शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते खचले; पुलांचे भरावही वाहिले

By admin | Updated: August 3, 2014 22:48 IST

वाहतुकीचा बट्ट्याबोळ : कऱ्हाड, जावळी, सातारा, खंडाळा तालुक्यांतील दळणवळण विस्कळीत

सातारा : यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होतेय की काय, अशी शंका असतानाच पावसाने आपला जोर वाढविला आणि बघता-बघता नदी, नाले, तलाव भरून वाहू लागले. अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा फटकाही बसत आहे. डोंगरकडे कोसळण्याची भीती असतानाच दरड कोसळून रस्ते बंद होतायत, घरांना तडे जाऊन लोकांवर बेघर होण्याची वेळ येत आहे. अशातच रेंगडी येथील रस्ता खचल्याने, शिरवळ, किडगाव येथील साकव पुलांचे भराव वाहून गेल्याने आणि संगमनगर धक्का पुलाची दुरवस्था झाल्याने वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. --साकव पुलाला खिंडार..---किडगाव पुलाची दोनच महिन्यात दुरवस्था ---संगमनगर धक्का पूल धोकादायक---दुरुस्तीला मिळतोय ‘धक्का’भूवैज्ञानिकांनी केली रेंगडी गावाची पाहणीरेंगडी : आपत्ती निवारणासाठी शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनापाटण : सतत चर्चेत राहिलेला कोयना नदीवरील संगमनगर धक्का पूल धोकादायक बनला आहे. पावसाळ्यात या पुलावरून नदीपलीकडील ३५ गावांतील नागरिक ये-जा करतात. कोयनेला आलेल्या पुलामुळे हा पूल सतत पाण्याखाली जातो. तरीही जीव धोक्यात घालून काहीजण या पुलावरून प्रवास करतात. त्यातच या पुलाच्या दोन्ही बाजूकडील संरक्षित लोखंडी खांब तुटल्यामुळे अडचणीत भर पडली आहे.नाव, वाघणे, कोडोली, चाफेर, मणेरी, लेंडोरी, कुसवडे, वेंढघर, तळीये, गोवारे आदी ३५ गावे कोयना नदी पुलापलीकडे आहेत. कोयना धरणातून पाणी सोडल्यानंतर संगमनगर धक्का पूल सलग आठ ते पंधरा दिवस पाण्याखाली राहतो. एवढी गंभीर समस्या अनेक वर्षांपासून सुटलेली नाही. त्यामुळे पस्तीस गावांतील नागरिक नेमका कुणावर विश्वास ठेवायचा? मंत्री आमच्या काय कामाचे, असा सवाल करू लागली आहे.

नुकतेच उपमुख्यमंत्र्यांनी याच धक्का पुलावरून येऊन नवीन पुलाचे भूमिपूजन केले. तेव्हा या जुन्या पुलाचे संरक्षित खांब तुटलेले होते. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. नवीन पूल तयार होईपर्यंत धक्का पुलाचा वापर होणार आहे. त्यामुळे याची दुरुस्ती व देखभाल करणे आवश्यक आहे. पुलाची पाहणी करून दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.कड्यांखालच्या गावकऱ्यांचे पुनर्वसनासाठी साकडे