शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
3
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
4
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
5
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
6
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
7
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
8
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
9
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
10
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
11
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
12
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
13
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
14
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
15
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
16
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
17
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
18
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
19
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
20
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी

शेतकरीविरोधी कायदे रद्दसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे असंविधानिक पद्धतीने लागू केले आहेत. त्यामुळे हे कायदे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधात तीन कायदे असंविधानिक पद्धतीने लागू केले आहेत. त्यामुळे हे कायदे रद्द होईपर्यंत आरपारची लढाई सुरूच राहणार आहे,’ असा इशारा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच सातारा शहरातून रॅली काढण्यात आली.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र शासनाने कोरोना विषाणूच्या नावाखाली लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांच्या विरोधात कृषी विषयक तीन कायदे केलेले आहेत. या कायद्यामुळे शासकीय कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विविध उत्पादनांसाठी मिळणारा हमीभाव, तसेच शेतकरी हिताच्या अनेक बाबींवर अप्रत्यक्षरीत्या गंभीर परिणाम होणार आहे. या कायद्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असणारा शेती व्यवसाय व शेतकरी हळूहळू उद्ध्वस्त होणार आहे. हे अन्यायकारक कायदे केंद्राने मागे घ्यावेत, यासाठी जवळपास ५० हून अधिक दिवसांपासून शेतकरी दिल्लीत हाल, उपासमार सोसत धरणे आंदोलन करीत आहेत. तरीही केंद्र शासन त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. अशा स्थितीत शेती व्यवसायाशी निगडित प्रत्येकाने शेतकऱ्याच्या पाठीशी राहणे आवश्यक आहे. या गोष्टीची जाणीव ठेवूनच राष्ट्रीय किसान मोर्चाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी व दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू केले होते.

दि. ११ जानेवारीपासून धरणे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन १६ रोजी संपले. त्यामुळे रविवारी सातारा शहरातून रॅली काढून कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली, असे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.

या रॅलीत राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप बोराटे, प्रा. डॉ. ए. जी. होवळ, रफिक मुलाणी, विजय काटरे, अमृत सूर्यवंशी, प्रकाश काशीळकर, सुमीत डांगे, आदेश शिंदे, सौरभ खरात, अशफाक शेख, तेजस माने, विनोद लादे, किशोर थोरवडे, कुमोद खरात, हंबीरराव बाबर, अ‍ॅड. विक्रांत संघमित्र, मयूर थोरवडे, रोहित संकपाळ, एम. ए. आढाव, सोनाली नितनवरे, संध्या शिर्के, लता बनसोडे, आदी सहभागी झाले होते.

फोटो दि.१७ सातारा राष्ट्रीय किसान मोर्चा...

फोटो ओळ : सातारा शहरातून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने रॅली काढण्यात आली होती.

.................................................