शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

रेमडेसिविर हे अमृत नाही, विनाकारण आग्रह नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

सातारा : रेमडेसिविर इंजेक्शन म्हणजे अमृत नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून या इंजेक्शनची वारंवार मागणी होत असल्याने त्याचा तुटवडा जाणवतो ...

सातारा : रेमडेसिविर इंजेक्शन म्हणजे अमृत नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांकडून या इंजेक्शनची वारंवार मागणी होत असल्याने त्याचा तुटवडा जाणवतो आहे. ज्यांना खरोखर इंजेक्शनची गरज आहे, त्यांना ती इंजेक्शन मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे विनाकारण रेमडेसिविरची मागणी करू नये, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

डॉ. कोल्हे यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सातत्याने ज्या बातम्या कानावर येत आहेत, त्यातला एक महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा. त्याला तीन बाबी जबाबदार आहेत. त्यात पहिली बाब म्हणजे कोरोना रुग्णांची अचानक वाढलेली संख्या. दुसरी बाब म्हणजे रुग्ण संख्येच्या प्रमाणात तेवढे रेमडेसिविरचे उत्पादन नाही. अन् तिसरी फार महत्त्वाची बाब म्हणजे रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरिक्त वापर होत आहे.

शासनाने दिलेल्या सूचनेचा अभ्यास करून मगच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करावा. कोरोनाग्रस्त रुग्णांची ऑक्सिजन पातळी कमी झाली असेल आणि बाहेरून ऑक्सिजन देण्याची आवश्यकता भासत असेल आणि आजाराचा कालावधी हा १२ दिवसांच्या आत असेल तर आपल्या रुग्णाला रेमडेसिविरची आवश्यकता असते.

सतत तीन दिवस १०० च्यावर ताप आणि ऑक्सिजन लेवल ९२ च्या खाली असेल तर त्यावेळी रेमडेसिविरची आवश्यकता भासू शकते. बऱ्याचदा कॅन्सरच्या उपचारांमध्ये ती दिली जातात आणि न्यूमोनिया दिसत असेल तर अशा रुग्णाला त्याची आवश्यकता भासू शकते. सौम्य स्वरूपाचा आजार असेल तर रेमडेसिविरची आवश्यकता भासत नाही.

कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांनी आपल्या रुग्णाला खरोखर रेमडेसिविरची आवश्यकता आहे का ? याची पडताळणी करावी. अनेकदा डॉक्टर सांगतात की, रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली जाते. त्यामुळे हे इंजेक्शन म्हणजे रुग्णाला वाचविण्याचे एकमेव साधन आहे असे समजून विनाकारण भ्रमात राहू नका. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करावेत. तसेच डॉक्टरांनी केलेल्या सूचनांनुसार नातेवाईकांनी रुग्णाला आवश्यक औषधे किंवा इंजेक्शन आणावीत, असे आवाहन देखील डॉ. कोल्हे यांनी केले आहे.