शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

गॅस दरवाढीने ग्रामीण जनतेला होतेय बायोगॅसची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

कुडाळ : भारत कृषिप्रधान देश आहे. येथे शेतीबरोबरच पशुपालनाचा व्यवसायही अर्थार्जनाचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जात होता. स्वयंपाकासाठी ...

कुडाळ : भारत कृषिप्रधान देश आहे. येथे शेतीबरोबरच पशुपालनाचा व्यवसायही अर्थार्जनाचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जात होता. स्वयंपाकासाठी लाकूडफाट्याला बाजूला सारून घरात शेणाचा उपयोग करून बायोगॅस संयंत्र आले. आज मात्र वाढत्या गॅस दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या ग्रामीण जनतेला या गोबरगॅसची आवर्जून आठवण होऊ लागली आहे.

गायीगुरांच्या शेणापासून बायोगॅसच्या निर्मितीने गृहिणींच्या डोळ्यातले अश्रू पुसले. सबसिडीत मिळालेल्या गोबर गॅसचा ग्रामीण भागात घरोघरी वापर हाेऊ लागला. मात्र, बदलत्या कालानुरूप याची जागा एलपीजी सिलिंडर गॅसने घेतली. सुरुवातीला भीतीदायक वाटणारा हा गॅस प्रत्येकाच्या घरचा अविभाज्य घटक कधी झाला, हे कळलंच नाही. शासनानेही याच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागात उज्ज्वला योजनेतून सबसिडीही दिली. आता मात्र सबसिडीही बंद झाली आहे. अशातच वाढत्या गॅस दरवाढीने सामान्यांना गॅस विकत घेणेही आर्थिकदृष्टीने जिकरीचे बनले आहे.

महागाईने त्रासलेल्या जनतेचा जीव अगदी मेटाकुटीला आला आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात चुलीचा वापर होऊ लागला. यावेळी मात्र विनाखर्चाच्या बायोगॅसची आठवण ताजी होऊ लागली आहे. बदलत्या कालानुरूप शेती व्यवसायही बदलत गेला. आधुनिकतेच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करत शेती होऊ लागली. यामुळे पशुधनाचाही वापर कमी झाला. ज्या गाई, बैल, म्हैशींच्या शेणाचा उपयोग होत बायोगॅस संयंत्र चालायचे, तेही काळाच्या ओघात बदलले. पूर्वीच्या काळात गोबरगॅस घरात असणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जाई. आज मात्र घराघरात एलपीजी गॅस पोहोचल्याने गोबरगॅस काळाच्या ओघात बाजूला सरला आहे.