शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

पावसाचं विमान इथंही फिरवा

By admin | Updated: May 25, 2015 00:40 IST

विदर्भातील प्रयोग माणदेशातही हवा : माण, खटावचा भाग आजही दुष्काळीच

नितीन काळेल - सातारा -पावसाचे बिघडलेले वेळापत्रक आणि पिकांना गरज असते त्यावेळी पावसाने पाठ फिरविल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी यावर्षी शासनाने राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रशासकीय तयारी केली आहे. त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील केंद्रांची निवड केली आहे. पण, माण-खटाव तसेच लगतचे सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील माणदेशातील काही तालुके दुष्काळग्रस्तच म्हणून ओळखले जातात. तेथेही असा प्रयोग व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरवर्षी पावसाचे चक्रमान बदलले आहे. पाऊस कधी वेळेवर येतो तर कधी महिनाभर उशीर लावतो. त्यामुळे पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन करणे जमत नाही. कधीकधी खरीप हंगामही घेता येत नाही. पावसाचे वेळापत्रक शेतकऱ्यांना अघटित ठरू लागले आहे. अशा या पार्श्वभूमीवर यावर्षी राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याची प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. त्यासाठी भारतीय हवामान विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी विभाग, राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाचे अधिकारी यांची समितीही त्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. याचे प्रात्यक्षिकही लवकरच केले जाणार आहे. या कृत्रिम पावसासाठी दुष्काळग्रस्त मराठवाडा आणि विदर्भातील अमरावतीची मध्यवर्ती केंद्र म्हणून निवड करण्यात आलेली आहे. दोन्ही ठिकाणी विमान उडण्याची व उतरण्याची सोय आहे. याशिवाय हे दोन्ही विभाग दुष्काळाने होरपळलेले आहेत, म्हणून ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पण, मराठवाडा तसेच विदर्भाप्रमाणे माणदेशातीलही काही तालुके पूर्वीपासूनच दुष्काळी म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव तालुका तसेच शेजारील सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहंकाळ. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला तालुक्यात दरवर्षी ४०० मिमीच्या आसपासच पाऊस पडतो. दोन-तीन वर्षांतून दुष्काळ पडतो किंवा पाऊसमान कमी होते. त्यामुळे मराठवाडा विदर्भ याप्रमाणेच माणदेशातील या दुष्काळी तालुक्यातही कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्याला राजकीय इच्छाशक्तीचीही आवश्यकता आहे. तरच माणदेशातही हा प्रयोग राबविला जाऊ शकेल. ढगात मिठाची फवारणी...जगात अनेक ठिकाणी रॉकेट आणि विमानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्यात येतो. रॉकेटच्या साह्याने २० किमीच्या परिसरात तर विमानाद्वारे २०० ते ३०० किमी भागात पाऊस पडतो. त्यासाठी सिल्व्हर आयोडायीडची फवारणी पाऊस असणाऱ्या ढगात केली जाते. त्यामुळे पाण्याचे थेंब गतिमान होतात. म्हणजेच पावसाचे ढग डॉपलर रडारच्या साह्याने शोधण्यात येतात. त्यात मिठाची फवारणी करायची. त्यामुळे ढगात आद्रता वाढते आणि पाऊस पडतो. कऱ्हाड, बारामतीला विमानतळ आहेच की...मराठवाडा आणि विदर्भातील अमरावतीची मध्यवर्ती केंद्र म्हणून निवड झाली आहे. कारण दोन्ही ठिकाणी विमान उडण्याची आणि उतरण्याची सोय आहे. तसेच सातारा-सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागात पाऊस पाडण्यासाठी कऱ्हाड येथील विमानतळ जवळच आहे. तसेच सोलापूर, बारामती येथेही विमानतळ आहे. तेथून माणदेश फारसा दूर नाही. त्यामुळे ढग आल्यानंतर या विमानतळावरून विमाने उड्डाण करू शकतात. त्यामुळे माणदेशातील दुष्काळी तालुक्यातही कृत्रिम पाऊस पाडला जाऊ शकतो. त्याचबरोबर २००३ मध्ये बारामती येथून असाच एक प्रयोग केला होता. त्याचा संदर्भही घेणे महत्त्वाचे ठरणारे आहे. मराठवाड्या- प्रमाणेच सातारा-सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील अनेक तालुके कायमस्वरूपी दुष्काळी आहेत. या तालुक्यात अजूनही सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. वारंवार येथे दुष्काळ पडत असतो. त्यामुळे या तालुक्यातही कृत्रिम पाऊस पाडण्याची आवश्यकता आहे. - प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी कुरणेवाडी माण