शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

शेतकऱ्यांना दिलासा; जुन्या दराने खत विक्री !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:37 IST

सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खत दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता होती; पण केंद्राच्या अनुदानाच्या निर्णयानंतर शक्यता कमी झाली आहे. ...

सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खत दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता होती; पण केंद्राच्या अनुदानाच्या निर्णयानंतर शक्यता कमी झाली आहे. त्यातच जिल्ह्यात नवीन खत साठा कुठे तरीच आला असल्याने सध्या तरी जुन्याच दराने विक्री सुरू आहे. त्यातच हंगाम सुरू नसल्याने खतालाही मागणी कमी आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात विविध पिके घेण्यात येतात. खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे साडेतीन लाख हेक्टरहून अधिक असते. यामध्ये बाजरी, भात आणि सोयाबीनचे पीक ५० हजार हेक्टरवर असते. या पिकांसाठी अनेक शेतकरी पेरणीपासून काढणीपर्यंत रासायनिक खतावर खर्च करतात; पण सद्य:स्थितीत खताच्या किमती पोत्यामागे जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यामुळे एकरी उत्पादन खर्चात वाढ होणार होती. या खत दर वाढीमुळे भात पिकाला एकरी २ तर सोयाबीन आणि घेवडा पिकासाठी १ हजार रुपये खतासाठी अधिक खर्च येणार होता. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार होता. त्यातच जिल्ह्यातील शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून निसर्गाशीही सामना करत आले आहेत.

जिल्ह्यात कधी अतिवृष्टी तर काही वेळा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. त्यातच रासायनिक खताच्या किमती वाढल्या होत्या. याविरोधात शेतकरी संघटनांनी आवाज उठवला. शेतकऱ्यांत चिंता तसेच नाराजीचे वातावरण होते. असे असतानाच केंद्र शासनाने अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रासायनिक खत दरात वाढ होणार नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यातच जिल्ह्यात खताचा नवीन साठा आलेला नाही. त्यामुळे जुने खत आहे त्याच दराने विकले जात आहे. तसेच बहुतांशी विक्रेत्यांना अजूनही कंपन्याकडून दराबाबत काहीही माहिती मिळालेली नाही.

.....................................

खरीप हंगाम सर्वसाधारण क्षेत्र ३५००००

चौकट :

खताचे जुने दर खताचे नवीन दर

१०:२६:२६ ११७५ १७७५

१२:३२:१६ १२३५ १८००

२०:२०:२० ९७५ १३५०

डीएपी ११८५ १९००

सुपर फॉस्पेट ३७० १९००

२४:२४:० १३५० १९५०

२०:२०:०:१३ १००० १३५०

.....................................................

सध्याचा दर

१०:२६:२६ ११७५

१२:३२:१६ १२३५

२०:२०:२० ९७५

डीएपी ११८५

सुपर फॉस्पेट ३७०

२४:२४:० १३५०

२०:२०:०:१३ १०००

........................................................

खताला मागणीच नाही...

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात वळवाचे मोठे पाऊस होतात; पण अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. काही भागात पाऊस झाला असला तरी पेरणीपर्यंत ओल उडून जाणार आहे. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामातील पेरणी करणे शक्य नाही. आता चांगल्या पावसाचीच शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली आहे.

.....

मान्सूनचा पाऊस साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठ-दहा दिवसांत जिल्ह्यात दाखल होतो. यावर्षी मान्सून वेळेत येईल, असा अंदाज आहे; पण शेतकरी अजूनही खत खरेदी करताना दिसून येत नाहीत. ज्या ठिकाणी ऊस लागवड आहे. असेच शेतकरी किरकोळ प्रमाणात रासायनिक खते करत आहेत.

...................................

कृत्रिम टंचाई दूरच...

जिल्ह्यात चांगला पाऊस झाला की खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होते. सोयाबीन, भात, बाजरी, ज्वारी अशी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. अशावेळी खताची टंचाई जाणवते. मागील वर्षीही टंचाई भासली; पण अजून खताला मागणीच नाही. त्यामुळे कृत्रिम टंचाई दूरच आहे.

..............................

कोट :

आमच्याकडे अजून पाऊस झालेला नाही. त्यामुळे सध्या पेरणी करण्यापूर्वीची मशागतीची कामे करून घेत आहे. एखादा मोठा पाऊस झाला की, बाजरीचे पीक घेणार आहे. पावसानंतरच खताचा विचार करता येईल. आता खताची गरज नाही.

- प्रल्हाद आटपाडकर, शेतकरी

.....................................

पाऊस पडल्यानंतर रासायनिक खते लागतात. कारण, पाऊस झाल्याशिवाय पेरणीचा विचारच करता येत नाही. पावसाला अजून काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे शेतीतील किरकोळ कामे सुरू आहेत. पाऊस झाल्यानंतर खताची खरेदी करणार आहे.

- रामचंद्र पवार, शेतकरी

...................................................................