शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नातं कालांतरानं ओझं होतं म्हणून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:27 IST

सातारा जिल्ह्यात अजूनही तरुण-तरुणींनी विवाहाविना एकत्र राहणे म्हणजे आगळीक समजली जाते. मात्र, हेच तरुण-तरुणी पुण्यासारख्या महानगरात शिक्षण अथवा नोकरीनिमित्त ...

सातारा जिल्ह्यात अजूनही तरुण-तरुणींनी विवाहाविना एकत्र राहणे म्हणजे आगळीक समजली जाते. मात्र, हेच तरुण-तरुणी पुण्यासारख्या महानगरात शिक्षण अथवा नोकरीनिमित्त जातात, तेव्हा तेथील लाईफ स्टाईल निश्चितपणे त्यांना आकर्षित करते. घरातील मोठ्यांच्या धाकात वयाच्या एकोणीस-वीस वर्षांपर्यंत आयुष्य कंठलेल्या या मुलांना हे जग नवं असतं. फुलत्या वयात मनाचं फुलपाखरूदेखील फुलांच्या शोधात असतं. ऐन बहरात अशी फुलांची बागच जर समोर दिसली तर हे फुलपाखरू नक्कीच हरखून जातं. मनाच्या बेड्या तुटलेल्या असतात. एक नवं नातं जोडायचा ध्यास मनात रुंजी घालत असतो. हे नातं तयार होतं. कल्पनेच्या विश्वात ते फिट्ट बसतं. अन् मग नैतिकतेच्या बुरख्याला बाजूला करून हे नातं जोडलं जातं.

प्रेमात पडलेल्या दोघांना तितक्यात लग्न करायचं नसतं. मात्र, दोघांना समजून घेत एकत्र राहायचं असतं. सध्याच्या काळात ‘लिव्ह इन’चे प्रमाण वाढलेले आहे. लग्न घरातल्या लोकांशी बोलून पण प्रेम मात्र स्वत:च ठरवून असा क्रांतिकारक विचार मनात डोकावत असतो. तेव्हा मात्र लग्नाशिवाय एकत्र राहण्याचं धाडस केलं जातं. लग्नाअगोदर एकमेकांना समजून घेणं कितीतरी महत्त्वाचं असतं. दोघांचे स्वभाव, आवडी-निवडी, पुढील करिअर प्लान्स सगळं समजून घेणं आवश्यक असतं. केवळ ‘आवडला, आवडली’ म्हणून लग्न करून टाकलं; हे अलीकडच्या काळात थोडं अवघड आहे. ‘लिव्ह इन’मध्ये राहून नंतर घरातील मोठ्यांच्या सांगण्यानुसार लग्नगाठ बांधण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढलेले आहे, हे मात्र निश्चित..!

प्रॅक्टिकल ॲटिट्यूड महत्त्वाचा..

उच्चशिक्षण घेतल्यानंतर मुलांप्रमाणेच मुलीही करिअरच्या वाटा शोधत असतात. मात्र, वय निघत चाललंय, असं म्हणत घरातले तिचं लग्न उरकण्याच्या तयारीला लागतात. मात्र, तिचा साफ नकार असतो. लग्नानंतर सासरच्या मंडळींना सुनेनं नोकरी करणं पटलं नाही तर पुन्हा भावनिक संघर्षाला सामोरे जावं लागणार, ही भीती तशी योग्यच नाही का? त्यामुळे मुलं-मुली प्रॅक्टिकल ॲटिट्यूड ठेवतात. कुटुंबाचा आर्थिक कणा मजबूत ठेवण्यासाठी हा विचार महत्त्वाचा ठरतोय.

सागर गुजर