शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अंगणवाडी प्रकल्पाच्या खासगीकरणास विरोध

By admin | Updated: November 18, 2014 23:33 IST

साताऱ्यातून शंभर जण दिल्लीला रवाना

सातारा : एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या (आयसीडीएस) पुनर्गठनाच्या नावाखाली अंगणवाड्यांचे खासगीकरण करण्याची योजना आखली जात असून, त्याला अंगणवाडी कर्मचारी संघटनेने विरोध दर्शविला आहे. या निर्णयाविरोधात दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनासाठी जिल्ह्यातून शंभर जण मंगळवारी रवाना झाले.‘आयसीडीएस प्रकल्पाच्या पुनर्गठनामध्ये दहा टक्के अंगणवाड्या कंपन्यांना चालविण्यास देण्यात येणार असून, आठ टक्के अंगणवाड्यांचे रूपांतर पाळणाघरात होणार आहे. ही पाळणाघरेही खासगी असतील. तिसरी सेविका निवडून अंगणवाडी सकाळपासून सायंकाळपर्यंत चालविण्याचा सरकारचा विचार आहे. तसेच मध्यान्ह आहारही केंद्रीय पद्धतीने शिजवून त्याचे वितरण होणार आहे. अंगणवाड्यांच्या खासगीकरणाच्या दिशेनेच हा प्रवास सुरू आहे,’ असे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा आनंदी अवघडे यांनी सांगितले.या निर्णयाविरोधात देशभरातून एक कोटी सह्या संकलित करण्यात आल्या असून, जिल्ह्यातून आठ हजार सह्या घेण्यात आल्या आहेत. किशोरवयीन मुली, बालके, गरोदर आणि स्तनदा मातांसाठी उपयुक्त ठरलेल्या या प्रकल्पाचे सार्वत्रिकीकरण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याने २१ नोव्हेंबर रोजी दिल्लीत रामलीला मैदान ते जंतरमंतर असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अवघडे म्हणाल्या. (प्रतिनिधी)