शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नातं कालांतरानं ओझं होतं म्हणून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा जिल्ह्यात अजूनही तरुण-तरुणींनी विवाहाविना एकत्र राहणे म्हणजे आगळीक समजली जाते. मात्र, हेच तरुण-तरुणी पुण्यासारख्या महानगरात शिक्षण अथवा नोकरीनिमित्त ...

सातारा जिल्ह्यात अजूनही तरुण-तरुणींनी विवाहाविना एकत्र राहणे म्हणजे आगळीक समजली जाते. मात्र, हेच तरुण-तरुणी पुण्यासारख्या महानगरात शिक्षण अथवा नोकरीनिमित्त जातात, तेव्हा तेथील लाईफ स्टाईल निश्चितपणे त्यांना आकर्षित करते. घरातील मोठ्यांच्या धाकात वयाच्या एकोणीस-वीस वर्षांपर्यंत आयुष्य कंठलेल्या या मुलांना हे जग नवं असतं. फुलत्या वयात मनाचं फुलपाखरूदेखील फुलांच्या शोधात असतं. ऐन बहरात अशी फुलांची बागच जर समोर दिसली तर हे फुलपाखरू नक्कीच हरखून जातं. मनाच्या बेड्या तुटलेल्या असतात. एक नवं नातं जोडायचा ध्यास मनात रुंजी घालत असतो. हे नातं तयार होतं. कल्पनेच्या विश्वात ते फिट्ट बसतं. अन् मग नैतिकतेच्या बुरख्याला बाजूला करून हे नातं जोडलं जातं.

प्रेमात पडलेल्या दोघांना तितक्यात लग्न करायचं नसतं. मात्र, दोघांना समजून घेत एकत्र राहायचं असतं. सध्याच्या काळात ‘लिव्ह इन’चे प्रमाण वाढलेले आहे. लग्न घरातल्या लोकांशी बोलून पण प्रेम मात्र स्वत:च ठरवून असा क्रांतिकारक विचार मनात डोकावत असतो. तेव्हा मात्र लग्नाशिवाय एकत्र राहण्याचं धाडस केलं जातं. लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेणं कितीतरी महत्त्वाचं असतं. दोघांचे स्वभाव, आवडी-निवडी, पुढील करिअर प्लान्स सगळं समजून घेणं आवश्यक असतं. केवळ ‘आवडला, आवडली’ म्हणून लग्न करून टाकलं; हे अलीकडच्या काळात थोडं अवघड आहे. ‘लिव्ह इन’मध्ये राहून नंतर घरातील मोठ्यांच्या सांगण्यानुसार लग्नगाठ बांधण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढलेले आहे, हे मात्र निश्चित..!

प्रॅक्टिकल ॲटिट्यूड महत्त्वाचा..

उच्चशिक्षण घेतल्यानंतर मुलांप्रमाणेच मुलीही करिअरच्या वाटा शोधत असतात. मात्र, वय निघत चाललंय, असं म्हणत घरातले तिचं लग्न उरकण्याच्या तयारीला लागतात. मात्र, तिचा साफ नकार असतो. लग्नानंतर सासरच्या मंडळींना सुनेनं नोकरी करणं पटलं नाही तर पुन्हा भावनिक संघर्षाला सामोरे जावं लागणार, ही भीती तशी योग्यच नाही का? त्यामुळे मुलं-मुली प्रॅक्टिकल ॲटिट्यूड ठेवतात. कुटुंबाचा आर्थिक कणा मजबूत ठेवण्यासाठी हा विचार महत्त्वाचा ठरतोय.

सागर गुजर