शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

येवती ते पाटीलवाडीचा रस्ता बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:36 IST

कऱ्हाड : येवती ते पाटीलवाडी या तीन कि.मी. अंतरावरील मार्गावर सध्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे या ...

कऱ्हाड : येवती ते पाटीलवाडी या तीन कि.मी. अंतरावरील मार्गावर सध्या रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे या मार्गावरून दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना रात्रीच्यावेळी प्रवास करीत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने ही झाडेझुडपे तोडावीत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. यापूर्वी काहीवेळा या झाडा-झुडुपांमुळे अपघात घडले आहेत. मात्र, तरीही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

तळमावलेत बसथांबा परिसरात वाहतूक कोंडी

तळमावले : तळमावले येथील एसटी बसथांबा परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी होत असून, ती सुरळीत करण्याची मागणी होत आहे. ढेबेवाडी हे विभागातील महत्त्वाचे ठिकाण असून, या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर रहदारी असते. तसेच नाईकबा देवस्थानासह वाल्मीक पठाराकडे जाणारे पर्यटक व भाविकही याच मार्गाने जातात. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची आणि पादचाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे परिसर नेहमीच गजबजलेला असतो. तळमावले ही विभागातील गावांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. अनेक गावांतील हजारो ग्रामस्थ दररोज याठिकाणी येतात. मात्र, बसथांबा परिसरात वाहतूक कोंडी झाल्यास सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागतो.

खळेसह परिसरात वानरांचा धुमाकूळ

तळमावले : परिसरात वानरांनी धुमाकूळ घातला असून, पिकांसह काही घरांचेही मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने वानरांना पकडून सुरक्षितस्थळी सोडावे, अशी मागणी होत आहे. खळे गावामध्ये वानरांचा धुमाकूळ सुरू असल्याने घरांवरील पत्र्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच वानरांकडून दररोज पिकांची नासधूस सुरू आहे. शेतामधील भाजीपाला, कडधान्य ज्वारी, तसेच इतर पिके वानरांच्या तावडीतून सुटली तरच ती शेतकऱ्याच्या हाताला लागत आहेत. अनेकवेळा शेतामधील ज्वारीची कणसे गायब होत आहेत आणि फक्त ज्वारीची धाटे राहत असून, ती कणसे वानर फस्त करीत आहेत.

मोरणा विभागात बिबट्याची दहशत

पाटण : तालुक्यातील मोरणा विभागातील नोटोशी, कुसरूंड, वाडीकोतावडे आणि आंब्रग येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असून, त्याच्या डरकाळीने शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी शेतशिवारात जाणे बंद केल्यामुळे शेती, दुग्धव्यवसाय आणि पशुपालन व्यवसाय अडचणीत सापडले आहेत़ शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गायी-म्हशी, शेळीपालन करून दुग्ध व्यवसायासारखे शेतीपूरक उद्योग शेतकऱ्यांनी सुरू केले आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या विभागात बिबट्याच्या वावरामुळे शेती आणि पूरक व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.