शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

नातं कालांतरानं ओझं होतं म्हणून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा जिल्ह्यात अजूनही तरुण-तरुणींनी विवाहाविना एकत्र राहणे म्हणजे आगळीक समजली जाते. मात्र, हेच तरुण-तरुणी पुण्यासारख्या महानगरात शिक्षण अथवा नोकरीनिमित्त ...

सातारा जिल्ह्यात अजूनही तरुण-तरुणींनी विवाहाविना एकत्र राहणे म्हणजे आगळीक समजली जाते. मात्र, हेच तरुण-तरुणी पुण्यासारख्या महानगरात शिक्षण अथवा नोकरीनिमित्त जातात, तेव्हा तेथील लाईफ स्टाईल निश्चितपणे त्यांना आकर्षित करते. घरातील मोठ्यांच्या धाकात वयाच्या एकोणीस-वीस वर्षांपर्यंत आयुष्य कंठलेल्या या मुलांना हे जग नवं असतं. फुलत्या वयात मनाचं फुलपाखरूदेखील फुलांच्या शोधात असतं. ऐन बहरात अशी फुलांची बागच जर समोर दिसली तर हे फुलपाखरू नक्कीच हरखून जातं. मनाच्या बेड्या तुटलेल्या असतात. एक नवं नातं जोडायचा ध्यास मनात रुंजी घालत असतो. हे नातं तयार होतं. कल्पनेच्या विश्वात ते फिट्ट बसतं. अन् मग नैतिकतेच्या बुरख्याला बाजूला करून हे नातं जोडलं जातं.

प्रेमात पडलेल्या दोघांना तितक्यात लग्न करायचं नसतं. मात्र, दोघांना समजून घेत एकत्र राहायचं असतं. सध्याच्या काळात ‘लिव्ह इन’चे प्रमाण वाढलेले आहे. लग्न घरातल्या लोकांशी बोलून पण प्रेम मात्र स्वत:च ठरवून असा क्रांतिकारक विचार मनात डोकावत असतो. तेव्हा मात्र लग्नाशिवाय एकत्र राहण्याचं धाडस केलं जातं. लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेणं कितीतरी महत्त्वाचं असतं. दोघांचे स्वभाव, आवडी-निवडी, पुढील करिअर प्लान्स सगळं समजून घेणं आवश्यक असतं. केवळ ‘आवडला, आवडली’ म्हणून लग्न करून टाकलं; हे अलीकडच्या काळात थोडं अवघड आहे. ‘लिव्ह इन’मध्ये राहून नंतर घरातील मोठ्यांच्या सांगण्यानुसार लग्नगाठ बांधण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढलेले आहे, हे मात्र निश्चित..!

प्रॅक्टिकल ॲटिट्यूड महत्त्वाचा..

उच्चशिक्षण घेतल्यानंतर मुलांप्रमाणेच मुलीही करिअरच्या वाटा शोधत असतात. मात्र, वय निघत चाललंय, असं म्हणत घरातले तिचं लग्न उरकण्याच्या तयारीला लागतात. मात्र, तिचा साफ नकार असतो. लग्नानंतर सासरच्या मंडळींना सुनेनं नोकरी करणं पटलं नाही तर पुन्हा भावनिक संघर्षाला सामोरे जावं लागणार, ही भीती तशी योग्यच नाही का? त्यामुळे मुलं-मुली प्रॅक्टिकल ॲटिट्यूड ठेवतात. कुटुंबाचा आर्थिक कणा मजबूत ठेवण्यासाठी हा विचार महत्त्वाचा ठरतोय.

सागर गुजर