शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

साहित्यातील समीक्षा सिद्धांत आश्रित बनलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 23:00 IST

सातारा (कवीवर्य वि. दा. करंदीकर नगरी) : ‘साहित्याची समीक्षा सिद्धांत हा तसा चिंतनाचा विषय आहे. समीक्षेचा सिद्धांत अलीकडे प्रकाशक आश्रित आणि लेखकाची समीक्षा पद्धत हेही आश्रित झाली आहे. समीक्षा सिद्धांतमध्ये जात नावाचे स्थान काय? हा संशोधनाचा विषय आहे. समीक्षा व्यवहार पहिल्यापासून समाधानकारक नव्हता आणि आजही तो नाही. त्यामुळे या दोन्हींमध्ये ...

सातारा (कवीवर्य वि. दा. करंदीकर नगरी) : ‘साहित्याची समीक्षा सिद्धांत हा तसा चिंतनाचा विषय आहे. समीक्षेचा सिद्धांत अलीकडे प्रकाशक आश्रित आणि लेखकाची समीक्षा पद्धत हेही आश्रित झाली आहे. समीक्षा सिद्धांतमध्ये जात नावाचे स्थान काय? हा संशोधनाचा विषय आहे. समीक्षा व्यवहार पहिल्यापासून समाधानकारक नव्हता आणि आजही तो नाही. त्यामुळे या दोन्हींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे,’ असे मत अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले.महाराष्टÑ साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय विभागीय समीक्षा साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी रा.भा. पाटणकर व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र थोरात, स्वागताध्यक्ष उद्योजक संतोष यादव, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, रयतचे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, किशोर बेडकिहाळ, मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकिहाळ, सोपानकाका चव्हाण, प्रा.आर. एस. काळे, डॉ. अनिसा मुजावर आणि मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना संमेलनाध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र थोरात म्हणाले, ‘स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपल्या शिक्षणव्यवस्थेचे काय झाले आहे? हे आपण पाहतो आहोतच. तिच्यातील उदारमतवादी दृष्टिकोनामुळे तत्वज्ञानासह मानव शास्त्रांचे अस्तित्व कसेबसे तग धरून होते. जागतिकीकरण, बाजार, शिक्षणाचे खासगीकरण, कौशल्याधिष्ठित प्रशिक्षणांना आलेले महत्त्व या सर्व घटकांना दिलेल्या महत्त्वामुळे समीक्षेला, चिकित्सा करण्याला, विचार करण्याला पोषक असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षणक्षेत्राने पूर्णपणे झटकून टाकली आहे.’संमेलनासाठी कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, सहनिमंत्रक राजन लाखे, वि. दा. पिंंगळे, प्रा. तानसेन जगताप, शिरीष चिटणीस, पुरुषोत्तम काळे, दिनकर झिंब्रे, रावसाहेब पवार, मसाप पुणेचे पदाधिकारी, विविध जिल्ह्यातून आलेले प्रतिनिधी, शिवाजी कॉलेज मराठी विभाागाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक, साताºयातील साहित्यप्रेमी, वाचक नागरिक मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित होते.संमेलन यशस्वी होण्यासाठी मसाप शाहूपुरी शाखेचे कार्यकारिणी कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्यवाहक अ‍ॅड. चंद्रकांत बेबले, कार्यवाहक डॉ. उमेश करंबळेकर, कोषाध्यक्ष राजेश जोशी, प्रवीण पाटील, सुभाषचंद्र सरदेशमुख, संजय माने, अमर बेंद्रे, दीपाली धुमाळ, फातिमा नदाफ, स्थानिक संयोजन समितीचे समन्वयक प्रा. गजानन चव्हाण, मराठी विभागप्रमुख डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. कांचन नलवडे, सहसंयोजक डॉ. मानसी लाटकर, डॉ. संजयकुमार सरगडे, प्राचार्य सीताराम गोसावी यांनी परिश्रम घेतले.स्रेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले तर शिवाजी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी आभार मानले.मराठीला अभिजात दर्जासाठी लढा‘मसाप शाहूपुरी शाखेने गेल्या सहा वर्षांत वेगवेगळे उपक्रम राबवले असून, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी प्रा. मिलिंद जोशी आणि रवींद्र बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनाखाली लढा उभा केला,’ अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक विनोद कुलकर्णी यांनी दिली.