शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचं विमान इथंही फिरवा

By admin | Updated: May 25, 2015 00:40 IST

विदर्भातील प्रयोग माणदेशातही हवा : माण, खटावचा भाग आजही दुष्काळीच

नितीन काळेल - सातारा -पावसाचे बिघडलेले वेळापत्रक आणि पिकांना गरज असते त्यावेळी पावसाने पाठ फिरविल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी यावर्षी शासनाने राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रशासकीय तयारी केली आहे. त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील केंद्रांची निवड केली आहे. पण, माण-खटाव तसेच लगतचे सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील माणदेशातील काही तालुके दुष्काळग्रस्तच म्हणून ओळखले जातात. तेथेही असा प्रयोग व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरवर्षी पावसाचे चक्रमान बदलले आहे. पाऊस कधी वेळेवर येतो तर कधी महिनाभर उशीर लावतो. त्यामुळे पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करणे जमत नाही. कधीकधी खरीप हंगामही घेता येत नाही. पावसाचे वेळापत्रक शेतकऱ्यांना अघटित ठरू लागले आहे. अशा या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी भारतीय हवामान विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी विभाग, राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे अधिकारी यांची समितीही त्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. याचे प्रात्यक्षिकही लवकरच केले जाणार आहे. या कृत्रिम पावसासाठी दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भातील अमरावतीची मध्यवर्ती केंद्र म्हणून निवड करण्यात आलेली आहे. दोन्ही ठिकाणी विमान उडण्याची व उतरण्याची सोय आहे. याशिवाय हे दोन्ही विभाग दुष्काळाने होरपळलेले आहेत, म्हणून ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण, मराठवाडा तसेच विदर्भाप्रमाणे माणदेशातीलही काही तालुके पूर्वीपासूनच दुष्काळी म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुका तसेच शेजारील सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहंकाळ. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला तालुक्यात दरवर्षी ४०० मिमीच्या आसपासच पाऊस पडतो. दोन-तीन वर्षांतून दुष्काळ पडतो किंवा पाऊसमान कमी होते. त्यामुळे मराठवाडा विदर्भ याप्रमाणेच माणदेशातील या दुष्काळी तालुक्यातही कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याला राजकीय इच्छाशक्तीचीही आवश्यकता आहे. तरच माणदेशातही हा प्रयोग राबविला जाऊ शकेल. ढगात मिठाची फवारणी...जगात अनेक ठिकाणी रॉकेट आणि विमानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्यात येतो. रॉकेटच्या साह्याने २० किमीच्या परिसरात तर विमानाद्वारे २०० ते ३०० किमी भागात पाऊस पडतो. त्यासाठी सिल्व्हर आयोडायीडची फवारणी पाऊस असणाऱ्या ढगात केली जाते. त्यामुळे पाण्याचे थेंब गतिमान होतात. म्हणजेच पावसाचे ढग डॉपलर रडारच्या साह्याने शोधण्यात येतात. त्यात मिठाची फवारणी करायची. त्यामुळे ढगात आद्रता वाढते आणि पाऊस पडतो. कऱ्हाड, बारामतीला विमानतळ आहेच की...मराठवाडा आणि विदर्भातील अमरावतीची मध्यवर्ती केंद्र म्हणून निवड झाली आहे. कारण दोन्ही ठिकाणी विमान उडण्याची आणि उतरण्याची सोय आहे. तसेच सातारा-सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाऊस पाडण्यासाठी कऱ्हाड येथील विमानतळ जवळच आहे. तसेच सोलापूर, बारामती येथेही विमानतळ आहे. तेथून माणदेश फारसा दूर नाही. त्यामुळे ढग आल्यानंतर या विमानतळावरून विमाने उड्डाण करू शकतात. त्यामुळे माणदेशातील दुष्काळी तालुक्यातही कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो. त्याचबरोबर २००३ मध्ये बारामती येथून असाच एक प्रयोग केला होता. त्याचा संदर्भही घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे. मराठवाड्या- प्रमाणेच सातारा-सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील अनेक तालुके कायमस्वरूपी दुष्काळी आहेत. या तालुक्यात अजूनही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. वारंवार येथे दुष्काळ पडत असतो. त्यामुळे या तालुक्यातही कृत्रिम पाऊस पाडण्याची आवश्यकता आहे. - प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी कुरणेवाडी माण