शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

रेमडेसिविर हे अमृत नाही, विनाकारण आग्रह नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

सातारा : रेमडेसिविर इंजेक्शन म्हणजे अमृत नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून या इंजेक्शनची वारंवार मागणी होत असल्याने त्याचा तुटवडा जाणवतो ...

सातारा : रेमडेसिविर इंजेक्शन म्हणजे अमृत नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून या इंजेक्शनची वारंवार मागणी होत असल्याने त्याचा तुटवडा जाणवतो आहे. ज्यांना खरोखर इंजेक्शनची गरज आहे, त्यांना ती इंजेक्शन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे विनाकारण रेमडेसिविरची मागणी करू नये, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सातत्याने ज्या बातम्या कानावर येत आहेत, त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा. त्याला तीन बाबी जबाबदार आहेत. त्यात पहिली बाब म्हणजे कोरोना रुग्णांची अचानक वाढलेली संख्या. दुसरी बाब म्हणजे रुग्ण संख्येच्या प्रमाणात तेवढे रेमडेसिविरचे उत्पादन नाही. अन् तिसरी फार महत्त्वाची बाब म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरिक्त वापर होत आहे.

शासनाने दिलेल्या सूचनेचा अभ्यास करून मगच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करावा. कोरोनाग्रस्त रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाली असेल आणि बाहेरून ऑक्सिजन देण्याची आवश्यकता भासत असेल आणि आजाराचा कालावधी हा १२ दिवसांच्या आत असेल तर आपल्या रुग्णाला रेमडेसिविरची आवश्यकता असते.

सतत तीन दिवस १०० च्यावर ताप आणि ऑक्सिजन लेवल ९२ च्या खाली असेल तर त्यावेळी रेमडेसिविरची आवश्यकता भासू शकते. बऱ्याचदा कॅन्सरच्या उपचारांमध्ये ती दिली जातात आणि न्यूमोनिया दिसत असेल तर अशा रुग्णाला त्याची आवश्यकता भासू शकते. सौम्य स्वरूपाचा आजार असेल तर रेमडेसिविरची आवश्यकता भासत नाही.

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या रुग्णाला खरोखर रेमडेसिविरची आवश्यकता आहे का ? याची पडताळणी करावी. अनेकदा डॉक्टर सांगतात की, रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली जाते. त्यामुळे हे इंजेक्शन म्हणजे रुग्णाला वाचविण्याचे एकमेव साधन आहे असे समजून विनाकारण भ्रमात राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करावेत. तसेच डॉक्टरांनी केलेल्या सूचनांनुसार नातेवाईकांनी रुग्णाला आवश्यक औषधे किंवा इंजेक्शन आणावीत, असे आवाहन देखील डॉ. कोल्हे यांनी केले आहे.