शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गॅस दरवाढीने ग्रामीण जनतेला होतेय बायोगॅसची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST

कुडाळ : भारत कृषिप्रधान देश आहे. येथे शेतीबरोबरच पशुपालनाचा व्यवसायही अर्थार्जनाचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जात होता. स्वयंपाकासाठी ...

कुडाळ : भारत कृषिप्रधान देश आहे. येथे शेतीबरोबरच पशुपालनाचा व्यवसायही अर्थार्जनाचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जात होता. स्वयंपाकासाठी लाकूडफाट्याला बाजूला सारून घरात शेणाचा उपयोग करून बायोगॅस संयंत्र आले. आज मात्र वाढत्या गॅस दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या ग्रामीण जनतेला या गोबरगॅसची आवर्जून आठवण होऊ लागली आहे.

गायीगुरांच्या शेणापासून बायोगॅसच्या निर्मितीने गृहिणींच्या डोळ्यातले अश्रू पुसले. सबसिडीत मिळालेल्या गोबर गॅसचा ग्रामीण भागात घरोघरी वापर हाेऊ लागला. मात्र, बदलत्या कालानुरूप याची जागा एलपीजी सिलिंडर गॅसने घेतली. सुरुवातीला भीतीदायक वाटणारा हा गॅस प्रत्येकाच्या घरचा अविभाज्य घटक कधी झाला, हे कळलंच नाही. शासनानेही याच्या वापरासाठी प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागात उज्ज्वला योजनेतून सबसिडीही दिली. आता मात्र सबसिडीही बंद झाली आहे. अशातच वाढत्या गॅस दरवाढीने सामान्यांना गॅस विकत घेणेही आर्थिकदृष्टीने जिकरीचे बनले आहे.

महागाईने त्रासलेल्या जनतेचा जीव अगदी मेटाकुटीला आला आहे. यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात चुलीचा वापर होऊ लागला. यावेळी मात्र विनाखर्चाच्या बायोगॅसची आठवण ताजी होऊ लागली आहे. बदलत्या कालानुरूप शेती व्यवसायही बदलत गेला. आधुनिकतेच्या काळात तंत्रज्ञानाचा वापर करत शेती होऊ लागली. यामुळे पशुधनाचाही वापर कमी झाला. ज्या गाई, बैल, म्हैशींच्या शेणाचा उपयोग होत बायोगॅस संयंत्र चालायचे, तेही काळाच्या ओघात बदलले. पूर्वीच्या काळात गोबरगॅस घरात असणे म्हणजे प्रतिष्ठेचे समजले जाई. आज मात्र घराघरात एलपीजी गॅस पोहोचल्याने गोबरगॅस काळाच्या ओघात बाजूला सरला आहे.