शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
3
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
4
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
5
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
6
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
7
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
8
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
9
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
10
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
11
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
12
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
13
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
14
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
15
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
16
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
17
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
18
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
19
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
20
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!

कोरड्या पाटांकडं पाण्यानं फिरविली पाठ

By admin | Updated: May 7, 2015 00:20 IST

खटाव तालुक्यात टाहो : प्रादेशिक पाणीयोजना सुरू करण्याबरोबरच तलावात पाणी सोडण्याची मागणी

राजीव पिसाळ -पुसेसावळी व परिसरात पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. पारगाव तलाव कोरडा पडला आहे. उरमोडीच्या पाटांना पाणी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.परिसरात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासली की पुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना जलसंजीवनी ठरते. सन २००३-०४ पासून टंचाईच्या काळात या योजनेतून संपूर्ण खटाव तालुक्याला पाणीपुवठा करण्यात येत होता. एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१३ या अठरा महिन्यांच्या कालावधीत ही योजना मोठ्या प्रमाणावर सुरू होती. सध्या परिसरातील विहिरीतील पाण्याची पातळी घटली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू लागली आहे. टँकर सुरु करण्याची मागणीपुसेसावळी व थोरवेवाडी येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसेच पुसेसावळी व आठ गावची नळ पाणीपुवठा योजना सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. खटाव तालुका हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. या भागात पावसाचे प्रमाण कमी असते. त्यातच सध्याचा उन्हाळा हा भयानक असून शिवारं करपून गेली आहेत. रखरखीत उन्हात फिरवून जनावरांच्या पोटाची खळगी भरावी लागत आहेत. कुसळं खाऊन अर्धपोटी जनावरं गोठ्यात बांधावी लागत आहेत. त्यातच पाणीटंचाईचे संकट निर्माण झाल्यामुळे जनावरांसह माणसांचेही घशाला कोरड पडू लागली आहे. पावसाळा सुरू व्हायला अजून एक महिन्याचा कालावधी आहे. मे महिन्यातील कडक उन्हाचा सामना कसा करावा, या प्रश्नाने येथील नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याची आठवणपुसेसावळी व आठ गावची प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना ही पुसेसावळी, राजाचे कुर्ले, गोरेगाव वांगी, वांझोळी, भूषणगड, जयरामस्वामींचे वडगाव, वडी, चोराडे, शिरसवडी या गावांकरिता करण्यात आली होती.मात्र, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली तरच या योजनेची आठवण होते. इतर कालावधीत ही योजना बंद असल्याने पुन्हा मोठ्या प्रमाणावर देखभाल दुरुस्तीचा भार प्रशासनाला उचलावा लागतो. पारगाव तलावात पाणी सोडावेही योजना कायमस्वरूपी सुरु व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच शेतीच्या पाण्यासाठी पारगाव तलावात पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. ही योजना कायमस्वरूपी सुरु व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच शेतीच्या पाण्यासाठी पारगाव तलावात पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे.