शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

रूग्णांचे नातेवाईकच ठरताहेत कोरोनाचे प्रमुख वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:42 IST

सातारा : जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून कोरोना रुग्णांना घेऊन येणारे नातेवाईकच कोविडचे प्रमुख प्रचारक असल्याची धक्कादायक प्रचिती रुग्णालयाबाहेर येत आहे. ...

सातारा : जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून कोरोना रुग्णांना घेऊन येणारे नातेवाईकच कोविडचे प्रमुख प्रचारक असल्याची धक्कादायक प्रचिती रुग्णालयाबाहेर येत आहे. कोविड रुग्णालयात रुग्णांबरोबर येणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांचीही तपासणी करण्याची यंत्रणा उभी करणं गरजेचं होऊन बसलं आहे.

राज्यात सातारा जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसाला दोन हजारांवर पोहोचली आहे. ग्रामीण भागात आजार अंगावर काढणं, काही होत नाही म्हणून मेडिकलमधून औषधे आणि काढा घेण्याकडे कल दिसतो. परिणामी त्यांची प्रकृती खालावते आणि त्यांना ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर बेडची गरज भासले. ग्रामीण रुग्णालयांमध्ये या आधुनिक सोयी उपलब्ध होत नसल्याने या अत्यावस्थ रुग्णांना साताऱ्यात मोठ्या दवाखान्यांमध्ये आणले जाते.

कोविड रुग्णांना आधार देण्यासाठी त्यांच्यासोबत येणारे नातेवाईक त्यांची पाठ चोळत असतात, तर कोणी त्यांचा हात हातात घेऊन धीर देत असतात. ग्रामीण भागातून येणाऱ्या बहुतांश रुग्णांची रुग्णालयात जायचं या विचारानेच घाबरगुंडी उडते. त्यामुळे त्यांना समजावून सांगणं, त्यांना जवळ घेणं असे आधार देण्याचे प्रकार नातेवाईक करतात. याच वेळी कोविडची लागण त्यांना होण्याची शक्यता वाढते. रूग्णालयाच्या आवारात रुग्णांना वेटिंगला ठेवल्यानंतर नातेवाईक या परिसरात फिरतात. कोणी पाणी प्यायला म्हणून तर कोणी काही खाण्याच्या निमित्ताने अन्य लोकांच्या जवळ जातात. यातून कोविडचा प्रसार होण्याची भीती आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात नातेवाइकांची टेस्ट करणं क्रमप्राप्त बनलं आहे.

पॉईंटर

तोंडाला मास्कऐवजी स्कार्फ

बहुतांश कोरोनाबाधित विनामास्क

बाधितांना दिलासा देण्यासाठी नातेवाइकांचा स्पर्श

भावनिक ताण असल्याने मास्क आणि सॅनिटायझर वापराचं भानच नाही

चौकट :

सातारा जंबो कोविड सेंटरमध्ये रुग्णांची वेटिंग लिस्ट मोठी आहे. रोज दहाहून अधिक रुग्णांना सेंटरच्या बाहेरील बाजूस थांबावे लागते. ग्रामीण भागातील रुग्ण मिळेल त्या वाहनाने येतात. त्यामुळे ही वाहनेही कोविड कॅरिअर म्हणून विविध भागांत फिरतात. बाधिताला तिथे सोडल्यानंतर त्यांचे नातेवाईक सेंटरच्या परिसरातच घुटमळत असतात. अन्य नातेवाइकांशी बोलणं, त्यांचे फोन वापरणं, प्यायला तीच पाण्याची बाटली घेणं हे सर्वकाही खूपच ओघाने होत असल्याने हे सेंटरही कोविड प्रसाराचे प्रमुख कारण बनत असल्याचे पुढं येत आहे.

कोट :

ग्रामीण भागातून एका नातेवाइकाला घेऊन किमान तीन ते चारजण येतात. दुधाच्या किंवा अन्य उपलब्ध वाहनांतून बाधिताला रुग्णालयात पोहोचवले जाते. या प्रवासात कोणालाही सोशल डिस्टन्सिंगचे भान राहत नाही. त्यामुळे नातेवाइकांना बाधा होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. कोविड सेंटरच्या बाहेर नातेवाइकांची रॅपिड अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्याची व्यवस्था यावर उपाय ठरू शकतो.

- असिफ खान, सातारा कोविड डिफेंडर ग्रुप