शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

कोरड्या पाटांकडं पाण्यानं फिरविली पाठ

By admin | Updated: May 7, 2015 00:20 IST

खटाव तालुक्यात टाहो : प्रादेशिक पाणीयोजना सुरू करण्याबरोबरच तलावात पाणी सोडण्याची मागणी

राजीव पिसाळ -पुसेसावळी व परिसरात पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. पारगाव तलाव कोरडा पडला आहे. उरमोडीच्या पाटांना पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासली की पुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना जलसंजीवनी ठरते. सन २००३-०४ पासून टंचाईच्या काळात या योजनेतून संपूर्ण खटाव तालुक्याला पाणीपुवठा करण्यात येत होता. एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१३ या अठरा महिन्यांच्या कालावधीत ही योजना मोठ्या प्रमाणावर सुरू होती. सध्या परिसरातील विहिरीतील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली आहे. टँकर सुरु करण्याची मागणीपुसेसावळी व थोरवेवाडी येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच पुसेसावळी व आठ गावची नळ पाणीपुवठा योजना सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. खटाव तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या भागात पावसाचे प्रमाण कमी असते. त्यातच सध्याचा उन्हाळा हा भयानक असून शिवारं करपून गेली आहेत. रखरखीत उन्हात फिरवून जनावरांच्या पोटाची खळगी भरावी लागत आहेत. कुसळं खाऊन अर्धपोटी जनावरं गोठ्यात बांधावी लागत आहेत. त्यातच पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्यामुळे जनावरांसह माणसांचेही घशाला कोरड पडू लागली आहे. पावसाळा सुरू व्हायला अजून एक महिन्याचा कालावधी आहे. मे महिन्यातील कडक उन्हाचा सामना कसा करावा, या प्रश्नाने येथील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याची आठवणपुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही पुसेसावळी, राजाचे कुर्ले, गोरेगाव वांगी, वांझोळी, भूषणगड, जयरामस्वामींचे वडगाव, वडी, चोराडे, शिरसवडी या गावांकरिता करण्यात आली होती.मात्र, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली तरच या योजनेची आठवण होते. इतर कालावधीत ही योजना बंद असल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणावर देखभाल दुरुस्तीचा भार प्रशासनाला उचलावा लागतो. पारगाव तलावात पाणी सोडावेही योजना कायमस्वरूपी सुरु व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच शेतीच्या पाण्यासाठी पारगाव तलावात पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. ही योजना कायमस्वरूपी सुरु व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच शेतीच्या पाण्यासाठी पारगाव तलावात पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.