शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

शेतकरीविरोधी कायदे रद्दसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे असंविधानिक पद्धतीने लागू केले आहेत. त्यामुळे हे कायदे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे असंविधानिक पद्धतीने लागू केले आहेत. त्यामुळे हे कायदे रद्द होईपर्यंत आरपारची लढाई सुरूच राहणार आहे,’ असा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच सातारा शहरातून रॅली काढण्यात आली.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र शासनाने कोरोना विषाणूच्या नावाखाली लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या विरोधात कृषी विषयक तीन कायदे केलेले आहेत. या कायद्यामुळे शासकीय कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विविध उत्पादनांसाठी मिळणारा हमीभाव, तसेच शेतकरी हिताच्या अनेक बाबींवर अप्रत्यक्षरीत्या गंभीर परिणाम होणार आहे. या कायद्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असणारा शेती व्यवसाय व शेतकरी हळूहळू उद्ध्वस्त होणार आहे. हे अन्यायकारक कायदे केंद्राने मागे घ्यावेत, यासाठी जवळपास ५० हून अधिक दिवसांपासून शेतकरी दिल्लीत हाल, उपासमार सोसत धरणे आंदोलन करीत आहेत. तरीही केंद्र शासन त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अशा स्थितीत शेती व्यवसायाशी निगडित प्रत्येकाने शेतकऱ्याच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. या गोष्टीची जाणीव ठेवूनच राष्ट्रीय किसान मोर्चाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी व दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केले होते.

दि. ११ जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन १६ रोजी संपले. त्यामुळे रविवारी सातारा शहरातून रॅली काढून कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली, असे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.

या रॅलीत राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप बोराटे, प्रा. डॉ. ए. जी. होवळ, रफिक मुलाणी, विजय काटरे, अमृत सूर्यवंशी, प्रकाश काशीळकर, सुमीत डांगे, आदेश शिंदे, सौरभ खरात, अशफाक शेख, तेजस माने, विनोद लादे, किशोर थोरवडे, कुमोद खरात, हंबीरराव बाबर, अ‍ॅड. विक्रांत संघमित्र, मयूर थोरवडे, रोहित संकपाळ, एम. ए. आढाव, सोनाली नितनवरे, संध्या शिर्के, लता बनसोडे, आदी सहभागी झाले होते.

फोटो दि.१७ सातारा राष्ट्रीय किसान मोर्चा...

फोटो ओळ : सातारा शहरातून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने रॅली काढण्यात आली होती.

.................................................