शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

मिरगाव, आंबेघर, हुंबराळेचे पुनर्वसन जलसंपदा विभाग वसाहतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

सातारा : ‘कोयना धरणाच्या पट्ट्यातील दरडग्रस्त मिरगाव, आंबेघर, हुंबराळे गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करावे,’ अशी सूचना ...

सातारा : ‘कोयना धरणाच्या पट्ट्यातील दरडग्रस्त मिरगाव, आंबेघर, हुंबराळे गावाचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करावे,’ अशी सूचना नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला केली; तसेच त्यांनी जलसंपदाच्या कोयनानगर येथील निवासी वसाहतीची पाहणी करून डागडुजीचे काम वेगाने पूर्ण करण्यास सांगितले. त्यामुळे तेथे १५० कुटुंबांचे स्थलांतर होऊ शकते.

जिल्ह्यातील अतिवृष्टीत पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर गावात दरड कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव आणि हुंबराळे या गावांना भेट देत पाहणी केली, तसेच येथील ग्रामस्थांचे एमटीडीसीच्या पर्यटन रिसॉर्ट आणि कोयनानगरच्या जिल्हा परिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. तेथे जाऊनही मंत्री शिंदे यांनी ग्रामस्थांची भेट घेत दिलासा दिला. या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. तुमच्या पुनर्वसनाबाबत लवकरच कायमस्वरूपी तोडगा काढू, अशी ग्वाही मंत्री शिंदे यांनी दिली.

यावेळी मंत्री शिंदे यांनी ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू, चादरी, कपडे, सतरंज्या, चटया, छत्र्या अशी मदत केली. यासोबतच शासनाची मदतदेखील तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवली जाईल, असेही स्पष्ट केले.

यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, ठाण्याहून पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन आलेले नगरसेवक राम रेपाळे, नगरसेवक योगेश जानकर, शशिकांत जाधव आदी उपस्थित होते.

चौकट :

कोयना धरण बांधताना उभारलेल्या वसाहती....

ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन जलसंपदा विभागाच्या वसाहतीत करण्याचा पर्याय पुढे आला आहे. कोयनानगर परिसरातील या वसाहती धरण बांधताना उभारण्यात आल्या होत्या. आज त्यांची अवस्था दयनीय आहे; मात्र या वसाहतींची डागडुजी केल्यास तो पुनर्वसनासाठी एक चांगला पर्याय ठरू शकेल, यावर एकमत झाले आहे. त्यामुळे मंत्री शिंदे यांनी तातडीने डागडुजीचे काम हाती घेण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.