शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

इंधनवाढीने शेतीचं गणितच बिघडवलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST

खटाव : इंधन दरवाढीमुळे त्यातच डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीसाठी उपयुक्त असलेल्या ट्रॅक्टर तसेच विविध उपकरणांवरील मशागतीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे ...

खटाव : इंधन दरवाढीमुळे त्यातच डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीसाठी उपयुक्त असलेल्या ट्रॅक्टर तसेच विविध उपकरणांवरील मशागतीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे गणित बिघडत चालले आहे. मशागतीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे आर्थिक ताळमेळ बसवणे अवघड झाले आहे.

सर्वसामान्य नागरिकांबरोबरच इंधन दरवाढीचा फटका आता शेतकऱ्यालाही बसत आहे. शेतीसाठी आता ट्रॅक्टरचा वापर अधिक होत आहे. ट्रॅक्टरसह शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना इंधनाची गरज असते. ट्रॅक्टरमुळे वेळेची बचत होत असली तरी त्याला लागणाऱ्या इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मशागतीच्या दरातही वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यंदा ट्रॅक्टरची मशागत महाग वाटू लागली आहे.

यांत्रिकीकरणावर आधारित शेती सुरू झाल्यानंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे पूर्वी बैलजोडी दिमाखात उभी असायची, त्याच दरात आता ट्रॅक्टर उभा असलेला दिसून येत आहे. पिकाच्या काढणीपासून ते शेतीच्या मशागतीची कामे अवघ्या काही तासात होत असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करत आहे. शेतकऱ्याचा वेळ व परिश्रम यामुळे वाचत असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने बैलजोडीच्या साह्याने शेती करणारा शेतकरी आता ट्रॅक्टरलाच आपली पसंती देत आहे.

एकीकडे परिश्रम कमी व वेळेची बचत होत असली, तरी इंधन दरवाढीमुळे शेतीसाठी होणारा खर्च वाढतच आहे. बहुतांश शेतकरी भाडेतत्त्वावर शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आता नांगरणी, मळणी आदींसाठी ज्यादा पैसे मोजावे लागत असल्यामुळे वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ बसवणे अवघड बनले आहे.

यांत्रिकीकरणाचा शेतीमध्ये जसा शिरकाव झाला आहे तसे पारंपरिक पद्धतीने शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या बैलजोडी जवळपास हद्दपार होत चालल्या आहेत. सद्यस्थितीत शासनाने केलेल्या इंधन दरवाढीमुळे ९० टक्के शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पन्न कमी व उत्पादन खर्च अधिक या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

२७खटाव

कॅप्शन : खटाव तालुक्यात ट्रॅक्टरच्या साह्याने शेतकरी शेतीची मशागत करत आहेत.