शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

संपात बस चालविणाऱ्यांना गुलाब

By admin | Updated: December 19, 2015 01:06 IST

सातारा आगारात गांधीगिरी : दोन दिवसांत सहाशे फेऱ्या रद्द

सातारा : पगारपत्रक धोरणाच्या विरोधात राज्य परिवहन महामंडळातील ‘इंटक’ एसटी कामगार संघटनेने गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरू केलेले आंदोलन शुक्रवारी दुपारी मागे घेण्यात आले. या काळात जिल्ह्यातील सुमारे सहाशे फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. दरम्यान, जे कर्मचारी संपात सहभागी न होता कर्तव्य पार पाडत होते. त्यांना गुलाब फूल देऊन सातारा आगारात ‘गांधीगिरी’ करण्यात आली. सातारा आगारातील २५ टक्के फेऱ्या दोन दिवसांत रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शुक्रवारी दुपारपर्यंत १०९ फेऱ्या रद्द केल्या होत्या. यामुळे महामंडळाचे दोन दिवसांत सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले. या संपाची तीव्रता साताऱ्याबरोबरच कऱ्हाड, फलटण, दहिवडी आगारात मोठ्या प्रमाणात जाणवली. (प्रतिनिधी) कऱ्हाडमध्ये दीड दिवसात साडेपाचशे फे ऱ्या रद्द कऱ्हाड : राज्यातील एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना महावितरणच्या बरोबरीने २५ टक्के पगार वाढ मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर काँग्रेस इंटक, संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात कऱ्हाडमधील दोनशे कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला होता. दीड दिवस सुरू असलेल्या संपातून योग्य तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र, या दीड दिवसाच्या संपात एसटी च्या साडेपाचशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या संपामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांनाही नुकसान सहन करावे लागले. कऱ्हाड आगारात एकूण ५४८ कर्मचारी कार्यरत आहेत. यांपैकी २१५ कर्मचारी ‘इंटक’संघटनेत कार्यरत आहेत. गुरुवारी राज्यभरातील संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये कऱ्हाड आगारातील कर्मचारीही सहभागी झाले होते. कऱ्हाड येथील इंटक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव सुरेश ढवळे, नरेंद्र मोरे, शकील नदाफ, दिलीप पवार, आबासो पाटील, उत्तम जाधव, विभागीय प्रतिनिधी मुराद मुजावर, केंद्रीय पदाधिकारी राम वीर, सूर्यकांत जाधव, संपतराव पिसाळ, जितेंद्र मोहिते, एस. एस. चव्हाण, मानिक डिंगणे, संजय तेली, जे. डी. पाटील, अरुण जाधव, संतोष भोसले आदींनी संप सुरू केल्यामुळे आगारातील एसटी बसेसच्या साडेपाचशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एसटी प्रशासनाला आर्थिक तोटा सहन करावा लागला. (प्रतिनिधी)