमधून बांबू कापून विक्रीस आणण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने बामणोली आणि मेढा भागात बांबूची बेटे मोठ्या संख्येने आहेत. नव्याने बांबूची लागवड फारशी होत नाही; परंतु अनेक गावांमध्ये पूर्वजांनी केलेल्या लागवडीमुळे बांबूची मोठी बेटे तयार झाली आहेत. जिल्ह्यात सर्वत्र अशी बेटे दिसतात. गावोगावी गुढीपाडव्याच्या आठवडाभर आधी बेटांचे मालक बांबूची कापणी मजूर लावून करून घेतात. हे मजूर सामान्यत: मालकच नेमत असले, तरी काही मांडववाले स्वत: तोड करूनही बांबू आणतात. मजूर लावले असल्यास ते बांबू तोडून, साफ करून देतात. पेरांजवळ उगवलेले कोंब कोयत्याने खुडून तासून मगच बांबू विक्रेत्यांना दिले जातात. बांबू आतून पूर्णपणे पोकळ असतो; मात्र तरीही वजन पेलण्याची ताकद बांबूमध्ये असते. अर्थात प्रत्येक बांबू पूर्णपणे पोकळ असतो असेही नाही. काही नग तळाच्या बाजूला भरीव असतात; मात्र दोन ते तीन फुटांच्या पुढे मात्र बांबू पोकळच असतो. वाळलेला असो वा हिरवा, बांबूच्या मजबुतीत फारसा फरक पडत नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, पाडव्याच्या गुढीसाठी हिरव्या बांबूला अधिक मागणी असल्याचेही ते सांगतात. (प्रतिनिधी)ग्राहक बघून ठरतेय किंमतगुढीच्या बांबूची किंमत फुटावर ठरत असली तरी काही वेळा ती नगावरही ठरते. किंमत नगावर सांगायची की फुटांवर, याचा निर्णय विक्रेते ग्राहकाकडे पाहून घेतात. सध्या सरासरी वीस रुपये प्रतिफूट दर सुरू आहे. मात्र, नगावर घेतल्यास दीडशे, दोनशे, अडीचशे रुपयांपर्यंत बांबू उपलब्ध होत आहे. शहरात ग्रामीण भागातून सणासुदीच्या खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा ग्राहकांना नगावरच बांबूची विक्री करावी लागते, असे विक्रेत्यांनी सांगितले.बामणोली-कास भाग समृद्ध जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये बांबूची उपलब्धता असली तरी जावळी तालुका विशेषत: बामणोली-कास परिसर आणि मेढा परिसर बांबूच्या दृष्टीने समृद्ध आहे. याखेरीज गावोगावी पूर्वीच्या काळी केलेल्या लागवडीवरच बांबूच्या बेटांचे प्रमाण अवलंबून असते. बांबूची लागवड शेतात, बांधावर न करता राहत्या घराजवळ बेट लावले जाते. काही ठिकाणी ओढ्याकाठीही बांबूची बेटे असून, ओढ्याला पूर आल्यास प्रवाह रोखण्याचे काम ही बेटे करतात.