शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी गटारातील पाणी जाण्यासाठी अतिक्रमणे हटवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:25 IST

ओगलेवाडी : विद्यानगर येथील जलभरावाची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. येथील राधागोविंदनगर ते सप्तपदी मंगल कार्यालय या ...

ओगलेवाडी : विद्यानगर येथील जलभरावाची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. येथील राधागोविंदनगर ते सप्तपदी मंगल कार्यालय या दरम्यान असणारी अतिक्रमणे प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने काढली. त्यामुळे याठिकाणी भुयारी गटार बांधून पाण्याचा निचरा करणे शक्य होणार आहे. जलभराव समस्येवर कायमचा उतारा मिळणार आहे.

कऱ्हाड - विटा रस्त्यावर विद्यानगर परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत अनेकवेळा आंदोलने झाली आहेत. यावर्षीही गजानन हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष जयंत पाटील, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव यांनी परिसरातील लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. यावर्षी पहिल्याच पावसात येथे पाणी साठले आणि प्रशासन कामाला लागले. सुरूवातीला राधागोविंदनगर ते सप्तपदी मंगल कार्यालय या रस्त्याची मोजणी करून त्यावरील सर्व अतिक्रमणे काढण्यात आली.

सोळा फूट रूंद असलेल्या या रस्त्यावर स्वच्छतागृहे, झाडेझुडपे व तार कंपाऊंड अशी अतिक्रमणे होती. ती काढल्यामुळे सोळा फुटाचा रस्ता मोकळा झाला. रस्त्याची मोजणी करून हद्द निश्चित करण्यात आली आहे. ही सर्व कार्यवाही कऱ्हाडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी लक्ष घालून पार पाडली. स्वत: पाण्यात उतरून ते कार्यवाहीबाबत सूचना देत होते.

यावेळी मंडल अधिकारी विनायक पाटील, तलाठी साळुंखे, सैदापूरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, उपसरपंच अनिल जाधव, हजारमाचीचे उपसरपंच प्रशांत यादव, ग्रामसेवक निंबाळकर, सदस्य सुरेश हजारे, प्रा. रामभाऊ कणसे व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट

आरोग्याकडेही लक्ष

सध्या चारी काढून पाण्याला वाट करून दिली आहे. मात्र, पावसाळा संपल्यावर याठिकाणी प्रशस्त भुयारी गटार बांधून त्यातून या पाण्याचा निचरा होणार आहे. भुयारी गटार निर्माण केल्याने भविष्यात आरोग्याच्या समस्याही निर्माण होणार नाहीत. पाणी काढून देताना आरोग्याकडेही लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती सरपंच फत्तेसिंह जाधव यांनी दिली.

फोटो आहे...

विद्यानगरमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्त्यातील अतिक्रमणे काढण्यात आली. (छाया : संदीप कोरडे)